
शंभूराज देसाई म्हणाले की, राज्य सरकारच्या योजनांचा लाभ सीमावर्ती भागातील मराठी भाषकांना देत आहे. सीमा भागातील ८६५गावांतील मराठी भाषकांना राज्य शासनाकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी स्वतंत्र समन्वयक अधिकारी नेमण्याविषयी आजच्या बैठकीत चर्चा झाली. समन्वयक अधिकारी म्हणून तहसीलदार दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचा आदेशही दिला आहे.





