
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर जवळपास १०० प्रवासी तब्बल १६ तास अडकून पडले होते. हे प्रवासी इस्तंबूलला जाणाऱ्या विमानाने प्रवास करणार होते. मात्र, तांत्रिक कारणास्तव विमानाला उशीर झाला. त्यानंतर इंडिगोने प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल माफी मागितली . फ्लाइट ६ ई १७ सकाळी ६:५५ वाजता इस्तंबूलसाठी रवाना होणार होते. त्यानंतर सकाळी ११ वाजता दुसरे विमान सोडण्यात येणार असल्याचे विमान कंपनीने जाहीर केले.





