
आईची अवस्था पाहून अश्विनी आणि श्रेयस त्यांना पाणी द्यायचा प्रयत्न करतात. मात्र, शिल्पी त्यांना रोखणार आहे. तिचा पण तुम्ही मोडू नका, असं म्हणून शिल्पी आपल्या आईलाच पाणी देण्यापासून रोखणार आहे. शिल्पीचं वागणं पाहून अश्विनीचा मात्र संताप होणार आहे. आपल्या कुटुंबाला होणारा त्रास पाहून अश्विनी आता मोठा निर्णय घेणार आहे. अश्विनी आपल्या कुटुंबासोबत घरातून बाहेर पडणार की, शिल्पीला धडा शिकवणार हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.










