
kanyadan ceremony is not legally necessary for hindu marriage : अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले आहे की, हिंदू विवाह कायद्यानुसार, हिंदू विवाह सोहळ्यासाठी कन्यादान विधी आवश्यक नाही. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या संदर्भात निकाल देतांना न्यायमूर्तींनी सांगितले की, हिंदू विवाहाचा अत्यावश्यक सोहळा म्हणून केवळ सप्तपदी सोहळा मानला जाते. यामुळे केवळ कन्यादान झाले की नाही हे तपासण्यासाठी साक्षीदारांना पुन्हा बोलावण्याचा कोणताही आधार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने करत साक्षीदारांना पुन्हा बोलावण्याची याचिका फेटाळली.








