
वाहतूक आयुक्त मगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायकल चालवताना हेल्मेट वापरणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचे आहे. पुण्यात गेल्यवर्षीच्या तुलनेत यावर्षी झालेल्या अपघातात बहुतांश वाहनचालक हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात हेल्मेट वापराबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे आता पुण्यात हेल्मेट सक्ती केली जाणार आहे, अशी चिन्हे दिसू लागली आहे. त्यामुळे आरटीओने थेट कंपन्यांना नोटीसी बाजावून कंपनीत येतांना कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली आहे.






