
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ७५ व्या प्रजास्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशाला उद्देशून भाषण केले. त्यांनी देशवासीयांना शुभेच्छा देताना म्हटले की, उद्या देश संविधानाचा उत्सव साजरा करेल. राष्ट्रपतींनी म्हटले की, संविधानाची प्रस्तावना आम्ही भारताचे नागरिक या वाक्यने सुरू होते. हे शब्द आपल्या संविधानाचे मूलभूत तत्व आहेत. आपल्या देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात राष्ट्रपतींनी म्हटले की, भारतीय स्वातंत्र्य शताब्दीकडे वाटचाल करताना अमृत काळाच्या प्राथमिक अवस्थेतून जात आहे.








