Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेश700 वर्षांपासून शापित आहे भारतातील 'हे' गाव; इथे कुणीही बांधत नाही दुमजली...

700 वर्षांपासून शापित आहे भारतातील ‘हे’ गाव; इथे कुणीही बांधत नाही दुमजली घर

700 वर्षांपासून शापित आहे भारतातील ‘हे’ गाव; इथे कुणीही बांधत नाही दुमजली घर

[ad_1]

भारत हे असंख्य गावांनी बनलेला देश आहे. या देशातील प्रत्येक गावाचं एक वेगळेपण आहे.  प्रत्येक गावाची स्वतःची श्रद्धा आणि संस्कृती असते. असेच एक गाव राजस्थानमध्ये आहे. ते एका खास गोष्टीसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. भारतात असंच एक गाव आहे. ज्या गावाला तब्बल 700 वर्षे जुना असा शापित इतिहास आहे. 

चुरु जिल्ह्यातील सरदारशहर तहसीलमधील उदसर गाव एका विचित्र गोष्टींसाठी ओळखले जाते. या गावात गेल्या ७०० वर्षांपासून कोणीही दुमजली घर बांधलेले नाही. गावातील लोक म्हणतात की, या गावाला शाप आहे की जर कोणी येथे दोन मजली घर बांधले तर त्याच्या कुटुंबाला अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. या शापामागे एक कथा सांगितली जाते, जी खूप आश्चर्यकारक आहे. 

या शापामागील कथा पाहूया?

असे मानले जाते की, या गावाला ७०० वर्षांपूर्वी असा शाप मिळाला होता. यामुळे संपूर्ण गावाचे जीवन बदलले. आजही या गावात कोणीही दोन मजली घर बांधण्याचे धाडस करत नाही. कथेनुसार, ७०० वर्षांपूर्वी या गावात भेमिया नावाचा एक माणूस राहत होता. एके दिवशी त्याला कळले की गावात चोर आले आहे

चोरांनी गावकऱ्यांची जनावरे चोरायला सुरुवात केली. चोरांना जनावरे चोरताना पाहून, भेमियाने त्यांच्याशी एकटेच लढा दिला. चोरांनी त्याला गंभीर जखमी केले आणि तो रक्ताने माखला गेला. चोरांपासून वाचण्यासाठी, भेमिया त्याच्या सासरच्या घरी पोहोचला आणि घराच्या दुसऱ्या मजल्यावर लपला. चोरांनी त्याचा पाठलाग केला आणि तिथूनही त्याला पकडले.

यावेळी चोरांनी भेमिया आणि त्याच्या सासरच्यांनाही मारहाण केली. जखमी झाल्यानंतरही, भेमियाने चोरांशी लढा दिला आणि शेवटी चोरांनी भेमियाचा गळा कापला. भेमिया अजूनही लढत राहिला आणि त्याच्या गावाच्या सीमेजवळ आला. शेवटी भेमियाचे धड उदसर गावात पडले.

जेव्हा भेमियाच्या पत्नीला हे कळले तेव्हा ती रागावली आणि तिने गावकऱ्यांना शाप दिला की, जर या गावात कोणी दुसऱ्या मजल्यापर्यंत घर बांधले तर त्याचे कुटुंब उद्ध्वस्त होईल.

यानंतर, भेमिया मंदिर बांधले गेले आणि आजपर्यंत कोणीही त्यांचे घर दुमजली केलेले नाही. याचा कोणताही प्रामाणिक पुरावा नाही. पण गावात दुमजली घरे नाहीत ही वस्तुस्थिती या घटनेबद्दल लोकांच्या मनात भीती आणि श्रद्धा दोन्ही असल्याचे दर्शवते.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments