Saturday, September 19, 2026
Homeमनोरंजनअभिनेते विनय आपटे स्वतःजवळ का ठेवायचे बंदूक? तुम्ही ऐकलाय का त्यांचा ‘हा’...

अभिनेते विनय आपटे स्वतःजवळ का ठेवायचे बंदूक? तुम्ही ऐकलाय का त्यांचा ‘हा’ किस्सा?

[ad_1]

विनय आपटे यांनी जसे चित्रपट आणि मालिका गाजवल्या, तशीच यांनी नाटकं देखील गाजवली. त्यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक तर गाजलंच, पण वादग्रस्तही ठरलं. एक मोहीम हाती घ्यायची असं म्हणत त्यांनी हे नाटक केलं होतं. या नाटकाचं निर्माती उदय धुरत यांनी केली होती. तर, लेखन प्रदीप दळवी यांनी केले होते. अशा ज्वलंत विषयावर आधारित हे नाटक घेऊन ते अनेक दिग्दर्शकांकडे गेले होते. मात्र, प्रत्येकांनी त्यांना नकारच दिला होता. अखेर विनय आपटे यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी हाती घेतली. विनय आपटे यांनी आधी नाटकाची स्क्रिप्ट व्यवस्थितरित्या वाचून घेतली. इतकंच नाही तर, त्यामध्ये बरेच फेरफारही केले. कारण, सगळ्यांना महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेंनी केली आहे इतकंच माहीत होतं. पण ती का केली? ही दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments