Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 87

हिवाळ्यात पोट खराब झालं तर काय खालं अन् काय टाळालं ?

0
हिवाळ्यात पोट खराब झालं तर काय खालं अन् काय टाळालं ?


पोट खराब झाल्यामुळे डिहायड्रेशन आणि भूक वाढते, पण काहीही खाल्ल्याने समस्या आणखी वाढू शकते. म्हणून, पोट खराब असल्यास तुम्ही काय खावे आणि काय खाऊ नये हे तुम्हाला माहित असले पाहिजे.

Add Zee News as a Preferred Source

पोट खराब होण्याबद्दल बोलत आहोत, ही एक सामान्य समस्या आहे जी प्रत्येकाला कधी ना कधी भेडसावते. विशेषतः जे बाहेरचे अन्न खातात. घरी शिजवलेले अन्न खाणाऱ्यांचे पोट नेहमीच निरोगी असते असे नाही. पोट खराब होण्याची अनेक कारणे आहेत. परंतु एकदा ते झाले की, पोटासाठी चांगले आणि कोणताही त्रास होणार नाही असे कोणते पदार्थ खावेत हे ठरवणे कठीण आहे. या लेखात, आम्ही पोट खराब होण्याची चिंता न करता तुम्ही खाऊ शकता असे काही पदार्थ शेअर करू. हे १० पदार्थ पोटासाठी सुरक्षित नाहीत तर पोट खराब होण्यास आणि ते त्याच्या मूळ स्थितीत परत आणण्यास देखील अत्यंत उपयुक्त ठरू शकतात.

पोट खराब झाल्यावर काय खावे

मूग डाळ

मूग डाळ खिचडी खाणे पोटदुखीसाठी फायदेशीर आहे. जेव्हा तुमचे पोट खराब असते तेव्हा तुम्ही नेहमी हलके, सहज पचणारे अन्न खावे. अशा वेळी मुग डाळ खिचडीपासून बनवलेली खिचडी उत्तम असते. दह्यासोबत मुग डाळ खिचडी खाल्ल्याने पचन सुधारते.

दही आणि भात

पोटदुखीसाठी दही आणि भात खाणे देखील खूप फायदेशीर आहे. हे अन्न पोटासाठी खूप हलके आणि सहज पचणारे आहे. भातामध्ये स्टार्च असते आणि दह्यामध्ये प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात. हे दोन्ही पोट बरे करण्यास खूप उपयुक्त आहेत.

ओट्स

पोटदुखीसाठी ओट्स खाणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते. त्यात भरपूर फायबर असते, जे पोट शांत करण्यास खूप मदत करते. कोमट दुधात ओट्स मिसळून खाल्ल्याने पोट शांत होण्यास मदत होते.

सफरचंदाचा रस

सफरचंद खाणे किंवा त्याचा रस पिणे देखील पोट शांत करण्यास खूप फायदेशीर आहे. लाकूड सफरचंदाचा रस फायबरने समृद्ध असतो.

गाजराचा रस

गाजर खाल्ल्याने पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते. त्याचा रस पिल्याने पोटही शांत होण्यास मदत होते.

नारळपाणी
पोट खराब झाल्यास अनेकदा शरीरात डिहायड्रेशन होते. नारळपाणी ही कमतरता भरून काढण्यास खूप मदत करते. ते केवळ डिहायड्रेशन दूर करण्यास मदत करते असे नाही तर नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा एक उत्कृष्ट स्रोत देखील आहे.

पपई
जर तुमचे पोट खराब असेल तर पपईचे सेवन नक्की करा. त्यात भरपूर व्हिटॅमिन सी असते. काही दिवस पपई खाल्ल्याने पचन सुधारू शकते.

केळी
केळी खाणे तुमच्या पोटासाठी देखील खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला वारंवार आतड्याची हालचाल होत असेल तर केळी खाल्ल्याने आराम मिळेल. केळीतील पेक्टिन पोट घट्ट होण्यास मदत करते.

सफरचंद
पोटदुखीसाठी देखील सफरचंद खाणे खूप फायदेशीर आहे. सफरचंदात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे तसेच पेक्टिन आणि एंजाइम असतात.

पोट खराब असताना काय खाऊ नये

जेव्हा तुमचे पोट खराब असेल तेव्हा जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ, कोल्ड्रिंक्स, जंक फूड किंवा फास्ट फूड खाणे टाळा. धान्यांमध्ये, नवीन तांदूळ, हरभरा आणि काळे उडीद टाळा. फळे आणि भाज्यांमध्ये, द्राक्षे, फणस, बीन्स आणि बथुआ टाळा. पचनक्रिया खराब असल्यामुळे, हे योग्यरित्या पचत नाहीत, ज्यामुळे पोटाची समस्या वाढते. म्हणूनच अशा वेळी त्या सर्व गोष्टी टाळल्या पाहिजेत.





Source link

‘या’ व्यक्तींसाठी लिंबू पाणी पिणे ठरू शकते घातक? जाणून घ्या यामागचे नेमके कारण

0
‘या’ व्यक्तींसाठी लिंबू पाणी पिणे ठरू शकते घातक? जाणून घ्या यामागचे नेमके कारण


Lemon Water For Health: लिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. निरोगी आरोग्यापासून ते त्वचेच्या सौंदर्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. एवढेच काय तर, सध्याच्या काळात वजन कमी करण्यासाठी सकाळी गरम पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिणे हा एक ट्रेंड बनला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? की, लिंबू पाणी पिणे सर्वांसाठीच फायदेशीर नसते. काही व्यक्तींच्या आरोग्यासाठी ते धोकादायकही ठरू शकते. यापासून वाचण्यासाठी लिंबू पाण्याचे सेवन कोणी करावे किंवा करू नये, तसेच कशाप्रकारे केल्यास योग्य ठरते याबाबत सर्वांना योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

Add Zee News as a Preferred Source

 

लिंबू पाणी पिण्याचे काय फायदे आहेत?

लिंबू पाणी हे एक आरोग्यदायी, शरीर डिटॉक्स करणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे सुपरड्रिंक मानले जाते. लिंबाच्या आंबट आणि तजेलदार चवीमुळे लगेचच ताजे-तवाने वाटते. तसेच लिंबू पाणी पिण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, यामुळे शरीराची पचनसंस्था सुधारते आणि लिंबामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट गुणधर्म शरीराला डिटॉक्स करण्याचे काम करते. लिंबामध्ये मोठ्याप्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते, जे रोगप्रतिकारशक्ती तर वाढवते सोबतच शरीरात लोह शोषून घेण्यास मदत करते. तसेच त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्येही लिंबाचा वापर केला जातो. शरीरात अशक्तपणा आल्यास, भोवळ किंवा चक्कर आल्यास डॉक्टर सुद्धा लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात. कारण ते एखाद्या एनर्जी ड्रिंकप्रमाणे काम करते.

 

लिंबू पाणीचे सेवन कोणत्या व्यक्तींसाठी हानिकारक आहे?

लिंबू पाणी पिण्याचे जसे फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटेही आहेत. जर तुम्हाला अ‍ॅसिड रिफ्लिक्स, गॅस्ट्राइटिस, अल्सर यांसारख्या समस्या असतील किंवा तुमचे पोट संवेदनशील असेल तर; लिंबू पाणीचे सेवन करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. तसेच तुम्ही वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकामी पोटी लिंबाच्या पाण्याचे सेवन करत असाल तर असे करणे टाळा. यामुळे तुम्हाला पोटात जळजळ, ब्लोटिंग, मळमळणे किंवा अ‍ॅसिड रिफ्लिक्सचे प्रमाण वाढू शकते. याशिवाय जर तुम्हाला दाताच्या समस्या असतील तर लिंबू पाणी पिल्याने त्यातील अ‍ॅसिडक चव दातांवर असलेल्या एनेमल थराला नुकसान पोहोचवू शकते. यामुळे दातांची संवेदनशीलचा वाढून दातांचे दुखणे वाढण्याची शक्यता असते.

 

तसेच जर तुम्हाला तोंडाचा अल्सर किंवा तोंड येण्याच्या समस्या असतील तरी देखील लिंबू पाणी पिणे टाळले पाहिजे, यामुळे जळजळ अधिक वाढण्याची शक्यता असते. तु्म्ही रोजच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या औषध-गोळ्यांचे सेवन करत असाल तर, लिंबू पाणी पिल्याने त्यातील अ‍ॅसिडीक गुणधर्मांमुळे औषधांच्या परिणामांमध्ये अडथळा येण्याची शक्यता असते. याशिवाय काहीवेळा लिंबू पाणी डोके दुखी आणि माइग्रेन वाढण्याचे कारणही बनू शकते. काहीवेळा अ‍ॅलर्जी होण्याचीही शक्यता असते. लिंबाच्या पाण्यात काहीप्रमाणात डायुरेटिक असते, ज्यामुळे शरीरातील युरीनचे प्रमाण वाढते. ज्या व्यक्तींना आधीपासूनच किडनीच्या समस्या असतील त्यांनी लिंबू पाणी पिणे प्रकर्षाने टाळले पाहिजे.

 

लिंबू पाणीचे सेवन करण्याची योग्य पद्धत कोणती?

यासगळ्या समस्यांपासून वाचण्यासाठी योग्य प्रकारे लिंबू पाण्याचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी कधीही लिंबू पाणी बनवताना ग्लासभर पाण्यात बनवत असाल तर फक्त अर्ध्या लिंबाचा वापर करा. रिकामी पोटी लिंबू पाणी पिणे टाळा. लिंबू पाणी पिल्यानंतर साध्या पाण्याने गुळण्या करा. तेसच साधारण 30 मिनिटांनंतर दात टूथ ब्रशने स्वच्छ करा. जर तुम्ही रोजच लिंबाच्या पाण्याचे सेवन करत असाल तर, दिवसभरात केवळ 1 ते 2 ग्लास या प्रमाणात करा. तसेच दात दुखी, पोटाच्या समस्या किंवा जळजळ होत असल्यास लिंबाच्या पाण्याचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

Pune Land: अमेडिया कंपनीला धक्का, बुडवलेल्या 210000000 दस्तनोंदणी संदर्भात मोठा निर्णय!

0
Pune Land: अमेडिया कंपनीला धक्का, बुडवलेल्या 210000000 दस्तनोंदणी संदर्भात मोठा निर्णय!


Pune Land Scame: पुण्यात एका मोठ्या जमीन व्यवहारात अमेडिया डेव्हलपर्स कंपनीने दस्तनोंदणी करताना स्टॅम्प ड्युटी (मुद्रांक शुल्क) टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी जवळपास 21 कोटी रुपये सरकारला देणे टाळले होते. झी २४ तासने हा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. आता या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली आहे.

Add Zee News as a Preferred Source

अमेडीयाला मोठा झटका

पुणे जिल्हा सह-निबंधक संतोष हिंगणे यांनी नुकताच निकाल दिला आहे. अमेडिया कंपनीचा सर्व दावा फेटाळण्यात आला. त्यांना आता स्टॅम्प ड्युटीतून सूट मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे. म्हणजे कंपनीने जे 21 कोटी रुपये सरकारचे बुडवले होते, ते परत भरावेच लागणार.

नेमके किती पैसे द्यावे लागणार?

कंपनीला आता मूळ बुडवलेली स्टॅम्प ड्युटी 20 कोटी 99 लाख 99 हजार 500 रुपये भरावी लागेल. त्याचबरोबर उशीर झाल्याबद्दल 1 कोटी 47 लाख रुपये दंडही द्यावा लागणार. एकूण साधारण 22 कोटी 47 लाख रुपये कंपनीला सरकारला द्यावे लागतील.

किती वेळ दिला आहे?

पुढचे फक्त 60 दिवस म्हणजे 2 महिने आत ही संपूर्ण रक्कम भरावी लागेल, असे स्पष्ट आदेश सह-निबंधकांनी दिले आहेत. गेल्या आठवड्यात हिंगणे यांच्या कार्यालयात याबाबत अंतिम सुनावणी झाली होती, त्यानंतर हा निकाल आला. 

याचा अर्थ काय?

हा निकाल म्हणजे जमीन व्यवहारात मुद्दाम गुंतागुंतीचे करून स्टॅम्प ड्युटी टाळणाऱ्या बिल्डर कंपन्यांना मोठा इशारा आहे. सरकारचे पैसे बुडवण्याचा प्रयत्न केला तर कडक कारवाई होईल, असा संदेश पुणे प्रशासनाने दिला आहे. आता अमेडिया कंपनीकडे फक्त 60 दिवसांची मुदत आहे. अन्यथा आणखी मोठा दंड आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते.

FAQ

१. प्रश्न : अमेडिया कंपनीला आता किती पैसे भरावे लागणार आहेत?

उत्तर : कंपनीने दस्तनोंदणीच्या वेळी बुडवलेले मूळ २० कोटी ९९ लाख ९९ हजार ५०० रुपये स्टॅम्प ड्युटी + उशिराच्या १ कोटी ४७ लाख रुपये दंड. म्हणजे एकूण साधारण २२ कोटी ४७ लाख रुपये सरकारला द्यावे लागतील.

२. प्रश्न : ही रक्कम कधीपर्यंत भरायची आहे?

उत्तर : पुणे जिल्हा सह-निबंधकांनी स्पष्ट आदेश दिलेत की, निकाल आल्यापासून फक्त ६० दिवस (म्हणजे २ महिने) आत ही संपूर्ण रक्कम भरावीच लागेल. एक दिवसही उशीर झाला तर आणखी दंड वाढेल.

३. प्रश्न : हा निकाल का महत्त्वाचा आहे?

उत्तर : बिल्डर कंपन्या जमीन व्यवहारात गुंतागुंतीचे करून सरकारची स्टॅम्प ड्युटी बुडवतात, अशा प्रकारांना हा मोठा दणका आहे. आता कुणीही असा घोटाळा करायचा प्रयत्न केला तर कडक कारवाई होईल असा इशारा सरकारने दिला दिला आहे. झी २४ तासने हा घोटाळा उघडकीस आणला होता, त्यामुळेच ही कारवाई झाली.





Source link

कमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थिनींचा विज्ञान प्रश्नमंजुषेत प्रथम क्रमांक

0
कमला निंबकर बालभवनच्या विद्यार्थिनींचा विज्ञान प्रश्नमंजुषेत प्रथम क्रमांक

फलटण: पंचायत समिती फलटण शिक्षण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल, कोळकी येथे संपन्न झाले. या प्रदर्शनातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत कमला निंबकर बालभवन शाळेच्या विद्यार्थिनींनी उत्तुंग यश मिळवले.

शाळेतील इयत्ता नववीच्या वैष्णवी फुलचंद तावरे, खुशी रा. दोशी आणि इयत्ता दहावीच्या श्रेया सुरेश यादव यांनी माध्यमिक गटातून प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत हुशारीने दिलेल्या उत्तरे आणि उत्कृष्ट तयारीच्या जोरावर या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या सन्मानार्थ त्यांना प्रशस्तीपत्रक, पारितोषिक आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली.

या विज्ञान प्रदर्शनात कमला निंबकर बालभवन शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेले ‘SMART IRRIGATION’ हे वैज्ञानिक उपकरण सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.या उपकरणात इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक आणि यांत्रिक ऊर्जा यांचा संयोजनात्मक वापर करण्यात आला आहे. उपकरणातील सेन्सर मातीतील ओलावा आणि पाण्याचे प्रमाण तपासतो आणि त्यानुसार शेती किंवा बागेला आवश्यक तेवढेच पाणी पुरवतो. यामुळे पाण्याची तसेच विजेची बचत मोठ्या प्रमाणावर होऊ शकते.
हे उपकरण तयार करण्यासाठी कॉम्प्युटर विभागाचे शिक्षक श्री. तेजस राऊत यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. या प्रकल्पात इयत्ता नववीचे रुद्र ढेंबरे आणि प्रियांका विक्रांत गांधी यांनी सहभाग घेतला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींवर तसेच ‘SMART IRRIGATION’ उपकरण तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रश्नमंजुषेसाठी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट तयारी करून देणाऱ्या मार्गदर्शक शिक्षिका सौ. आसावरी राजेश शिंदे यांचेही विशेष कौतुक करण्यात आले.
शाळेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. गीता बोबडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. प्रियदर्शिनी सावंत, शिक्षण समन्वयक मधुरा राजवंशी, विशेष सल्लागार व शिक्षक विश्वास जगदाळे, तसेच सर्व शिक्षकांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नवी एन्ट्री! माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांचे पुतणे गणेश विलास साने निवडणुकीच्या रिंगणात

0
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नवी एन्ट्री! माजी विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांचे पुतणे गणेश विलास साने निवडणुकीच्या रिंगणात

पिंपरी चिंचवड : महाराष्ट्रात लवकरच महानगरपालिकांचे बिगुल वाजेल. सत्ता – समीकरणाची गणिते जुळविण्याची लगबग सुरू होईल. याचं साऱ्या निवडणुकीच्या धामधुमीत काही नवीन चेहरे देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

याचं पार्श्वभूमीवर पिंपरी – चिंचवड मध्ये देखील नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील जनतेची अनेक वर्ष सामाजिक – राजकीय सेवा केलेले पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता काका साने यांचे पुतणे गणेश विलास साने यांनी देखील आपण यंदाची पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक, प्रभाग क्रमांक ११ मधून लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.

लहानपणापासून आपले काका दत्ता साने यांच्या लोकसेवेच्या तालमीत समाजकारणाचे धडे गिरवत असताना, आपणही काकांसारखे जनतेच्या सेवेसाठी काम करण्याचा मानस त्यांनी उराशी बाळगला आणि आज प्रत्यक्षात ते निवडणुकीच्या रिंगणातून जनतेच्या सेवेसाठी पुढे येताना दिसत आहे.

दत्ता काका साने यांच्या जडणघडणीतून सज्ज झालेले गणेश विलास साने नक्कीच येणाऱ्या काळात आपल्या कामातून प्रभाग क्रमांक ११ मधील जनतेच्या मनावर ठसा उमटवतील अशी चर्चा सध्या जनतेमधून होताना दिसत आहे.

Eye Care: दृष्टी कमी होण्याची सुरुवातीची ‘ही’ लक्षणे दुर्लक्षित करू नका! आधीच व्हा सावधान

0
Eye Care: दृष्टी कमी होण्याची सुरुवातीची ‘ही’ लक्षणे दुर्लक्षित करू नका! आधीच व्हा सावधान


Which Early Signs of Vision Loss You Should Never Ignore: वय कोणतेही असो, जर डोळ्यांनी दिसत नसेल किंवा कमी दिसत असेल, तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे डोळ्यांना कमी दिसू लागते. परंतु अशी काही प्रारंभी लक्षणे आहेत ज्यांच्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याकडे कानाडोळा करू नये. याबद्दल अधिक जाणून घेऊयात डॉ अग्रवाल्स् आय हॉस्पिटल, पिंपरी चिंचवडचे कन्सल्टंट ऑप्थॅल्मोलॉजिस्ट डॉ. सोनल एरोले यांच्याकडून… 

Add Zee News as a Preferred Source

अस्पष्ट दिसणे

वय कोणतेही असो, हळूहळू किंवा मग अचानकच चष्मा घालूनही दृष्टी धुसर होऊ शकते, आणि याची लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे. प्रौढ व्यक्तींना मोतीबिंदूमुळे हळूहळू कमी दिसू लागू शकते आणि अचानक कमी दिसण्याची कारणे म्हणजे रेटिना वेगळा होणे (रेटिनल डिटॅचमेंट), रेटिनाची शिर किंवा धमनी यांमध्ये अडथळा निर्माण होणे, मधुमेह संबंधी रेटिनोपॅथीमध्ये बदल होणे ही असतात आणि त्यात व्हिट्रीयस हेमोर्र्हेज सामील असून त्यांच्यामुळे अचानकच दृष्टी जाऊ शकते व शक्य तितक्या लवकर हे कळविले पाहिजे.

  • मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये अस्पष्ट दिसणे ऑप्टिक न्यूरायटीससारख्या प्रकरणांशी संबंधित असू शकते.
  • प्रकाशाच्या सभोवताली दिसणारे वलय हे मोतीबिंदूमध्ये तसेच काचबिंदू म्हणजेच ग्लुकोमामधील बदल सूचित करतात.
  • रेटिना फाटल्याने आणि रेटिना वेगळा झाल्याने अचानक क्षणिक लख्ख प्रकाश (फ्लॅशेस) किंवा गोष्टी तरंगताना (फ्लोटर्स) दिसू लागतात.
  • मधुमेहामुळे होणारे रक्तस्त्राव, रेटिनाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळ्यांमुळे किंवा ग्लुकोमामुळे सुद्धा आपल्या डोळ्यांसमोर काळे डाग दिसू शकतात.
  • बऱ्याच वेळा मस्तिष्क तंत्रिकेत अर्धांगवायू (क्रॅनियल नर्व्ह पाल्सी) सारख्या न्यूरोलॉजिकल अवस्थांमुळे गोष्टी दुहेरी दिसू लागतात.
  • वयामुळे होणारे मॅक्युलर डिजनरेशन किंवा सेंट्रल सिरस रेटिनोपॅथी अशा मॅक्युलाशी संबंधित समस्यांमुळे प्रतिमा वाकड्या-तिकड्या किंवा विद्रुप दिसू शकतात.

म्हणून नोंदविल्यानुसार, वरील सर्व बाबी दृष्टी कमी होण्याची प्रारंभी लक्षणे असू शकतात आणि ही जर लवकर कळली, तर परिणामकारक सुधारणा केल्या जाऊ शकतात, दृष्टी जपता येते आणि पुढे जाऊन दृष्टी जाणे रोखता येऊ शकते आणि त्यावर उपचार केले जाऊ शकतात.

म्हणून जर आपल्याला अस्पष्ट दिसत असेल, गोष्टी दुहेरी दिसत असतील, काळे डाग दिसत असतील, डोळ्यांपुढे क्षणिक लख्ख प्रकाश (फ्लॅशेस) किंवा गोष्टी तरंगताना दिसत असतील (फ्लोटर्स) अथवा कोणत्याही सामान्य वस्तू तिच्या वास्तविक स्वरूपापेक्षा विद्रूप दिसत असेल, म्हणजेच प्रतिमा विद्रूप दिसत असेल, तर आपण नक्कीच याची दखल घेतली. नंबरचा चष्मा लावावा लागणाऱ्या, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या आणि कुटुंबात ग्लुकोमाचा इतिहास असलेल्या 50 वर्षांहून मोठ्या सर्व जेष्ठ रुग्णांनी विशेषतः सतर्क राहिले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे आणि या लक्षणांबद्दल त्वरित कळविले पाहिजे. तसेच त्यांनी दरवर्षी किमान एकदा डोळ्यांची तपासणी करून घेतली पाहिजे.





Source link

आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून गरोदर मुलीस अडीच लाखांत कला केंद्रात विकले: बीडमध्ये वंचित आघाडीने पोलिसांच्या मदतीने केली सुटका – Beed News

0
आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून गरोदर मुलीस अडीच लाखांत कला केंद्रात विकले:  बीडमध्ये वंचित आघाडीने पोलिसांच्या मदतीने केली सुटका – Beed News



आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या नांदेड येथील सात महिन्यांच्या गरोदर तरुणीला आई, वडिलांनी बाळंतपणासाठी घेऊन जातो म्हणून थेट अडीच लाखांत परळी तालुक्यातील कला केंद्रात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या म

.

त्र्यंबकेश्वरला 10 हजारांत बाळ विकल्याचा संशय

नाशिक | त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाकेदेवगाव येथील बर्ड्याची वाडी येथे 4 ऑक्टोबरला बाळंत झालेल्या एका महिलेच्या बाळाची तपासणी करण्यासाठी आशा सेविका गेली असता तिने 10 हजारांत बाळ ‘देवून’ टाकल्याचे कळले. तालुका वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस अधिकारी रात्री उशिरा या गावात पोहोचले तोपर्यंत संबंधित महिला आणि तिचा पती फरार झाले होते. बच्चीबाई विष्णू हाडोंगे (48) असे या महिलेचे नाव आहे. तिचे हे 14 वे अपत्य होते.

तरुणीचा पतीला फोन

15 दविसानंतर तरुणीने कला केंद्रातीलच एका तरुणीच्या मोबाईलहून पतीशी संपर्क साधला. पतीने नांदेडमधील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. नांदेडच्या पदाधिकाऱ्यांनी परळीतील पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. परळीतील वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद घाडगे व सहकाऱ्यांनी परळी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने कलाकेंद्र गाठून तिची सुटका केली.



Source link

SIP ने वाढवा, SWP सह आरामात जगा; कमाईचा सर्वात सोपा मार्ग; तुम्हाला कोणी सांगणार नाही!

0
SIP ने वाढवा, SWP सह आरामात जगा; कमाईचा सर्वात सोपा मार्ग; तुम्हाला कोणी सांगणार नाही!


Systematic Investment Plan: बाजारात चढ-उतार येत राहतात, पण खरी कमाई करायची असेल तर शिस्त, नियमित गुंतवणूक आणि वेळ देणे या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. यात सर्वात मोठी जादू आहे ती चक्रवाढ व्याजाची. जितका जास्त वेळ द्याल तितका पैसा आपोआप वाढतो. पैसे वाढवण्याच्या सोप्या टीप्स काय आहेत? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

फक्त पैसे जमा करून चालणार नाही

आज 1 कोटी दिसतात ते 20-30 वर्षांनी पुरेसे राहतील का? महागाई, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च यामुळे मोठी रक्कमही लवकर संपते. म्हणून पैवेळीच नियोजन करणे गरजेचे आहे. आजची गरज आणि उद्याची गरज या दोन्ही बाजू सांभाळायला हव्यात.

हजारोंचे कोटी बनवण्याचा सोपा मार्ग

दर महिन्याला थोडे थोडे पैसे म्युच्युअल फंडात टाका (SIP). 15-20-25 वर्षे सातत्य ठेवा. छोटी रक्कम हळूहळू खूप मोठी होते. इथे शिस्त आणि वेळेची ताकद दिसते.

SWP म्हणजे निवृत्तीनंतर नियमित पगार

जेव्हा मोठा फंड तयार होतो, तेव्हा तो पूर्ण काढायचा नाही. तो कमी जोखमीच्या फंडात हलवा आणि SWP सुरू करा. म्हणजे दर महिन्याला तुमच्या बँक खात्यात निश्चित रक्कम येत राहते – जणू काही नोकरीचा पगारच चालू आहे!

SIP + SWP = आयुष्यभराची आर्थिक सुरक्षा

पहिल्या टप्प्यात SIP ने संपत्ती तयार करा. नंतर SWP ने त्या संपत्तीचा नियमित उपयोग करा. या दोन्ही योजनांमुळे तुमचे पैसे कधीच संपत नाहीत आणि गरजेनुसार पैसेही मिळत राहतात

आजपासून सुरुवात करा

जितक्या लवकर SIP सुरू कराल तितकी मोठी संपत्ती तयार होईल. आणि जेव्हा निवृत्ती येईल तेव्हा SWP चा आधार असेल. हे दोन्ही मिळून तुम्हाला आयुष्यभर आर्थिक स्वातंत्र्य मिळेल.एक वाक्यात सांगायचे तर SIP ने पैसे वाढवायचे, SWP ने आरामात खर्च करायचे – हाच कमाई आणि जगण्याचा सर्वात सोपा, शिस्तबद्ध आणि सुरक्षित मार्ग असल्याचे तज्ज्ञ सांगतात.  

FAQ 

प्रश्न १. SIP आणि SWP म्हणजे नेमके काय?

उत्तर: SIP म्हणजे दर महिन्याला थोड्या थोड्या रकमेची म्युच्युअल फंडात गुंतवणूक. यामुळे छोटी बचत हळूहळू खूप मोठी होते.
SWP म्हणजे तयार झालेल्या मोठ्या फंडातून दर महिन्याला निश्चित रक्कम आपोआप बँकेत येणे – म्हणजे निवृत्तीनंतरही नियमित ‘‘पगार’’ मिळत राहतो.

प्रश्न २. SIP आणि SWP एकत्र का वापरावे?

उत्तर: SIP ने आयुष्याच्या पहिल्या टप्प्यात संपत्ती तयार होते, तर SWP ने निवृत्तीच्या टप्प्यात ती संपत्ती हळूहळू आणि सुरक्षितपणे खर्च करता येते. दोन्ही मिळून तुमचे पैसे कधीच एकदम संपत नाहीत आणि गरजेनुसार पैसेही मिळत राहतात. हेच आयुष्यभर आर्थिक सुरक्षेचे सूत्र आहे.

प्रश्न ३. SIP किती लवकर सुरू करावी?

उत्तर: जितक्या लवकर तितके चांगले! जर तुम्ही २५-३० वयात SIP सुरू केली तर ५५-६० वयापर्यंत खूप मोठा फंड तयार होतो. उशिरा सुरू केले तरी चालते, पण जितका जास्त वेळ मिळेल तितकी चक्रवाढ व्याजाची जादू जास्त काम करते. म्हणून ‘‘आजपासून’’ हा सर्वोत्तम दिवस आहे!





Source link

‘या’ 5 लोकांनी चुकूनही काकडी खाऊ नये, डाएटने तब्बेत सुधारण्यापेक्षा आणखी बिघडेल

0
‘या’ 5 लोकांनी चुकूनही काकडी खाऊ नये, डाएटने तब्बेत सुधारण्यापेक्षा आणखी बिघडेल


काकडी हा एक आरोग्यदायी अन्नपदार्थ आहे. पण इतर सर्व गोष्टींप्रमाणे, तो योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात सेवन केला पाहिजे. जर तुम्हाला वर सूचीबद्ध केलेल्या पाच समस्या असतील तर तुमच्या आहारातून काकडी वगळा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ती खा.

Add Zee News as a Preferred Source

तुमच्या ताटात काकडी टाळणे अशक्य आहे. ते तुमचे शरीर हायड्रेट ठेवते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते. त्याचे इतर अनेक फायदे आहेत, म्हणूनच लोक ते सॅलड, रायता किंवा सँडविचमध्ये खातात. पण तुम्हाला माहित आहे का की काकडी प्रत्येकासाठी फायदेशीर नाही? हो, असे काही लोक आहेत ज्यांच्यासाठी काकडी खाणे हानिकारक असू शकते, विशेषतः जर ते चुकीच्या वेळी खाल्ले तर. जर तुम्ही देखील दररोज काकडी खात असाल तर हा लेख नक्की वाचा…

कोणत्या 5 लोकांनी काकडी खाणे टाळावे?

 गॅस किंवा पोट फुगण्याचा त्रास आहे
काकडीमध्ये क्युकरबिटासिन नावाचे एक विशेष संयुग असते. हे संयुग पोटात गॅस तयार होण्यास हातभार लावू शकते. जर तुमचे पोट आधीच संवेदनशील असेल किंवा तुम्हाला वारंवार पोट फुगण्याचा अनुभव येत असेल तर काकडी खाणे टाळा. विशेषतः जर तुम्ही ते सालीसह खाल्ले तर यामुळे समस्या वाढू शकते.

संवेदनशील पोट असलेले लोक
काही लोकांची पचनसंस्था कमकुवत किंवा संवेदनशील असते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. फायबर आरोग्यासाठी चांगले असले तरी, जास्त प्रमाणात किंवा अचानक सेवन केल्यास ते पोटात जडपणा, वेदना आणि पेटके निर्माण करू शकते.

रात्री काकडी खाणारे लोक
तज्ञ अनेकदा रात्रीच्या जेवणानंतर काकडी खाण्याचा सल्ला देत नाहीत. काकडी पचण्यास थोडी जड असतात. त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे रात्री वारंवार शौचालयात जाण्याची शक्यता असते आणि झोपेत व्यत्यय येऊ शकतो. आयुर्वेदानुसार, त्याचा “थंड स्वभाव” रात्रीच्या वेळी सेवन करण्यास देखील अयोग्य बनवतो.

सायनस किंवा सर्दीचा त्रास असलेल्यांना
जर तुम्हाला आधीच सर्दी, खोकला, कफ किंवा सायनसची समस्या असेल तर काकडी खाल्ल्याने तुमची लक्षणे वाढू शकतात. अशा परिस्थितीत, थंड पदार्थ खाल्ल्याने श्लेष्मा आणि कफचे उत्पादन वाढू शकते. म्हणून, आजारी असताना काकडी टाळा.

काकडीची ऍलर्जी
काही लोकांना काकडीची थेट ऍलर्जी असू शकते. जरी हे खूप कमी लोकांमध्ये आढळते, तरी काहींना काकडी खाल्ल्यानंतर तोंडात, घशात किंवा ओठांमध्ये खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हा एक प्रकारचा ओरल ऍलर्जी सिंड्रोम आहे. जर तुम्हाला ही लक्षणे दिसली तर ताबडतोब काकडी खाणे थांबवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.





Source link

हिवाळ्यात तुम्हाला सुद्धा ‘ही’ लक्षणे जाणवत आहेत? आत्ताच सावध व्हा, नाहीतर…

0
हिवाळ्यात तुम्हाला सुद्धा ‘ही’ लक्षणे जाणवत आहेत? आत्ताच सावध व्हा, नाहीतर…


Winter Heart Care: हिवाळा ऋतु गुलाबी थंडीसह अनेक आजारही सोबत घेऊन येतो. तापमान कमी असल्यामुळे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळत नाही आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. यामुळे सर्दी-खोकला, ताप, थकवा येणे, श्वसनाच्या समस्या यासह अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. विशेषतः हिवाळ्यात येणार्‍या थकव्याला दुर्लक्षित केले जाते. पण असे केल्यास हृदयाच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो.

Add Zee News as a Preferred Source

 

थकवा जाणवणे:

हिवाळ्यात तापमान कमी असल्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढू लागतो, ज्यामुळे हृदयालाच्या कार्यात आणखी भर पडते आणि अधिक थकवा जाणवतो. पण अनेकजण रोजच्या धावपळीमुळे हा थकवा येत आहे असे समजून दुर्लक्ष करतात. तसेच हिवाळ्यात ऑक्सिजनची कमतरता जाणवल्यामुळे आणि रक्तदाब वाढल्यामुळेही या समस्येला सामोरे जावे लागते.

 

अचानक धाप लागणे:

हिवाळ्यात जलद गतीने चालल्याने किंवा पायऱ्या चढताना तुम्हाला धाप लागून श्वास घेण्यास त्रास होतो, पण थोडा आराम केल्यानंतर बरे वाटते. असे कधीतरी होत असल्यास सामान्य मानले जाऊ शकते. पण जर वारंवार तुम्हाला या समस्येला सामोरे जावे लागत असेल तर तुम्ही वेळीच सावध झाले पाहिजे. असे होण्याचे कारण म्हणजे हृदयावरील दबावाचे प्रमाण वाढणे. रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने हृदयाला त्याचे कार्य पार पाडण्यास अधिक कष्ट करावे लागतात. बऱ्याचदा थकवा येण्याचे हे लक्षण संसर्ग किंवा अस्थमाशी संबंधित असू शकते.

 

सतत येणारी सुस्ती:

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे सुस्ती येणे सामान्य आहे. पण सतत सुस्ती येत असेल तर या संकेताकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते शरीराला योग्य रक्तपुरवठा न झाल्यास अशक्तपणा जाणवून सतत सुस्ती येते. बऱ्याचदा ताण किंवा अपूर्ण झोप यामुळे असे होत आहे असे समजले जाते. पण हे हृदयविकाराच्या सुरूवातीची लक्षणे असू शकतात.

 

शरीराला येणारी सूज:

जेव्हा हृदय त्याच्या कार्यात असमर्थ ठरू लागतो तेव्हा शरीरात विशिष्ट द्रवपदार्थ जमा होण्यास सुरूवात होते. यामुळे शरीराला सूज येण्याची समस्या उद्भवते. तसेच हिवाळ्यात कमी तहान लागते, कमी प्रमाणात पाणी पिल्यास ही सूज आणखी वाढण्याची शक्यता असते.

 

हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे:

याशिवाय ज्या व्यक्तींना आधीच थायरॉईड किंवा हृदय विकाराच्या समस्या असतील त्यांना हिवाळ्यात हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणे किंवा अनियमितता असणे अशा समस्या जाणवतात. अशावेळी काहीवेळ आराम केल्यास देखील ठोक्यांची गती सामान्य होत नसेल तर तुम्हाला त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे.

 

तुम्हाला सुद्धा वरीलपैकी कोणतेही लक्षण जाणवत असल्यास त्वरित डॉक्टरांना भेट द्या. आणि वेळीच उपचार सुरू करा. अन्यथा सामान्य थकव्याचे रूपांतर पुढे गंभीर आजारात होऊन जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

 

 

1.प्रश्न: हिवाळ्यात सतत थकवा येणे सामान्य आहे का?

उत्तर: थोडासा थकवा सामान्य, पण सतत थकवा, सुस्ती असल्यास हृदयावर ताण वाढल्याचे लक्षण असू शकते; दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

2.प्रश्न: पायऱ्या चढताना धाप लागणे म्हणजे काय?

उत्तर: हिवाळ्यात रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने हृदयाला जास्त मेहनत करावी लागते; वारंवार धाप लागत असल्यास हृदयविकाराची सुरुवात असू शकते.

 

3.प्रश्न: हिवाळ्यात शरीराला सूज येण्याचे कारण काय?

उत्तर: हृदय कमकुवत झाल्यास शरीरात एक विशिष्ट द्रवपदार्थ साठतो; कमी पाणी पिणे आणि थंडी यामुळे सूज वाढते. हे हृदयाच्या समस्येचे गंभीर लक्षण आहे.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link