
Maharashtra school time change : राज्यातील प्राथमिक शाळा या सकाळी भरतात. मुलांची शाळा सकाळी असल्याने त्यांना झोपेतून उठवून शाळेची तयारी करून त्यांना शाळेत पाठवणे हे पालकांसाठी दिव्य काम असतं. सकाळी शाळा असल्यामुळे मुलांची झोप पूर्ण न होऊन त्यांच्या प्रकृतीवर देखील परिणाम होत असल्याच्या तक्रारी होत्या. सध्या हिवाळा सुरू असून भर थंडीत मुलांना शाळेत जावे लागत असल्याने मुळे गारठत असल्याने यासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांनी या शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधानसभेत केली असून आता नव्या वेळेत वर्ग भरणार असल्याने पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.





