
उत्तरकाशी बोगद्यातून बाहेर काढण्यात आलेल्या ४१ मजुरांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यांनी सर्वांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले.
17 दिवसाच्या प्रयत्नानंतर अखेर उत्तरकाशीतील सिल्क्यरा बोगद्यातून (Uttarakashi tunnel rescue opration) अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. या सर्व कामगारांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी () यांनी फोनवर संवाद साधला. त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. तसेच, 17 दिवस या कठीण परिस्थितीत धैर्य राखल्याबद्दल पंतप्रधानांनी कामगारांचे कौतुकही केले.
हे सुद्धा वाचा
पंतप्रधान कार्यालयाचं बचाव कार्यावर होतं लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत या बचाव कार्यावर सतत लक्ष ठेवून होते. ते सकाळ संध्याकाळ उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून बचाव कार्याची माहिती घेत होते. पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारीही बचाव कार्यावर लक्ष ठेवून होते.







