
‘पूर्वी ग्रामीण भागात जातींचा उल्लेख सहजतेने व्हायचा. त्यात कुणालाही वाईट वाटत नव्हते. नात्यांमध्ये सहजता आणि नैसर्गिकता होती. गुण्यागोविंदाने सुरू असलेल्या या नात्यांत विष पेरण्याचे काम राजकारणाने केले’, अशी खंत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी व्यक्त केली.