
आरतीच्या प्रेमात वेडा झालेला विक्रांत दारू प्यायला फार्महाऊस वर जातो तिथे सारिका त्याला सांगते की आरतीचा साखरपुडा ठरला आहे आणि आता तिचे लग्न होणार. आत्ता ती कायमची दुसऱ्याची होणार या कल्पनेनेच विक्रांत त्रासून वेदांतला फोन करून आपली जगण्याची आपली इच्छा नसल्याचे सांगतो आणि त्याचवेळेस विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करतो. आता आरती गौतमशी लग्न करण्यास नकार देईल? आणि विक्रांतला स्वीकारेल का? गौतमचा खरा चेहरा आरतीसमोर येईल का? हे पाहणे रोमांचक असणार आहे