
होळी-दिवाळी असेल किंवा छठ पूजा विशेष करून सणा-सुदीच्या काळात ट्रनमधून प्रवास करणे एक आव्हान असते. खचाखच भरलेल्या ट्रेनची तिकटी काही महिने आधीच फुल्ल झालेली असतात. लोकांना घर पोहोचण्यासाठी कन्फर्म तिकीट मिळत नाहीत. वेटिंग लिस्ट लांबच लांब होत जाते. वेटिंग तिकीटांची झंझट केवळ प्रवाशांसाठीच नाही तर रेल्वे व्यवस्थापनासाठीही डोकेदुखी ठरत आहे. मात्र आता वेटिंग तिकीटाची झंझट संपवण्यासाठी रेल्वेने नवीन योजना बनवली आहे. यासाठी रेल्वे १ लाख कोटी रुपये खर्च करणार आहे.






