Friday, August 21, 2026
Homeदेश-विदेशभारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी, जनरल मुनीरमियाँ कुठे गायब झाला?

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी, जनरल मुनीरमियाँ कुठे गायब झाला?

भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी, जनरल मुनीरमियाँ कुठे गायब झाला?

[ad_1]

India vs Pakistan: भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पुरती घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तानचे जनरल मुनीर कुठे गायब झाले आहेत असा प्रश्न पडला आहे. मुनीर यांना ताब्यात घेतल्याची देखील माहिती आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचाही काही ठावठिकाणा नाही. 

भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर चवताळलेल्या पाकिस्ताननं प्रतिहल्ला केला. दरम्यान पाकड्यांनी केलेला हा हल्ला त्यांनाच महागात पडलाय. कारण  पाकिस्तानचे सर्व मिसाईल्स आणि ड्रोन भारताच्या S-400 नं हवेत हाणून पाडलेत. त्यानंतर भारतानं पाकिस्तानच्या मोठ्या 15 शहरांवर मिसाईल्स डागल्या
आणि अनेक शहरी उद्ध्वस्त केलीत. त्यामुळे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर आणि त्यांचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे गायब झाल्याची माहिती आहे.

भारतानं केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या एका खासदाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. पाकचे खासदार शाहीद अहमद यांनी शाहबाज शरीफला खडे बोल सुनावले आहेत. शाहबाज शरीफ हे नरेंद्र मोदींना घाबरत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.

पाकिस्तानचे खासदारच नव्हे तर तिथली जनता देखील पाक सरकारला आरसा दाखवण्याचं काम करतेय.. युद्धाला पाकिस्तानच जबाबदार असल्याचा दावा पाकिस्तानचे नागरीक करताना दिसतायत दहशतवादाला पाठिशी घातल्यामुळे पाकनं युद्ध ओढवून घेतल्याचं पाकिस्तानी नागरिकानं म्हटलंय.

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा भारतानं बदला घेतला. भारतानं पाकिस्तानमध्ये घुसत दहशतवाद्यांना ठोकलं. दरम्यान याच दहशतवाद्यांचा पाठिराखा पाकिस्ताननं त्यानंतर भारतावर प्रतिहल्ला केला… मात्र,  भारतानं पाकिस्तानचा कट उधळून लावला असून उलट पाकिस्तानलाच खाक केलंय. त्यामुळे त्यांचे लष्करप्रमुख आणि पंतप्रधान भारताच्या भीतीनं गायब झाले आहेत.

पाकिस्तानचा जम्मूवर वार

जम्मूच्या पूँछ आणि कुपवाड्यात पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारात मोठं नुकसान झालंय. अनेक घरांचं गोळीबारामध्ये नुकसान झालं. थेट घरांमध्ये देखील गोळ्या शिरल्याचं दृश्यांमधून दिसतंय. तर तिकडे कुपवाड्यात तोफ-गोळ्यांच्या हल्ल्यानं घराच्या भींती पडल्या आहेत. जम्मूच्या सांबा आणि उरीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात नुकसान झालंय. सांबात अनेक घरांमध्ये गोळ्या शिरल्यात तसंच रात्रभर गोळीबाराचा आवाज सुरू असल्याचं इथल्या स्थानिकांनी सांगितलंय. उरीमध्ये देखील अशीच परिस्थिती होती. उरीमध्ये गाड्यांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. राजौरी, बारामुल्लाला देखील पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं होतं. या भागात देखील रात्री ब्लॅक आऊट घोषित करण्यात आला होता. पाकिस्ताननं या परिसरात जोरदार गोळीबार केला होता. यामुळे काही काळ या ठिकाणी भीतीचं वातावरण असल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. पाकिस्ताननं केलेले हल्ले भारतानं परतवून लावले आहेत. तसंच पाकिस्तानचे ड्रोन, मिसाईल्स भारतानं हवेतच हाणून पाडलेत त्यामुळे पाकिस्तानचा कट भारतानं उधळून लावला आहे. पाकिस्तानला भारताच्या धार्मिक स्थळांवर हल्ला करायचा होता. अशी माहिती भारतीय लष्करी अधिका-यांनी दिलीय. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा भारतानं बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवला. तरीही पाकिस्तान सुधारला नाही. त्यानं पुन्हा भारतावर हल्ला केला. मात्र, या हल्ल्यात पाकिस्तानचंच मोठं नुकसान झालंय.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments