Tu Chal Pudha: संजूच्या कस्टडीवरून वाघमारेंच्या घरात सुरू होणार वाद; अश्विनी कुणाची साथ देणार?

0
13
Tu Chal Pudha: संजूच्या कस्टडीवरून वाघमारेंच्या घरात सुरू होणार वाद; अश्विनी कुणाची साथ देणार?


अश्विनीने कधीच आपल्या पुढे जाऊ नये, असे शिल्पीला वाटते. त्यामुळे ती शक्य ते सगळे प्रयत्न करून अश्विनीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. तिने या कटात पती विद्युतचा मित्र विक्रम याची मदत घेतली होती. यासाठी शिल्पीने आपल्या पतीची साथ सोडून विक्रमसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान तिने विद्युतचं घर सोडताना सोबत स्वतःच्या मुलाला अर्थात संजूला देखील सोबत विक्रमकडे नेलं. आता मात्र, विद्युतने शिल्पीसोबतच नातं तोडण्याचा निर्णय घेतला असून, त्याने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. मात्र, घटस्फोटानंतर आपल्या मुलाची म्हणजेच संजूची कस्टडी आपल्याला मिळावी यासाठी तो प्रयत्न करत आहे.



Source link