
या आश्रम शाळेत २७९ विद्यार्थी असून शिक्षण घेत आहेत.त्यातील १०९ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला २० ते २५ विद्यार्थ्यांना अचानक उलटी, जुलाब, मळमळ असा त्रास होत आल्याने या विद्यार्थ्यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून १० विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभाग उपचार सुरूआहेत.






