[ad_1]
भारतीय जनता पार्टीने सर्वात आधी उमेदवारांची जाहीर करून राज्यात राजकीय पक्षांमध्ये बाजी मारली. मात्र उमेदवारांच्या यादीनंतर पक्षात प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावल्याचे दिसून येत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात बंड माजू नये यासाठी नाराजी दूर करण्यासाठी मुंबई, दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. आज सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर भाजपतील अनेक नाराजांनी हजेरी लावून आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
[ad_2]
Source link
