
जम्मू काश्मीर मध्ये, भारत पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारण्याचे काम पूर्ण झाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉर्डर टुरिझमची संकल्पना मांडली होती. त्या योजनेअंतर्गत छत्रपतींचा पुतळा भारत-पाक सीमेवर स्थापीत करण्यात आला आहे. भारत-पाक सीमेवर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा महाराष्ट्रातील प्रत्येकासाठी अभिमानाचा क्षण आहे.






