
गेल्या काही दिवसांपासून मालिकेत सागर आणि सावनी सईची कस्टडी मिळवण्यासाठी भांडताना दिसत आहेत. सागरला सई पासून लांब राहताना त्रास होतोय. त्याला तिला घरी आणायचे आहे. दुसरीकडे सावनीचा बॉयफ्रेंड हर्षवर्धनला सागरला हारवायचे असल्यामुळे त्याला सईची कस्टडी हवी असते. या सगळ्यात सईला कोणासोबत रहायचे असे विचारताच सई मुक्ताचे नाव घेते. त्यावर मुक्ताचे वडील आणि सागरचे वडील एक तोडगा काढतात. ते मुक्ता आणि सागरचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.








