
Uttar Pradesh Viral News: लग्न हे सात जन्मांचे बंधन असते असे म्हटले जाते पण काही नाती केवळ नफ्यासाठी बनवली जातात. लग्नानंतर वधू- वर फसवून पळून जातात, असे अनेकदा ऐकायला मिळते. असाच काहीसा प्रकार आझमगडमधूनही समोर आला आहे. जिथे एका व्यक्तीने फेसबुकवर तरुणीशी मैत्री केली. मग हळूहळू दोघांमध्ये प्रेम जुळले. त्यानंतर घरच्यांच्या इच्छेने त्यांनी लग्नही केले. मात्र, काही महिन्यांनंतर वधू सासरच्या मंडळींचे सर्व दागिने घेऊन फरार झाली.