
अनुराग ठाकूर यांनी पुढे लिहिले की, ‘त्यांना ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटातील सुंदर भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित वहीदाजी यांनी भारतीय स्त्रीचे समर्पण, सामर्थ्य आणि वचनबद्धतेच्या उत्तम उदाहरण आहेत. एकीकडे संसदेत नारीशक्ती वंदन अधिनियम मंजूर होत असताना, त्यांना या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करणे म्हणजे भारतीय मनोरंजन विश्वात काम करण्याऱ्यास्त्रीचा सन्मान आहे.’








