
राज्यातील सध्याच्या बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी केलेलं हे विधान महत्त्वाचं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दमानिया यांनी हा दावा केला. ‘भारतीय जनता पक्षाला येत्या लोकसभा निवडणुकीत ४०० च्या वर खासदार निवडून आणायचे आहेत. त्यासाठी त्यांना जिथून कुठून मतं मिळतील ती हवीच आहेत. मग ती दोन-तीन टक्के का असेनात. त्यासाठी भाजप कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, असं दमानिया यांनी म्हटलं आहे.







