
मणिपूरमध्ये हळहळू शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे वाटत असतानाच सोमवारी तेंगनोउपल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या हिंसाचारात (Manipur Violence) १३ जणांचा मृत्यू झाला. दोन उपद्रवांच्या गटामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास अंधाधुंद गोळीबार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
इम्फाळ : मणिपूरमध्ये हळहळू शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती पूर्ववत होत असल्याचे वाटत असतानाच सोमवारी तेंगनोउपल जिल्ह्यात दोन गटात झालेल्या हिंसाचारात (Manipur Violence) १३ जणांचा मृत्यू झाला. दोन उपद्रवांच्या गटामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास अंधाधुंद गोळीबार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच आसाम रायफल्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या टीमने उपद्रवींना पकडण्याचे काम सुरू केले आहे. संबंधित परिसरात पुन्हा तणाव निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सीमावर्ती भागातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही इंटरनेट सेवा बंद आहे. पण रविवारी इंटरनेट सेवेवरील बंदी उठवल्यानंतर सोमवारी हिंसाचाराची घटना घडली. रविवारीच राज्यात मोबाईल इंटरनेट सेवेवरील बंदी उठवण्यात आली असताना ही घटना घडली आहे. मात्र, काही जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागात अजूनही निबंध कायम आहेत.










