
नोटीसीत म्हटले आहे की, धुळे जिल्हयातील अंतुर्ली येथील सभेत उपस्थितांना संबोधित करताना आपण महिलांचा अवमान होईल, असे वक्तव्य केले असल्याबाबतचे व्हिडिओ माध्यमांवरुन प्रसारित झाले आहेत. आपण केलेल्या वक्तव्यांमुळे समाजातील सर्व स्तरांतुन तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. कोणत्याही राज्याच्या प्रगतीचा आलेख त्या राज्यातील स्त्रियांची स्थिती आणि सुरक्षितता यावरुन ठरविला जातो. लोकप्रतिनिधींच्या वक्तव्याचा व वर्तनाचा दिर्घ परिणाम समाजमनावर होतो आणि त्यातुनच सुदृढ वैचारिक समाजाची निर्मिती होत असते. सकल समाज घडवण्याची प्राथमिक जबाबदारी ही लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळेच लोकप्रतिनीधींनी समाजात वावरताना त्यांच्यावर असलेल्या या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. तरी आपण केलेल्या वक्तव्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम, १९९३ कलम १२ (२) व १२ (३) नुसार आयोगास तीन दिवसात प्राप्त होईल, अशारितीने खुलासा सादर करावा.



