Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 84

सातारा ड्रग्ज प्रकरण! पोलिसांकडून तीन जणांना अटक, गुन्हे शाखेच्या विभागाकडून महत्वाचा खुलासा 

0


Satara crime news:  सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील असणाऱ्या शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधु प्रकाश शिदेंबाबत करण्यात आलेल्या आरोपानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून महत्वाचा खुलासा करण्यात आला आहेय.

या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साताऱ्यातील जावळी बामनोली गावात सुरू असलेल्या ड्रग्ज कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ओंकार डिगे याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ओंकारच्या चौकशीतून यातील इतर सहभागी आरोपींची नावे समोर आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नजर अब्बास सयद उर्फ सद्दाम 29, राजीकुल रहमान 30, हाजीबुल इस्लाम 25 या तिघांना अटक करण्यात आली आहे

तपासातील एक आरोपी पालघरमध्ये आहे. तर एक आरोपी हे आसामच्या मोरीगावचे असल्याचे निष्पन्न झाले आहेत. तसेच या कारवाईनंतर त्याचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बंधु प्रकाश शिंदें यांच्या जमिनीवर असलेल्या हॉटेलशी जोडण्यात येत होता. त्याबाबत पोलिसांनी खुलासा करताना प्रकाश शिंदेंनी भाडेतत्वावर दिलेल्या जागेत सुरू असलेल्या हॉटेल तेजयश मधून आरोपींना कुठलेही जेवण दिले जात नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तर दरेगावातील सरपंच रणजीत शिंदे  यांचा नमुद गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापपर्यंत कोणताही संबध निर्दर्शनास आला नसल्याचे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सुषमा अंधारे यांनी नेमके काय आरोप केले?

13 डिसेंबर रोजी सावरी गावात कारवाई झाली. सुरवातीला मुकंद गावात कारवाई झाली होती. त्याचे धागेदोरे पुण्यात आले. यात विशाल मोरे याला ताब्यात घेण्यात आले असून पोलिसांकडून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीतून सावरी गावाची माहिती मिळाली. या गावात पोलिसांचे पथक पोहोचले. मी स्वतः सावरी गावात जाऊन आले आणि मला काही धक्कादायक माहिती मिळाली. याठिकाणी कोयनेचे बॅकवॉटर आहे. इथे स्विमिंग टँक तयार होत आहेत. रिसॉर्ट होत आहे.. इथून जवळ असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये कारवाई करण्यात आली. इथे 75 लाख खर्च करून रस्ता तयार करण्यात आला आहे. इथे गाव नाही, माणूस नाही तरी येथे शेडला जोडणारा रस्ता का तयार करण्यात आला? येथील रिसॉर्टमध्ये सात ते आठ रूम बांधून तयार आहेत. या रिसॉर्टमध्ये अनेक सुविधा आहेत. याठिकाणी एक डस्टर गाडी आहे.  पोलिसांनी या रिसॉर्टमध्ये केलेल्या कारवाईत 45 किलो ड्रग्स सापडले. याची किंमत  145 कोटी आहे. ही बातमी फार चर्चेत आले नाही. हे रिसॉर्ट प्रकाश शिंदे यांच्या मालकीचे आहे. या शेडचा मालक गोविंद सिंदकर.आहे. याच्या शेडची चावी ओंकार दिघे याने घेतली अशी माहिती गोविंद याने दिली. ओंकार दिघे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि सोडले. पोलिसांनी त्याला का सोडलं हे अजून माहीत नाही. मुंबई पोलिस त्याठिकाणी का गेले?, असे सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले. 

आणखी वाचा



Source link

तोंडाला चिकटपट्टी लावून का झोपतात लोक? काय आहे Mouth Taping काय असतं?

0
तोंडाला चिकटपट्टी लावून का झोपतात लोक? काय आहे Mouth Taping काय असतं?


आजकाल सोशल मीडियावर एक नवीन स्लीप ट्रेंड लोकप्रिय होत आहे, ज्याला माउथ टेपिंग म्हणतात. नावाप्रमाणेच, या ट्रेंडमध्ये लोक झोपताना तोंडाला टेप लावतात जेणेकरून ते तोंडाऐवजी नाकातून श्वास घेतात. लोक म्हणतात की हे घोरणे थांबवते, झोप सुधारते आणि शरीराला अधिक ऑक्सिजन प्रदान करते. पण ही पद्धत खरोखर फायदेशीर आहे का, की झोपताना तोंडाला टेप लावणे हानिकारक असू शकते? 

Add Zee News as a Preferred Source

झोपताना तोंडाला चिकटपट्टी लावणे किती योग्य?

हेल्थलाइनच्या अहवालानुसार, माउथ टेप लावण्याचा सर्वात मोठा फायदा असा आहे की ते नाकाने श्वास घेण्यास प्रोत्साहन देते.

याचा अर्थ असा की झोपताना तुम्ही तोंडाऐवजी नाकातून श्वास घेता. 

शरीरात प्रवेश करण्यापूर्वी हवा फिल्टर आणि ओली केली जाते.

सायनसच्या रुग्णांना आराम मिळतो.

हे घोरणे कमी करू शकते आणि

ते कोरडे तोंड कमी करते.

अहवालानुसार, तोंडावर टेपिंग केल्याने तोंडाचे पीएच संतुलन देखील राखले जाऊ शकते, ज्यामुळे दात किडणे, हिरड्यांचे आजार आणि कोरडे तोंड टाळता येते. शिवाय, नाकाने श्वास घेतल्याने नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढते, जे मेंदूच्या कार्यासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तातील ऑक्सिजन पातळीसाठी आवश्यक आहे. या परिस्थितीत ही पद्धत फायदेशीर ठरू शकते.

काही तोटे आहेत का?

अहवालात पुढे म्हटले आहे की तोंडावर टेपिंगची ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित नाही. विशेषतः जर एखाद्या व्यक्तीचे नाक सर्दी किंवा ऍलर्जीमुळे बंद झाले असेल किंवा त्याला आधीच श्वास घेण्यास त्रास होत असेल, तर त्यांनी तोंडावर टेपिंग वापरू नये. असे केल्याने झोपेच्या वेळी श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो, जी एक धोकादायक परिस्थिती आहे. शिवाय, तुम्हाला त्वचेच्या समस्या देखील येऊ शकतात, विशेषतः ओठ किंवा तोंडाभोवती जळजळ होऊ शकते. तोंडावर टेपिंगमुळे काही लोकांना झोपेचा त्रास देखील होऊ शकतो.

अशावेळी काय करावे?

हेल्थलाइनच्या मते, ही प्रवृत्ती स्वीकारण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जर तुम्हाला झोपताना घोरणे किंवा तोंड कोरडे पडण्याची समस्या असेल, तर तोंडावर टेप लावण्यापूर्वी डॉक्टरांचा किंवा झोपेच्या तज्ञांचा सल्ला घ्या. या समस्या टाळण्यासाठी तुम्ही इतरही काही पद्धती वापरून पाहू शकता. उदाहरणार्थ:

झोपण्यापूर्वी तुम्ही वाफ घेऊ शकता. यामुळे तुमचे नाक उघडेल आणि तुम्हाला तोंडातून श्वास घेता येणार नाही.

जर तुम्ही घोरत असाल, तर तुमच्या झोपण्याच्या स्थितीकडे लक्ष द्या. उशी वापरावी की नाही याबद्दल तज्ञांचा सल्ला घ्या.

जर झोपताना तुमचे तोंड कोरडे पडत असेल, तर झोपण्यापूर्वी काहीतरी हायड्रेटिंग प्या.

यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता आणि चांगली झोप घेऊ शकता. अशा कोणत्याही ट्रेंडचे थेट अनुसरण करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत महत्वाचे आहे.





Source link

हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास सर्वाधिक का जाणवतो? ‘ही’ चूक ठरते कारणीभूत

0
हिवाळ्यात गुडघेदुखीचा त्रास सर्वाधिक का जाणवतो? ‘ही’ चूक ठरते कारणीभूत


हिवाळ्यात तापमान घटल्याने शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे गुडघ्यासह सर्व सांध्यांकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी सांधे कडक होणे, ताठरता जाणवणे आणि चालताना वेदना होणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. वयानुसार होणारी गुडघ्यांची झीज, आधीपासून असलेले ऑस्टिओआर्थ्रायटिस, सांध्यांची सूज, स्नायूंची कमकुवतता किंवा लठ्ठपणा सारख्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी थंडी त्रासदायक ठरते.  म्हणून, प्रत्येकाने लक्षणांकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो.

जास्त वेळ बसून राहणे किंवा कडक होणे, गुडघ्याभोवती सूज येणे, आवाज येणे, पायऱ्या चढण्यास त्रास होणे आणि चालताना अस्वस्थता यासारख्या लक्षणांकडे लक्ष द्या. जर दुर्लक्ष केले तर गुडघेदुखीमुळे असह्य वेदना होणे, हालचाल मंदावणे, संधिवाताची समस्या वाढणे किंवा सांध्यावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. हिवीळ्याच्या दिवसात तुमच्या गुडघ्यांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

सांध्यांना आराम मिळावा यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुडघ्याला योग्य थर्मल सपोर्ट देत ते उबदार ठेवणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि स्नायुंचा कडकपणा कमी करण्यास मदत करण्यासाठी स्ट्रेचिंग, जलद गतीने चालणे किंवा सायकलिंगसारखे सौम्य व्यायाम करा. मांडी आणि वासराच्या स्नायूंना बळकटी देणे देखील गुडघ्याला आधार देते आणि पुढील ताण टाळते. जर तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग व्यायाम निवडत असाल, तर फिटनेस ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ते करा. कोमट पाण्याने आंघोळ करणे, हीट पॅड घट्ट स्नायूंना आराम देऊ शकतात आणि वेदना कमी करू शकतात. गुडघ्यांवरचा ताण कमी करण्यासाठी इष्टतम वजन राखा. तसेच, हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ जसे की संत्र्याचा रस, तृणधान्ये आणि चरबीयुक्त मासे यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करा. म्हणून, हे समजून घ्या की या महत्त्वाच्या उपाययोजना करून, हिवाळ्यात गुडघेदुखीचे व्यवस्थापन करणे आणि हालचाल करणे शक्य आहे. जर वेदना असह्य झाल्या तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे जो गुडघेदुखीचा सामना करण्यासाठी योग्य उपचारांचा सल्ला देईल. म्हणून, या हिवाळ्यात, तुमच्या गुडघ्यांची काळजी घेण्यास विसरू नका.





Source link

डिटॉक्स ड्रिंक्स, क्रॅश डाएटमुळे आरोग्याचे होतेय नुकसान; कर्करोगाला आमंत्रण!

0
डिटॉक्स ड्रिंक्स, क्रॅश डाएटमुळे आरोग्याचे होतेय नुकसान; कर्करोगाला आमंत्रण!


सोशल मीडियावर सध्या ‘हेल्थ ट्रेंड्स’ची क्रेझ वाढत असून, अनेकजण डिटॉक्स ड्रिंक, क्रॅश डाएट,फॅट बर्निंग स्मूदी सारख्या उपायांचा अवलंब करु लागले आहेत. आपण फिट आणि तरुण दिसावे या नीदात केले जाणारे ह प्रयोग  शरीराचे नुकसान करतात. अशा फॅड्समुळे भविष्यात कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो असा इशारा कर्करोग तज्ज्ञांनी दिला आहे.

Add Zee News as a Preferred Source

तज्ज्ञांच्या मते अत्यंत कमी कॅलरीचे डाएट किंवा डिटॉक्स ड्रिंक्सचा अतिरेक केल्यास शरीरातील नैसर्गिक पोषकता खालावते. अशा आहारामुळे यकृत व मूत्रपिंडांवर ताण येतो. परिणामी शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, जो पेशींना हानी पोहोचवून कर्करोगाची शक्यता वाढवतो. डिटॉक्सच्या नावाखाली शरीराला उपाशी ठेवणे किंवा फक्त ज्यूसवर, सॅलड खाऊन जगणे हे धोकादायक आहे. प्रत्येक व्यक्तीचे शरीर आणि भूक वेगवेगळी असते. त्यामुळे सोशल मिडीयावरील इन्फ्लुएन्सर्सच्या सल्ल्यावर अंधपणे विश्वास ठेवू नका.

सोशल मीडियावरील व्हायरल ट्रेंड्समुळे अनेक तरुण आपली स्थिती न पाहता स्वतःहूनच आहारात बदल करतात. मात्र हे बदल वैद्यकीय सल्ल्याशिवाय केले गेल्यास हार्मोनल समस्या, थकवा आणि त्वचेच्या विकारास तसेच गंभीर आजारास कारणीभूत ठरतात. अत्यंत कमी कॅलरीज असलेले  क्रॅश डाएट शरीराला ‘स्टार्वेशन मोड’मध्ये ढकलते. यामुळे पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, जो दीर्घकाळात कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. केवळ ज्यूस किंवा डिटॉक्स ड्रिंक्सवर जगणे प्रोटीन, फॅट, आयर्न, B12, फायबर यांची तीव्र कमतरता निर्माण करते आणि यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. 

बाजारात मिळणाऱ्या  काही डिटॉक्स ड्रिंक्स, हर्बल पावडर, स्लिमिंग टीजमध्ये धातू (lead, arsenic),कृत्रिम रसायनं, हार्मोन्सवर परिणाम करणारे घटक आढळतात व हे घटक शरीरात साठून थायरॉईड, स्तन, पचनसंस्थेचा कर्करोग वाढवू शकतात. डॉ. अभिषेक पुरकायस्थ( टोमोथेरपी आणि रेडिएशन ऑन्कोलॉजी विभाग, टीजीएच ऑन्को-लाइफ कॅन्सर सेंटर) सांगतात की, सोशल मीडियावर चुकीचे आणि असुरक्षित हेल्थ ट्रेंड्स फॉलो केल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजारांची लक्षणे दुर्लक्षित केली जाऊ शकतात. योग्य वैद्यकीय सल्ला घेण्यास उशीर झाल्यामुळे आजार गंभीर रुप धारण करु शकतो. अनेक सोशल मीडिया ट्रेंड्स वैज्ञानिक पुराव्यांवर आधारित नसतात. असे ट्रेंड्स फॉलो केल्यामुळे कर्करोगग्रस्तांसाठी हानिकारक ठरू शकतात, कारण ते एखाद्याला पारंपरिक वैद्यकीय उपचारांपासून दूर राहण्यास प्रवृत्त करतात.

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॅास्पीटलचे जनरल फिजीशियन डॉ आदित्य देशमुख सांगतात की, सोशल मिडियावरील डिटॅाक्स ड्रिंक्सला बळी पडू नका आणि तुम्हाला जर खरोखरच डाएट करायचे असेल किंवा डिटॅाक्स करायचे असेल तर आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या त्यांच्या सल्ल्याने आवश्यक त्या आरोग्य तपासण्या करुन घ्या आणि मगच योग्य तो पर्याय निवडा. आपण जर योग्य त्या तपासण्या केल्या नाहीत तर आपल्या शरीराला कशाची कमतरता आहे, लक्षणं काय आहेत हे कळणार नाही. या साऱ्याचा विचार करुन मगच आपल्याला डिटॅाक्स ड्रिॅक किॅवा डाएटची गरज आहे का ते ठरवणे योग्य राहिल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. यामुळे भविष्यातील गुंतागुंत टाळणे शक्य होईल असेही डॉ देशमुख यांनी स्पष्ट केले.





Source link

विमा पॉलिसी घेताय?: मग हा ‘रेशो’ नक्की तपासा; संकटाच्या वेळी हक्काचे पैसे कसे मिळवायचे? जाणून घ्या…

0
विमा पॉलिसी घेताय?:  मग हा ‘रेशो’ नक्की तपासा; संकटाच्या वेळी हक्काचे पैसे कसे मिळवायचे? जाणून घ्या…


निनाद झारे17 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

विमा उतरवणे म्हणजे केवळ सुरक्षितता नाही, तर ती भविष्यासाठी केलेली एक महत्त्वाची गुंतवणूक आहे. पण, अनेकदा विमा पॉलिसी घेताना आपण फक्त प्रीमियमकडे लक्ष देतो. खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा एखादे कुटुंब क्लेम (दावा) दाखल करते.

सध्या भारतातील आयुर्विमा कंपन्या विश्वासार्हता वाढवण्यासाठी आपली प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक करत आहेत. या अनुषंगाने आम्ही इश्युरन्स अवेअरनेस कौन्सिलचे सहअध्यक्ष व्यंकी अय्यर आणि कौन्सिलचे सदस्य ऋषभ गांधींच्याकडून सविस्तर माहिती घेतली.

काय आहे हा ‘क्लेम सेटलमेंट रेशो’?

विमा कंपनीची ताकद तिच्या मार्केटिंगमध्ये नाही, तर ती किती दावे यशस्वीपणे निकाली काढते यात असते. यालाच ‘क्लेम सेटलमेंट रेशो’ (CSR) म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, कंपनीकडे आलेल्या १०० दाव्यांपैकी तिने प्रत्यक्षात किती जणांना पैसे दिले, याचा हा आकडा आहे. सध्या भारतातील अनेक कंपन्यांचा CSR हा ९८-९९% आहे, जो ग्राहकांसाठी अतिशय दिलासादायक मानला जातो.

नवे नियम आणि तुमचा फायदा

विमा क्षेत्रात आता मोठे बदल झाले असून, ‘प्रोटेक्शन ऑफ पॉलिसीहोल्डर्स इंटरेस्ट’ (PPHI) अंतर्गत नियम कडक करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार विमा कंपन्यांना…

विना-चौकशी दावे: ज्या दाव्यांमध्ये अधिक तपासाची गरज नसते, असे दावे आता ३० दिवसांऐवजी केवळ १५ दिवसांत निकाली काढावे लागतात.

तपासणी आवश्यक असलेले दावे: ज्या दाव्यांची सखोल चौकशी गरजेची आहे, अशांसाठी ९० ऐवजी केवळ ४५ दिवसांची मुदत आहे.

डिजिटल सुविधा: आता कागदपत्रांच्या जंजाळात अडकण्याची गरज नाही. मोबाइलवरून डॉक्युमेंट्स अपलोड करून तुम्ही घरबसल्या क्लेमचा स्टेटस ट्रॅक करू शकता. सावधान! ‘या’ चुकांमुळे अडकू शकतात तुमचे पैसे विमा कंपन्या सुधारणा करत असल्या तरी, काही वेळा ग्राहकांच्या चुकांमुळे क्लेम नाकारला जाऊ शकतो किंवा त्याला उशीर होऊ शकतो.

1. वारसदाराची (Nominee) माहिती: लग्नानंतर किंवा मुलांच्या जन्मानंतर अनेकजण पॉलिसीत वारसाचे नाव अपडेट करायला विसरतात. ही एक चूक क्लेम मिळवताना मोठी अडचण ठरू शकते.

2. चुकीची माहिती: पॉलिसी घेताना आरोग्य किंवा वैयक्तिक माहिती लपवणे महागात पडू शकते.

3. आधार लिंकिंग: तुमचा आधार आणि बँक खाते अपडेट असल्यास ग्रामीण भागातही पैसे मिळणे अधिक सोपे होते.

२०४७ पर्यंत ‘सर्वांसाठी विमा’

भारताने २०४७ पर्यंत प्रत्येक नागरिकाला विम्याच्या छत्राखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अशा परिस्थितीत केवळ विमा घेणे पुरेसे नाही, तर ती कंपनी संकटाच्या काळात तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी किती खंबीरपणे उभी राहते, हे तपासणे महत्त्वाचे आहे.



Source link

साताऱ्यात 145 कोटींच्या ड्रग्स; आता पाचगणीत फोर व्हिलरमध्ये आढळले 5 लाखांचे कोकीन, 10 जण अटकेत

0


Satara Crime News : सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पाचगणीमध्ये खळबळजनक घटना समोर आली आहे. पाचगणी पोलिसांना वाहन तपासणी दरम्यान पर्यटकांच्या गाडीतून तब्बल 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पाचगणी येथे अमली पदार्थांचा वापर केला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे  पोलिसांनी कारवाई केली आहे.

एकूण 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त 

पाचगणी पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपासणी केली असता एका गाडीमध्ये कॅप्सूल सह ​13 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 5 लाख रुपये आहे, ​इतर सामग्री मिळून एकूण 42 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी 10 संशयित आरोपींना पोलिसांनी  अटक केली आहे. ​हे सर्व आरोपी पर्यटनाच्या बहाण्याने पाचगणीत आले होते. पाचगणी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हे अमली पदार्थ कुठून आणले गेले आणि यामध्ये आणखी कोणाचे मोठे रॅकेट सक्रिय आहे का? याचा तपास आता सातारा पोलीस करत आहेत.

सातारा जिल्ह्यातील सावरी गावात पोलिसांची धाड, 45 किलो ड्रग्जचा साठा जप्त

सातारा जिल्ह्यातील सावरी गावातील असणाऱ्या  शेडवर मुंबई पोलिसांनी टाकलेल्या धाडीत 45 किलो ड्रग्जचा साठा सापडला होता. या ड्रग्जची बाजारपेठेतील किंमत 145 कोटी रुपये इतकी आहे, त्या ठिकाणी काम करत असलेल्या तिघांना एकनाथ शिंदे यांचा भाऊ प्रकाश शिंदे याच्या जावळी तालुक्यातील हॉटेल तेज यश मधून जेवण जात असल्याचा असा खळबळजनक आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला. प्रकाश शिंदे (Prakash Shinde) हे एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांनी 2017 साली ठाण्यातून नगरसेवकपदाची निवडणूक लढवली होती. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांनी ही माहिती लपवून ठेवली. पोलिसांनी याठिकाणी कारवाई केली पण ड्रग्जशी संबंधित ज्या तीन लोकांची नावं एफआयआरमध्ये असायला पाहिजे होती, ती नाहीत, असा दावा सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. एखाद्या प्रकरणात पोराचं नाव आलं तर बापाचा राजीनामा मागितला जात असेल तर मग ड्रग्ज प्रकरणात भावाचे नाव आल्यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचाही राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. 

महत्वाच्या बातम्या:

सुषमा अंधारेंकडून 145 कोटींच्या ड्रग्सचे गंभीर आरोप; प्रकाश शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, आरोप फेटाळले

 

 

आणखी वाचा



Source link

तुम्ही सुद्धा मधुमेह, वजन वाढेल म्हणून भात खाणे टाळून गव्हाची चपाती खाताय? खूप मोठी चूक करताय…

0
तुम्ही सुद्धा मधुमेह, वजन वाढेल म्हणून भात खाणे टाळून गव्हाची चपाती खाताय? खूप मोठी चूक करताय…


Eating Wheat can cause of diabetes and weight gain: भारतात प्रत्येक घरातील जेवणाचे ताट गव्हाच्या चपातीशिवाय पूर्ण होत नाही. आपल्या सर्वांच्या आहारात रोजच गव्हापासून बनलेल्या पदार्थांचा समावेशा असतो. गव्हाचे सेवन आरोग्यासाठी अधिक फायदेशीर मानले जाते. बऱ्याचवेळा मधुमेहाच्या समस्या उद्भवल्यास किंवा वजन कमी करायचे असल्यासही चपाती खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही सुद्धा तुमच्या रोजच्या आहारात चपातीच्या सेवनाचे प्रमाण वाढवले असेल तर, हे ऐकून नक्कीच थक्क व्हाल.

Add Zee News as a Preferred Source

तज्ज्ञ सांगतात की, चपातीचे सेवन वाढवल्यास मधुमेह नियंत्रित राहत नाही तर वाढतो, वजन कमी होत नाही तर वाढते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, आरोग्यास फायदेशीर असलेले धान्य मधुमेह आणि वजन वाढण्यास कसे कारणीभूत ठरू शकते. चला तर मग या लेखातून यामागचे खरे कारण जाणून घेऊया.

 

 

गव्हाच्या सेवन मधुमेह आणि वजन वाढीस कसे कारणीभूत ठरते?

 
तज्ज्ञांच्या मते पूर्वीच्या काळात मिळणाऱ्या गव्हामध्ये आणि आत्ताच्या काळात मिळणाऱ्या गव्हाच्या गुणवत्तेमध्ये मोठा फरक आहे. पूर्वीच्या काळाच मिळणारे गहू फायबर, मिनरल्स आणि प्रोटीनने भरपूर असायचे. यामुळे पोटाचे आरोग्य सुरळीत राहायचे  तसेच शरीरालाही योग्य पोषण मिळायचे. कारण या गव्हांवर कोणत्याही प्रकारची कृत्रिम प्रक्रिया केली जात नव्हत, पूर्णपणे शुद्ध गव्हाचे सेवन केले जायचे. 

पण आत्ताच्या काळात मिळणारे गहू हायब्रिड आणि रिफाइंड गहू असतात. ज्यामध्ये प्रक्रिये दरम्यान गव्हांमधील फायबर, झिंक, मॅग्नेशियम आणि आवश्यक व्हिटॅमिन असे सर्व नैसर्गिक पोषक घटक निघून जातात. यामुळे गव्हांमध्ये ग्लुटेनचे प्रमाण वाढते. म्हणूनच आत्ताच्या काळात मिळणारे गहू रक्तातील साखर वाढवण्यास, वजन वाढवण्यास, थकवा आणि मधुमेहास कारणीभूत ठरतात. 

 

 

आहारात गव्हाचा समावेश कसा टाळता येईल?

 

प्रक्रिया केलेले आणि ग्लूटेनयुक्त गहू खाल्ल्याने शारीरिक आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. चपातीचे सेवन वाढल्याने शरीरात ग्लूटेनचे प्रमाणही वाढते. ज्यामुळे पोट फुगणे किंवा ब्लोटिंग होणे, अॅसिडिटी, गॅस, पोटात जडपणा किंवा अपचनाच्या समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते. म्हणूनच तुम्हाला निरोगी आणि फिट रहायचे असेल तर, आत्ताच गव्हाचे सेवन कमी किंवा पूर्णपणे बंद करा.

 

चपातीवर पर्याय म्हणून तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात बाजरी, नाचणी किंवा तांदूळ अशा पौष्टिक धान्यांपासून बनलेल्या भाकरीचा समावेश करू शकता. यामुळे पचनसंस्थाही सुरळीत राहते तसेच रक्तातील साखरेची पातळही नियंत्रणात राहते. शिवाय तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करत असाल तर बाजरीची किंवा नाचणीची भाकरी एक सर्वोत्तम पर्याय आहे. तसेच जर तुम्हाला चपाती जेवणात रोज चपाती खाण्याची सवय असेल तर चपाती बनवण्यासाठी ग्लूटेन असलेले गहू वापरणे टाळा, ग्लूटेन फ्री गव्हाचा वापर करा. 

 

 

भाकरी शिवाय बाजरी किंवा नाचणीचा तुमच्या आहारात असा समावेश करू शकता?

 

बाजरी:

1. बाजरीचा उपमा : भाज्या आणि नट्स घालून बाजरीच्या पीठाचा उपमा बनवू शकता. 

2. बाजरीची खिचडी: भरपूर भाज्या आणि तुमच्या आवडत्या मसाल्यांसह बाजरीची खिचडी एक पौष्टिक पर्याय ठरेल. 

3. बाजरीचे लाडू: बाजरीचे पीठात गूळ आणि तूप मिसळून लाडू बनवल्यास, विशेषतः हिवाळ्यात आरोग्यास अधिक फायदेशीर ठरतात. 

 

नाचणी:

1. नाचणीचा डोसा किंवा चिला: नाचणीतच्या पीठाचा वापर करून डोसा किंवा चिला बनवता येतो. 

2. नाचणीचा दलिया किंवा लापशी: नाचणीपासून बनलेला दलिया किंवा लापशी पोटाच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते.

3. बेक्ड स्नॅक्स: नाचणीच्या पीठ वापरून मफिन्स किंवा कुकीज बनवू शकता. जे मोठ्यासह लहान मुलांना देखील आवडतील. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

जगन्नाथ मंदिराच्या कलशावर पक्ष्यांचा कळप; एक विनाशकारी भविष्यवाणी खरी ठरणार, हे अशुभ घटनेचं संकेत?

0
जगन्नाथ मंदिराच्या कलशावर पक्ष्यांचा कळप; एक विनाशकारी भविष्यवाणी खरी ठरणार, हे अशुभ घटनेचं संकेत?


Jagannath Temple viral video : ओडिशातील पुरी जगन्नाथ मंदिराच्या वरती गरुड फिरतानाचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. स्थानिक लोकांचा याचा संबंध भविष्यातील विनाशकारी घटनेशी जोडला आहे. काही जण याला देवाकडून आलेला दैवी संकेत मानतात तर काही जण इशारा मानतात.

Add Zee News as a Preferred Source

दुसरीकडे जगन्नाथ मंदिराभोवती असलेल्या रहस्ये आणि पौराणिक कथांनुसार, मंदिराच्या शिखरावरून पक्षी उडणे हे अत्यंत वाईट शकुनाचे संकेत मानले जात आहे. भविष्यमलिकासह अनेक ग्रंथांमध्ये याचा उल्लेख करण्यात आल्याच पाहिला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार तिथले स्थानिक सांगतात की, जगन्नाथ पुरी मंदिरावरून कधीही कोणताही पक्षी उडत नाही. हा एक चमत्कार मानला जातोय. तरीही हे एक रहस्य आहे जे आजही उलगडलेले नाही. म्हणूनच मंदिरावरून विमानांना उड्डाण करण्याची परवागनी नाही. 

शिवाय या मंदिराबद्दल अनेक चमत्कारी आणि रहस्यमय गोष्टी आहेत. त्यातील एक अजून म्हणजे मंदिराच्या वरती वारा देखील घड्याळाच्या उलट दिशेने वाहतो. त्यामुळे त्याचा ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरूद्ध दिशेने फडकतो. विशेष म्हणजे मंदिरावर पक्षी फिरणे हा अशुभ तर काही जण शुभ संकेत मानत आहेत. कारण अनेक भक्त गरुडांना भगवान विष्णूच्या पर्वत गरुडशी संबंधित पवित्र पक्षी मानतात. व्हायरल व्हिडिओच्या आधारे त्यांचा असा विश्वास आहे की हे पक्षी मंदिरात शुभ चिन्हे आणि आशीर्वाद आणतात.

भविष्यवाणी खरी ठरत आहे का?  

‘भविष्य मालिका’ या पौराणिक ग्रंथातील भविष्यवाणीनुसार, जेव्हा कलियुगाचा शेवट जवळ येणार आहे. तेव्हा जगन्नाथ मंदिर परिसरात मध्यरात्री चोरी होईल आणि दगड त्याच्या शिखरावरून पडतील. वादळामुळे नीलचक्र वाकेल आणि वाकडा होईल. अरुण स्तंभावर एक गिधाड देखील बसेल. मंदिरावरून कधीही कोणताही पक्षी उडत नसल्यामुळे, हे एक अशुभ शकुन आणि काही अनुचित घटनेचा इशारा मानला जातो. पण, काही जण ही एक सामान्य घटना म्हणून नाकारत आहेत. 

हे लक्षात घ्यावे की या वर्षीच्या सुरुवातीला, एप्रिलमध्ये, एक घटना व्हायरल झाली होती ज्यामध्ये एक गरुड जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर ध्वज घेऊन उडून गेला होता. तो त्याच्या पंजात धरून मंदिराभोवती फिरत होता. या घटनेच्या दृश्यामुळे स्थानिकांमध्ये खळबळ उडाली. पण, काहींनी नंतर असा दावा केला की हा ध्वज जगन्नाथ मंदिराचा नाही तर दुसऱ्या मंदिराचा आहे. तसंच या वर्षी मंदिराच्या वर एक पांढरा घुबड बसलेला दिसला. मंदिराच्या वर देवी लक्ष्मीचे वाहन असलेल्या घुबडाची उपस्थिती अत्यंत शुभ मानली जाते. 

पण मंदिराचे अधिकारी म्हणतात की ही केवळ एक नैसर्गिक घटना आहे, ज्यामुळे नीलचक्रांशी संबंधित शकुन, श्रद्धा आणि रहस्यांबद्दलच्या जुन्या चर्चेला एक नवीन प्रेरणा मिळालीय. 

(ही बातमी फक्त तुम्हाला जे घडलंय त्याबद्दल सांगण्यात आली आहे. ती लिहिताना आम्ही सामान्य माहितीची मदत घेतली आहे. झी 24 तास याची पुष्टी करत नाही.) 





Source link

हिवाळ्यात ‘या’ रंगाचे कपडे घालणे टाळा, नाहीतर…

0
हिवाळ्यात ‘या’ रंगाचे कपडे घालणे टाळा, नाहीतर…


Know which colour clothes are better for winter: हिवाळ्यात थंड हवेपासून संरक्षण करण्यासाठी, लोक विविध प्रकारचे उबदार कपडे वापरतात. ज्यामध्ये लोकरीचे स्वेटर, हूडी शॉल तसेच इतर हिवाळी स्टायलिश कपड्यांचा समावेश असतो. पण सर्वच प्रकारचे हिवाळी कपडे थंडीपासून पूर्णपणे संरक्षण देतात असे नाही. हे जाणून तुम्ही थक्क व्हाल, पण हिवाळ्यात काही रंगाचे कपडे शरीराला उब देतात तर काही रंगाचे कपडे तुम्हाला थंडीपासून वाचण्यास असमर्थ ठरतात. आणि थंड वातावरणापासून शरीराचे शंरक्षण न झाल्यास सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवण्याची शक्यता अधिक वाढते. यापासून वाचण्यासाठी हिवाळ्यात नेमके कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळावे आणि कोणत्या रंगाते कपडे घालणे फायदेशीर ठरेल हे तुम्हाला माहीत असणे अत्यावश्यक आहे. 

 

 

 

हिवाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजेत?

 

बऱ्याचदा उन्हाळ्यात गडद रंगाचे कपडे घालणे टाळले जाते. कारण गडद रंगाचे कपडे अधिक उष्णचा शोषून घेतात. पण तुम्हाला माहित आहे का उन्हाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही काही विशिष्ट रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजे. तज्ज्ञ सांगतात की, हिवाळ्यात फिकट रंगाचे कपडे घालणे टाळले पाहिजे. कारण उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी फिकट रंगाचे कपडे वापरले जातात, जेणेकरून जास्त प्रमाणात उष्णता शोषली जाणार नाही. पण हिवाळ्यात आपल्या शरीराला अधिक उष्णतेची आवश्यकता असते. ज्यामुळे शरीराला उब मिळेल आणि ऊर्जा टिकून राहील. फिकट रंगाचे कपडे उष्णता शोषून घेत नाहीत त्यामुळे पांढरे, पिवळे, किंवा कोणत्याही रंगाचे फिकट शेड्स असलेले कपडे घालणे टाळा.

 

 

 

हिवाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालावेत?

 

गडद रंगाचे कपडे उष्णता शोषून घेतात, यामुळे हिवाळ्यात गडद आणि उबदार रंगाचे कपडे घालावेत. जसे की गडद निळे, मरून, गडद हिरवे, चारकोल ग्रे आणि तपकिरी रंग. हे रंग सूर्याची किरणे शोषून घेतात आणि शरीराला उबदार ठेवतात. डीप रेड, मस्टर्ड येलो, बेज, मरून आणि ऑलिव्ह ग्रीन यांसारखे रंग हिवाळ्यातील वातावरणाला पूरक ठरतात. 

 

 

 

हिवाळ्यात गडद रंगाचे कपडे कसे स्टाईल कराल?

 

गडद रंगाचे कपडे अनेकजणांना नापसंत असतात. कारण काहीवेळा गडद रंगामुळे आपला लुक सर्वांमध्ये वेगळा आणि भडक दिसतो. तसेच सध्या फिकट रंगाचे कपडे वापरण्याचा ट्रेंड आहे. पण तुम्ही योग्य फॅशन टिप्स फॉलो केल्या तर गडद रंगाचे कपडेही तुमच्या पर्सनॅलिटीला एक जबरदस्त लुक देऊ शकतात. 

 

 

फॅशन टिप्स:

 

1. काळ्या किंवा राखाडी रंगाच्या हिवाळी कपड्यांसोबत तेजस्वी रंगाचे स्कार्फ किंवा टोपी स्टाईल करू शकता. 

 

 

2. लोकरी, मखमली किंवा कॉरडरॉय सारख्या टेक्श्चरचे कपडे निवडा, जे स्टाईलसह उबदारपणाही देतात.

 

 

3. दिवसा बाहेर जायचे असल्यास गडद रंगांच्या कपड्यांचा वापर करा आणि संध्याकाळी चमकदार रंग वापरू शकता.





Source link

हिवाळ्यात स्त्रियांना का होतात अधिक मूड स्विंग्स, कसे घडतात हार्मोनल बदल, आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर…

0
हिवाळ्यात स्त्रियांना का होतात अधिक मूड स्विंग्स, कसे घडतात हार्मोनल बदल, आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर…


Hormonal changes in women body: हिवाळा हा ऋतू फक्त गुलाबी थंडीच घेऊन येत नाही, तर सोबत आरोग्याच्या अनेक समस्याही येत असतात. या वातावरणाचा विशेषतः स्त्रियांच्या आरोग्यावर अधिक परिणाम होतो. यावेळी स्त्रियांच्या शरीरात मोठ्या प्रमाणात हार्मोनल बदल घडत असतात. या बदलांना बऱ्याचवेळा दुर्लक्षित केले जाते. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते असे करणे टाळले पाहिजे. कारण, हिवाळ्यात शरीराची रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होते आणि व्हिटॅमिन डीची कमतरताही जाणवते. तसेच हार्मोनल बदलांमुळे स्त्रियांच्या शरीरातील एस्ट्रोजन आणि कोर्टिसोलची कमतरताही जाणवू शकते. पण हिवाळ्यात स्त्रियांच्या शरीरात हे हार्मोनल बदल का होतात आणि याचा आरोग्यावर काय परिणाम होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. 

Add Zee News as a Preferred Source

 

 

हिवाळ्यात स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल बदल का घडतात?

 

हिवाळ्यात थंड वातावरणामुळे सूर्यप्रकाशाची कमी भासते. ज्यामुळे शरीरातील झोपेच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेला मेलाटोनिन या हार्मोनचे प्रमाण वाढते. यामुळे मूड सुधारण्यासाठी हार्मोनचे प्रमाण कमी होते आणि झोपेची समस्या होऊन मूडमध्ये बदल होतात. तसेच थंड हवामानाला प्रतिसाद म्हणून स्त्रियांचे शरीर तणाव हार्मोन म्हणजेच कॉर्टिसॉल निर्माण करण्यास जास्त प्रमाणावर भर देतो. ज्यामुळे मासिक पाळीवरही परिणाम होण्याची शक्यता असते. याशिवाय कमी शरीराला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश न मिळाल्याने थायरॉईड ग्रंथी आणि चयापचय क्रिया मंदावते, ज्यामुळे मासिक पाळी जास्त काळ टिकू शकते. 

तसेच थंडीमुळे स्त्रियांच्या शरीराची जास्त हालचाल होत नाही. ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो आणि पीएमएस (PMS) होण्याची शक्यता वाढते. यामुळे मासिक पाळीदरम्यान पोट दुखीच्या वेदना अधिक प्रमाणात वाढू शकतात. सूर्याप्रकाशाच्या कमतरतेमुळे व्हिटॅमिन डीची पातळी घटते, ज्यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. 

 

 

हार्मोनल बदल झाल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात? 

 

हिवाळ्यात स्त्रियांच्या शरीरात सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे सेरोटोनिन (mood-boosting hormone) आणि व्हिटॅमिन डीची पातळी कमी होते, शारीरिक आरोग्यावर तसेच मानसिक आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता असते. यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवतो.

 

मासिक पाळीवर होणारे परिणाम:

 महत्त्वाचे म्हणजे मासिक पाळीवर अधिक परिणाम होतो. कमी सूर्यप्रकाशामुळे एफएसएच (follicle-simulating hormone) चे प्रमाण कमी होते, ज्यामुळे मासिक पाळी लांबणे किंवा अनियमित होण्याची शक्यता असते. याशिवाय थंड वातावरणामुळे  रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे गर्भाशयातील रक्तप्रवाह कमी होतो आणि वेदना वाढतात. तसेच पीएमएस (Premenstrual syndrome) ची लक्षणे दिसू लागतात, जसे की स्तनांमधील वेदना आणि मूड स्विंग्सची तीव्रता अधिक वाढू शकते. 

 

शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम:

थायरॉईडच्या हार्मोनमध्ये बदल झाल्याने केस कमकुवत होणे, गळणे, त्वचा कोरडी होणे, मुरुमे येणे, त्वचेचा पोत बदलणे याशिवाय; चयापचय मंदावल्याने वजन अचानक वाढणे किंवा घटणे, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्याने सर्दी-खोकला आणि इतर आजारांचा धोका वाढण्याची शक्यता असते. 

 

मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम:

फील-गुड हार्मोन म्हणजेच सेरोटोनिन (serotonin) चे प्रमाण कमी झाल्याने चिडचिड, चिंता आणि नैराश्याची भावना वाढू शकते. ऊर्जेची पातळी कमी झाल्यामुळे थकवा येणे आणि एकाग्रतेचा अभाव जाणवल्यामुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण यणे अशा मानसिक आरोग्याच्या समस्या जाणवतात. 

 

यापासून वाचण्यासाठी काय कराल?

 

1. शरीराला पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळावा यासाठी शक्य असल्यास सकाळी थोडा वेळ उन्हात थांबा. 

2. डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लीमेंट्स घ्या. 

3. शरीराच्या हालचालीसाठी नियमित व्यायाम करा. 

4. शरीराला योग्य पोषण मिळावे यासाठी संतुलित आहार घ्या. 

5. ताण कमी करण्यासाठी योगा आणि ध्यानधारणा करा. 

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link