
- सकाळी ६:१० वाजता ही रेल्वे पुण्याहून लातूरला रवाना होईल आणि त्याच दिवशी दुपारी १२:१० वाजता हरंगुळ रेल्वे स्टेशनला पोहोचेल.
- लातूरहून दुपारी ३ वाजता पुण्याला रवाना होईल आणि रात्री ९ वाजता पुण्यात पोहोचेल.
- हडपसर, केडगाव, दौंड, जेऊर, केम, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन आणि धाराशिव आदि स्थानकांवर ही गाडी थांबेल.
- एक प्रथम वातानुकूलित, एक व्दितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, पाच शयनयान, तीन सामान्य द्वितीय श्रेणीसह लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार अशी रचना असेल.
दरम्यान, मध्य रेल्वेनं घेतलेल्या या निर्णयामुळं पुण्यातून सोलापूर, धारशिव आणि लातूरमधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.





