
दुसरीकडे मनूला ताप आला आहे. आशुतोष तिची काळजी घेत असतो. माया देखील मनूची चौकशी करण्यासाठी आशुतोषच्या खोलीत येते. तेव्हा त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण होते. नेमकं सुलेखा ताई ते पाहतात आणि आशुतोषला काही प्रश्न विचारतात. आशुतोष त्यांना अरुंधतीवर मनापासून प्रेम असल्याचे सांगतो. तसेच पुढचं आयुष्य हे अरुंधतीसोबत घालवण्याची इच्छा असल्याचे देखील सांगतो. त्यामुळे आता सुलेखा ताईंच्या मनात नेमकं काय सुरु आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.








