भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी राज्यातील किती गावांना दरड कोसळण्याचा धोका आहे?, असा प्रश्न विधानपरिषदेत विचारला होता. त्यावर मदत व पुनवर्सनमंत्री अनिल पाटील उत्तर देताना म्हणाले की, रायगडमधील इर्शाळवाडी घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका अनेक गावांना आहे. कोकणातील अशी एकूण २११ गावं आहे, ज्यात दरडी कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळंच आम्ही रायगड जिल्हा प्रशासनाला हायअलर्टवर राहण्याचा इशारा दिल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळं आता कोकणातील पोलीस, स्थानिक नागरिक, प्रशासन आणि अन्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.







