
ड्रग्जचे साठे अदानींच्याच बंदरात कसे?
राज्यात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या प्रकरणावरही कन्हैय्या यांनी भाष्य केलं. तरुणाईच्या मेंदूला नियंत्रित करण्याचं काम ड्रग्ज करतात. ड्रग्जच्या आहारी गेलेल्या तरुणांना भोवतालाचं भानच राहत नाही. त्यामुळे हे ड्रग्ज तरुणाईला खाईत लोटण्याचं काम करत आहेत. त्यांना घर, कुटुंब, समाज, देश याची कसलीच शुद्ध राहत नाही, असं कुमार म्हणाले. त्याचसोबत ड्रग्जचे अतिप्रचंड साठे अदानी यांच्या ताब्यात असलेल्या मुंद्रा बंदरातच कसे मिळतात, यावर केंद्रीय गृहमंत्रालय काहीच बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.






