
शिक्षणाचे माहेरघर तसेच सुसंस्कृत शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात जादु टोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षेत सतत येणाऱ्या अपयशामुळे नैराश्येत गेलेल्या तरुणाला परीक्षेत यश मिळवून देण्याच्या नावाखाली महिलेने आपले पाय धुतलेले पाणी प्यायला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर महिलेने या तरुणाला राखही खायला दिली. त्याचबरोबर तरुणाला दीड लाख रुपयांना गंडा घातल्याचेही उघडकीस आले आहे. या प्रकरामुळे पुण्यात खळबळ माजली असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी भोंदुगिरीचा हा प्रकार उघडकीस आणला आहे.






