
भूसे म्हणाले की, केंद्र सरकारच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, दर पडणार नाहीत, याची काळजी राज्य सरकार घेईल. कांदा जास्त दिवस टिकवता येत नाही. त्याच्यावर प्रक्रिया करुन टिकवण्यासाठीचा मोठा खर्च येतो. त्यामुळे उद्या कांदा २५ रुपयावर गेला तर, ज्याला परवडत नाही, त्याने २ ते ३ महिने कांदा खाल्ला नाही तर कुठे बिघडतंय, असे म्हणत दादा भुसे यांनी काद्यावरील निर्यात बंदीच्या निर्णायावर भाष्य केलं आहे.



