Tuesday, August 11, 2026
Homeफलटणनिरा उजवा कालवा ठरला जीवघेणा; बंडू बोडरे यांच्या धाडसाने दोन जणांना मिळाले...

निरा उजवा कालवा ठरला जीवघेणा; बंडू बोडरे यांच्या धाडसाने दोन जणांना मिळाले जीवनदान

फलटण :- फलटण तालुक्यातील निरा उजवा कालव्यात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनली आहे. राजे गटाचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते श्री. गोविंद दिलीपराव बोडरे उर्फ बंडू यांनी आपल्या अद्वितीय धाडसाने दोन नागरिकांचे प्राण वाचवून मानवतेचा आदर्श घालून दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कालव्यातून जात असलेली एक चारचाकी गाडी अचानक पाण्यात बुडू लागली. परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती आणि मदतीसाठी वेळ फारच कमी होता. अशा बिकट प्रसंगी क्षणाचाही विलंब न करता बंडू बोडरे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत थेट कालव्यात उडी घेतली.
प्रसंगावधान राखत त्यांनी कौशल्याने गाडीत अडकलेल्या दोघांना बाहेर काढले आणि स्वतः पोहत त्यांना सुरक्षित किनाऱ्यावर आणले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे दोन निष्पाप जीव वाचले.
या शौर्यपूर्ण कामगिरीमुळे परिसरात बोडरे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या बरड गटाच्या सदस्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करत कृतज्ञता व्यक्त केली.
याशिवाय, मा. श्री. मारुती सांगळे (संचालक, श्रीराम सहकारी साखर कारखाना, फलटण), श्री. संदीप कांबळे (केंद्रप्रमुख, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, सातारा), तसेच उदय बागाव आणि अमोल बागाव यांनीही बोडरे यांच्या धाडसाचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
ही घटना नागरिकांमध्ये धैर्य, तत्परता आणि माणुसकीचा संदेश देणारी ठरली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments