
इलेक्टोरल बाँड्स हा हप्तावसुलीचा प्रकार
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पालघरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोदी सरकारवर तोफ डागली. ‘इलेक्टोरल बाँड संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल महत्वपूर्ण आहे. भाजपला इलेक्टोरल बाँडमधून ६ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ज्या कंपन्यांवर ईडी, आयकर, सीबीआयची कारवाई झाली, त्या कंपन्यांनी कारवायानंतर इलेक्टोरल बँड घेतले आहेत. त्याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला हे स्पष्ट आहे. ज्या कंपन्यांना मोठ्या कामाची कंत्राटे मिळाली, त्या कंपन्यांनीही हे बाँड खरेदी केले आहेत. इलेक्टोरल बाँड हा सरळ सरळ हप्तावसुलीचा प्रकार आहे. ‘चंदा दो, धंदा लो’ हेच भाजपचं धोरण आहे, असा घणाघात रमेश यांनी केला.








