
हडपसर येथील पाच जण कसोल येथे अडकले आहेत. गुंतूर येथील लष्कराच्या तळावरून त्यांनी संपर्क साधला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद हे देखील येथे अडकलेल्या नागरिकांना तेथील अधिकाऱ्यांच्या साह्याने मदत करत आहेत. सध्या पाऊस जास्त असून रस्ते बंद झाले आहे. पाऊस कमी झाल्यावर येथील परिस्थिती पूर्ववत होऊन रस्ते खुले झाल्यावर नागरिकांना घरी परत येता येणार आहे.





