
झारखंडमध्ये नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर आता सत्तारूढ पक्षाला बहुमत चाचणीचे अग्निदिव्य पार करावे लागणार आहे. यासाठी झारखंड विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आज सोमवार 5 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आले आहे.
रांची : झारखंडमध्ये नव्या सरकारची स्थापना झाल्यानंतर आता सत्तारूढ पक्षाला बहुमत चाचणीचे अग्निदिव्य पार करावे लागणार आहे. यासाठी झारखंड विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन आज सोमवार 5 फेब्रुवारीपासून आयोजित करण्यात आले आहे.
बहुमत चाचणीसाठी सत्तारूढ पक्षाचे आमदार हैदराबाद येथून रांचीत दाखल होत आहेत. तर दुसरीकडे, पक्षातील नाराज आमदार हेंब्रम यांनी शिबू सोरेन यांची भेट घेतल्यानंतर पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे. चंपई सोरेन यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या निर्णयास त्यांनी विरोध केला होता.









