
एकता कपूरने १९९५ साली करिअरला सुरुवात केली. सुरुवातीला अपयशाचा सामना करावा लागला. मात्र नंतर तिने अनेक हिट मालिकांची निर्मिती केली. तिच्या ‘हम पांच’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कसौदी जिंदगी की’, ‘कहानी घर-घर की’ आणि ‘नागिन’ या मालिका विशेष गाजल्या. या मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री स्मृति ईराणी, साक्षी तन्वर, श्वेता तिवारी, मौनी रॉय यांचे संपूर्ण आयुष्य एकता कपूरने बदलून टाकले.