
प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ, विज्ञान संप्रेषक आणि पद्मविभूषण विजेते डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत. त्यांच्या कुटुंबातील घडामोडींची माहिती असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.