
गणेश उत्सव संपवून मुंबईकडे परतणाऱ्यांच्या बसला रायगडमध्ये मोठा अपघात (Raigad accident) झाल्याचे समोर आले आहे. रायगडहून मुंबई (ऐरोली) ला येणाऱ्या बसला मोठा अपघात झाला असून ही बस ३० ते ४० फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. रायगड जिल्ह्यातील पाचाड आणि कोंझर दरम्यानच्या घाटात हा अपघात झाला आहे. बसमध्ये २० प्रवासी होते. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. घाटात वळण घेत असताना चिखलामुळे बस घसरली व खाली दरीत कोसळली.