
भारतीय हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार दिवसात देशभरात पावसाचा नवा टप्पा सुरु होण्याची चिन्हं दिसत आहेत. कोकण किनारपट्टी,गोवा आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल, अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सातारा, पुणे, कोल्हापूर आणि सांगली तसेच पश्चिम महाराष्ट्रातील तापमानाच सरासरी २ अंशांची घट होणार असून हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज आहे.



