
आसाममधील दिमा हसाओ जिल्ह्यातील दिबालोंग स्थानकात आगरतळा-लोकमान्य टिळक टर्मिनल एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले. ईशान्य सरहद्द रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी झालेल्या या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. रुळावरून घसरलेल्या डब्यांमध्ये पॉवर कार (जनरेटर पार्ट) आणि ट्रेनच्या इंजिनचा समावेश आहे.