
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. याआधी त्यांनी आपल्या भवितव्याबद्दल आणि भूतकाळाबद्दल चिंता आणि शंका व्यक्त केल्या आहेत. त्यांनी म्हटले की, अनेकदा मला प्रश्न पडतो की, न्यायव्यवस्थेत आपल्याला जे करायचे होते, ते साध्य झाले का? इतिहास आपला कार्यकाळाचे मुल्यमापन कसे करेल. मात्र, या प्रश्नांची बहुतांश उत्तरे आपल्या नियंत्रणाबाहेर असून त्याची उत्तरे आपल्याला कधीच मिळणार नाहीत, अशी कबुलीही त्यांनी दिली.