
येत्या शुक्रवारी अनंत चतुर्दशी आणि शनिवारी साप्ताहिक सुट्टी असणार आहे. त्यामुळं सलग दोन दिवस मार्केट यार्ड बंद करण्यात आलं आहे. या दोन्ही दिवशी मार्केट यार्डातील भाजीपाला, फळ, कांदा-बटाटा विभाग आणि फुलांची खरेदी-विक्री बंद ठेवण्यात येणार आहे. खडकी, मोशी आणि मांजरी येथील उपबाजारही बंद राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता पुण्यासह सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पाऊस होत असतानाच शेतमाल आणि भाजीपाल्यांची विक्री होणार नाही. परिणामी शेतकऱ्यांवर मोठं आर्थिक संकट ओढावण्याची शक्यता आहे.




