
देशात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतरही अल्पकाळ ते या पदावर होते. मात्र, अनेक बाबतीत त्यांचं मोदी सरकारशी जमलं नाही. केंद्राच्या नोटबंदीच्या निर्णयाला त्यांचा विरोध होता. केंद्र सरकारला जे काही साध्य करायचं आहे, तो नोटबंदीसारखा निर्णय न घेताही साध्य करता येईल, असं राजन यांचं मत होतं. मात्र, केंद्र सरकारनं त्यांच्या मताला फारसं महत्त्व दिलं नाही. कालांतरानं ते या पदावरून दूर झाले. मात्र, भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर ते अधूनमधून मत मांडत असतात.





