
पुढे तेजश्रीने लिहिले की, ‘इतकी वर्ष कामावर श्रद्धा ठेवून सातत्याने तुमच्या समोर येत राहीले..पडले, धडपडले, पुन्हा उठले.. आधाराला फक्त काम होतं… शाश्वत फक्त काम होतं. इतकी वर्ष त्याच कामाने मला घट्ट धरून ठेवलं आणि त्या कामाला तुम्ही. आज हे असं व्यक्त होण्याचा उद्देश इतकाचं… सांगावसं वाटलं, ‘मला जाणीव आहे तुमच्या आयुष्यातल्या ‘त्या’ अर्ध्या तासाची, जो तुम्ही माझ्या नावावर करता. जाणीव आहे त्या प्रेमाची, त्या आत्मियतेची आणि नकळत तुमच्या डोळ्यातून कधीतरी येणाऱ्या ‘त्या’ अश्रुच्या थेंबाची.. जो कधी लक्ष्मीसाठी, कधी जान्हवीसाठी, कधी शुभ्रासाठी आणि आता मुक्तासाठी ढळतो.. आणि हीच जाणीव सातत्याने पोटतिडकीने काम करण्याचं आणि त्या कामाशी एकनिष्ठ राहण्याचं बळ देत आली आहे. या पुढे ही देत राहील. पुन्हा एकदा… मनापासून आभार. असेच कायम माझ्या पाठीशी रहा. बाकी आयुष्य आनंदी आहेचं.’








