Pune News : प्रसिद्ध मांढरदेवीची यात्रा 2 जानेवारीला; गर्दी नियंत्रणासाठी चोख नियोजन
Source link
प्रसिद्ध मांढरदेवीची यात्रा 2 जानेवारीला; गर्दी नियंत्रणासाठी चोख नियोजन
बाईक असो किंवा कार.. सर्वांनाच बसणार सरकारच्या ‘या’ निर्णयाचा मोठा आर्थिक फटका! दर 2 वर्षांनी..;

Vehicle Fitness Test News: केंद्र सरकारने वाहनांसंदर्भात एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा करण्यात आली असून जुन्या आणि व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणी शुल्कात भरमसाठ वाढ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. नव्या नियमांनुसार काही व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस चाचणी शुल्क थेट 10 पटींनी वाढण्यात आलंय. तर दुसऱ्या बाजूला 15 ऐवजी 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांनाही फिटनेस शुल्क भरावं लागणार आहे.
दर दोन वर्षांनी…
वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठी पूर्वीची 15 वर्षांची मर्यादा आता 10 वर्षांपर्यंत कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा करत 10 वर्षांपेक्षा जुन्या सर्व प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांसाठी फिटनेस चाचणी शुल्क 10 पटीपर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच 10 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांना फिटनेस प्रमाणपत्रासाठी दर दोन वर्षांनी चाचणी देणे बंधनकारक करण्यात आलं आहे.
हे करण्याचा हेतू काय?
जुनी आणि प्रदूषणकारी वाहने रस्त्यांवरून कमी करणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात येते. नागरिकांनी आपल्या जुन्या वाहनांची तत्काळ फिटनेस चाचणी करून शुल्क भरावे अन्यथा मोठ्या भुर्दंडाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
वाहनधारक नाराज
केंद्र सरकारने वाहनांच्या फिटनेस चाचणीसाठीच्या शुल्कात भरमसाठ वाढ केल्याने वाहनधारक नाराज आहेत. अशातच याचा भुर्दंड सामान्य नागरिकांना सोसावा लागणार असल्याने या शुल्कवाढीविरोधात नाराजीचा सूर उमटत आहे. दुसरीकडे वाहनधारकांनी वाहनांची फिटनेस चाचणी करून घेण्याचे आवाहनही उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
किती असेल शुल्क?
नव्या तरतुदींनुसार बेकायदा वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क एक हजार रुपये निश्चित केले आहे. दुचाकींसाठी हे शुल्क 2 हजार रुपये, तीन चाकीसाठी पाच हजार रुपये आणि हलक्या मोटार वाहनांसाठी (एलएमव्ही) नोंदणी नूतनीकरण शुल्क 10 हजार रुपये असेल. याशिवाय आयात केलेल्या दुचाकींसाठी 20 हजार रुपये आणि आयात केलेल्या चारचाकी वाहनांसाठी 80 हजार रुपये आकारले जाईल. इतर श्रेणीतील वाहनांसाठी हे शुल्क 12 हजार रुपये असेल, असे सांगण्यात आले.
फिटनेस चाचणी म्हणजे काय?
वाहनांची फिटनेस चाचणी (Vehicle Fitness Test) ही एक चाचपणी प्रक्रिया आहे. या चाचपणीदरम्यान वाहन रस्त्यावर चालण्यासाठी योग्य स्थितीत आहे की नाही हे तपासून पाहिलं जातं. तसेच वाहनाच्या पर्यावरणीय मानकांची तपासणी केली जाते. भारतातील मोटर वाहन कायदा, 1988 नुसार फिटनेस चाचणी अनिवार्य आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) किंवा अधिकृत स्वयंचलित चाचणी केंद्रांद्वारे ही चाचणी केली जाते. ही चाचणी मुख्यतः व्यावसायिक वाहनांसाठी (ट्रक, बस, टॅक्सी) अनिवार्य आहे. खासगी वाहनांसाठी (कार, बाइक) देखील विशिष्ट वेळेनंतर फिटनेस चाचणी करुन घेणं अनिवार्य असतं.
घरात धूप अगरबत्ती लावताय, खबरदार! धूप अगरबत्तीमुळं कँन्सरचा धोका, होऊ शकतात ‘हे’ आजार

मंडळी तुम्ही घरात धूप लावत असाल तर काळजी घ्या. घर फ्रेश राहावं यासाठी आपण घरात धूप लावतो. मात्र, या धुपाच्या धुरामुळे तुमच्या शरिरावर परिणाम होऊ शकतो. तसंच या धूप अगरबत्तीच्या धुरामुळे कँन्सरसारख्या आजाराचाही धोका निर्माण होऊ शकतो.
Source link
भारतातील सर्वात श्रीमंत CEO, संपत्तीच्या बाबतीत सुंदर पिचाई,सत्या नडेलांच्या खूपच पुढे!

Jayshree Ullal’s story: भारतातील सर्वात श्रीमंत CEO कोण? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या व्यक्ती संपत्तीच्या बाबतीत सुंदर पिचाई,सत्या नडेलांच्यादेखील खूपच पुढे आहेत. जयश्री उल्लाल असे त्यांचे नाव असून त्यांचा जन्म 1961 मध्ये लंडनमध्ये झाला पण त्यांचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीत पूर्ण झाले. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या जयश्रींनी दिल्लीच्या कॉन्वेंट ऑफ जीसस अँड मेरी शाळेत शिकताना मेहनत आणि शिक्षणाला प्राधान्य दिले. त्याकाळी मुलींसाठी इंजिनिअरिंग सारखे क्षेत्र निवडणे आव्हानात्मक होते, तरीही त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची वाट निवडली आणि अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये उच्च शिक्षण घेतले. हे त्यांच्या धैर्याचे आणि महत्वाकांक्षेचे प्रतीक आहे. त्यांच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
करिअरची सुरुवात कशी झाली?
अमेरिकेत पोहोचल्यानंतर जयश्रींनी टेक क्षेत्रात महिलांची कमी संख्या पाहिली, पण त्यांनी याला संधी म्हणून स्वीकारले. त्यांनी फेअरचाइल्ड सेमीकंडक्टर आणि एएमडी सारख्या कंपन्यांमध्ये काम करत कॉम्प्युटर चिप्सच्या निर्मितीचा अनुभव मिळवला. नंतर क्रेसेंडो कम्युनिकेशन्समध्ये मार्केटिंगच्या उपाध्यक्ष म्हणून काम केले. 1993 मध्ये सिस्कोने ही कंपनी विकत घेतली आणि जयश्रींच्या करिअरला खरी गती मिळाली.
सिस्कोमध्ये मिळाले यश
सिस्कोमध्ये 15 वर्षे काम करताना जयश्रींनी नेटवर्किंग व्यवसायाला अब्जावधी डॉलर्सपर्यंत वाढवले. त्या सीनियर व्हाइस प्रेसिडेंट होऊन 15 अब्ज डॉलर्सच्या व्यवसायाची जबाबदारी सांभाळल्या. पण 2008 मध्ये त्यांनी सुरक्षित नोकरी सोडून अरिस्टा नेटवर्क्स नावाच्या छोट्या स्टार्टअपमध्ये सीईओ म्हणून प्रवेश केला. हा धाडसी निर्णय त्यांच्या दूरदृष्टीचा पुरावा म्हणून आपण पाहू शकतो.
अरिस्टा नेटवर्क्सची वाढ
अरिस्टा नेटवर्क्स क्लाउड नेटवर्किंगसाठी स्विच आणि राउटर बनवते, जे मोठ्या डेटा सेंटर्सना जोडण्याचे काम करते. जयश्रींच्या नेतृत्वात ही कंपनी छोट्या खोलीतून बाहेर पडली आणि 2014 मध्ये आयपीओ आणून शेअर बाजारात यशस्वी झाली. त्यांनी हार्डवेअरसोबत सॉफ्टवेअरवर भर दिला, ज्यामुळे गूगल, फेसबुक सारख्या कंपन्या ग्राहक झाल्या. आज अरिस्टा जगातील आघाडीची नेटवर्किंग कंपनी आहे.
संपत्तीची तुलना
हुरुन इंडिया रिच लिस्ट 2025 नुसार जयश्रींची एकूण संपत्ती 50170 कोटी रुपये आहे, जी मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला यांची संपत्ती 9770 कोटी आणि गूगलचे सुंदर पिचाई यांची संपत्ती 5810 कोटी आहे. जयश्रींची संपत्ती यांच्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. ही संपत्ती त्यांच्या कंपनीतील शेअर्समधून आली आहे.
काय दिलाय संदेश?
जयश्री सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहतात पण त्यांच्या बोलण्यात दिल्लीची साधेपणा आजही जाणवतो. यशाचा कोणताही शॉर्टकट नाही; फक्त मेहनत, विश्वास आणि योग्य वेळी जोखीम घेणे गरजेचे असल्याचे त्या सांगतात. भारतीय मूलाच्या व्यक्ती जगातील टेक क्षेत्रात कशा प्रकारे इतिहास घडवू शकतात, हे त्यांच्या कहाणीतून दिसून येतं.
कोणतं फळ खाल्ल्यावर पोट साफ होतं? आतड्यांमध्ये साचलेली घाण काढण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली 5 फळे

आजच्या धावपळीच्या जीवनात, बहुतेक लोकांना पोटाशी संबंधित समस्या येतात. बद्धकोष्ठता ही सर्वात सामान्य आहे. आतड्यांसंबंधी हालचाल न झाल्यामुळे शरीर जड होतेच असे नाही तर चिडचिड, गॅस, डोकेदुखी आणि थकवा देखील वाढतो. जर उपचार न केले तर बद्धकोष्ठतेमुळे मूळव्याधासारख्या गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. म्हणून, नियमितपणे पोट स्वच्छ ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे. चांगली बातमी अशी आहे की ज्याप्रमाणे खाण्याच्या चुकीच्या सवयी बद्धकोष्ठता वाढवू शकतात, त्याचप्रमाणे काही पदार्थ खाल्ल्याने देखील आराम मिळू शकतो. फ्लोरिडा येथील प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट जोसेफ सलहब यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये त्यांनी अशा पाच फळांचे वर्णन केले आहे. डॉक्टर म्हणतात की दररोज ही फळे खाल्ल्याने पोट नैसर्गिकरित्या स्वच्छ होते.
किवी
डॉक्टर म्हणतात की किवी हे एक लहान पण खूप शक्तिशाली फळ आहे. ते फायबर, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. डॉ. सलहब यांच्या मते, दररोज सकाळी दोन किवी खाल्ल्याने मल मऊ होतो आणि आतडे सहजपणे साफ होण्यास मदत होते. तथापि, काही लोकांना किवीची अॅलर्जी असू शकते, म्हणून पहिल्यांदाच थोड्या प्रमाणात खा.
ड्रॅगन फ्रूट
ड्रॅगन फ्रूट केवळ चवीला गोड नसून फायबरनेही समृद्ध असतो. ते आतड्यांच्या हालचालींना गती देते आणि बद्धकोष्ठता दूर करते. ते कापल्यानंतर थेट चमच्याने खाल्ले जाऊ शकते.
बेरी
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरीसारख्या बेरीमध्ये फायबर आणि पाणी दोन्ही चांगल्या प्रमाणात असते. ते मल मऊ करतात आणि कोलन स्वच्छ करण्यास मदत करतात. ते अँटिऑक्सिडंट्समध्ये देखील समृद्ध असतात जे शरीराला आतून मजबूत करतात.
सफरचंद
सफरचंदात आढळणारे पेक्टिन नावाचे फायबर पोटासाठी खूप फायदेशीर आहे. ते कोलन हालचालीला गती देते आणि बद्धकोष्ठता दूर करते. दररोज एक सफरचंद खाणे पोटासाठी वरदान मानले जाते.
पेर
पेरकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, परंतु ते एक उत्कृष्ट नैसर्गिक रेचक आहेत. त्यात सॉर्बिटॉल नावाचा पदार्थ असतो, जो पोट स्वच्छ करण्यास मदत करतो. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्या मुलांसाठी सफरचंद आणि नाशपातीचा रस खूप फायदेशीर ठरू शकतो.
डॉक्टरांचे म्हणणे आहे की तुमच्या दैनंदिन आहारात या फळांचा समावेश केल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. भरपूर पाणी पिणे आणि काही शारीरिक हालचाल करणे देखील आवश्यक आहे.
साताऱ्यात दहशत आणि नाद या वाक्यावरुन महायुतीमधील दोन मंत्र्यांमध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?
Satara News : सातारा जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. ‘दहशत’ आणि ‘नाद’ या दोन शब्दांवरून भाजपचे मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना थेट इशारा दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. फलटण येथे झालेल्या भाजपच्या विजयी सभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी दाढीवर हात फिरवत कोणतरी फलटणमध्ये आलं आणि शिवसेना दहशत खपवून घेणार नाही असं म्हणाले, त्यांना मला सांगायचे आहे दहशत आम्हाला पण चालत नाही आणि मला पण दाढी आहे, असं सांगत आमच्या नादाला लागायचे नाही, असा इशारा दिला होता. ज्यांनी ज्यांनी माझा नाद केला त्यांना मी सोडत नाही, अशी नाव न घेता टीका मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली होती.
Shambhuraj Desai on Jaykumar Gore : जयकुमार गोरेंच्या टीकेला मंत्री शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर
दरम्यान, या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील उत्तर देत माझा नाद करायचा नाही, असं जयकुमार गोरे म्हणतायत याचाच अर्थ दहशत कोणाची आहे हे समजून जावं आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही. निवडणुका असो-नसो मोकळ्या वातावरणामध्ये सगळ्यांनी काम केलं पाहिजे. नाद नाही करायचा असे गोरे मंत्री म्हणत असतील तर अप्रत्यक्ष त्यांनी मान्य केले आहे की दहशत त्यांची आहे. दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेणार नाही. त्यामुळे इथून पुढे दादागिरी, दमदाटी, दहशतीची भाषा केली तर त्याला जशाच तसे उत्तर दिलं जाईल, अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी गोरे यांना उत्तर दिलं आहे. एकूणच या अरे ला कारेच्या उत्तराने महायुतीतील दोन मोठ्या नेत्यामंध्ये चांगलीच जुंपल्याचे बघायला मिळालंय.
Jaykumar Gore on Ramraje Naik Nimbalkar: जयकुमार गोरेंचा रामराजे निंबाळकरांवर हल्लाबोल
भाजप नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीबाबत भाष्य करत रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावरती हल्लाबोल केला आहे. घाटावरचा सारखा खाली येतोय त्याची लायकी काय? अशी मला चिठ्ठी आली आहे. मी काय केलंय असंही विचारलं, मी सांगतो येताना टमटम घेऊन आलो आहे. आता टमटममध्ये बसल एवढेच राहिले आहे. माझ्या भागात विकासकामे झाली नाही पाहिजे म्हणून काम करणारा नेता. या भागातला दुष्काळ हटला नाही पाहिजे असा नेता, अनेक गोष्टी षडयंत्र करणारा नेता, म्हणून हा शकुनी मामा..काय होता तू काय झाला तू.. असा कसा शकुनी मामा बरबाद झाला तू.. अशा शब्दात जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी रामराजे निंबाळकरांवर (Ramraje Naik Nimbalkar) हल्लाबोल केला आहे.(Jaykumar Gore)
हेहि वाचा
आणखी वाचा
‘काय होता तू काय झाला तू, शकुनी मामा बरबाद झाला तू,’ जयकुमार गोरे रामराजेंवर तुटून पडले
सातारा: भाजप नेते आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीबाबत भाष्य करत रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावरती हल्लाबोल केला आहे. घाटावरचा सारखा खाली येतोय त्याची लायकी काय? अशी मला चिठ्ठी आली आहे. मी काय केलंय असंही विचारलं, मी सांगतो येताना टमटम घेऊन आलो आहे. आता टमटममध्ये बसल एवढेच राहिले आहे. माझ्या भागात विकासकामे झाली नाही पाहिजे म्हणून काम करणारा नेता. या भागातला दुष्काळ हटला नाही पाहिजे असा नेता, अनेक गोष्टी षडयंत्र करणारा नेता, म्हणून हा शकुनी मामा..काय होता तू काय झाला तू.. असा कसा शकुनी मामा बरबाद झाला तू.. अशा शब्दात जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी रामराजे निंबाळकरांवर (Ramraje Naik Nimbalkar) हल्लाबोल केला आहे.(Jaykumar Gore)
फलटणच्या विकासावर ही निवडणूक झाली नाही. यांना कुठ जायचं आहे हे माहीत नव्हते हे कधीच लढवय्ये नव्हते. दुसऱ्याला त्रास देऊन सत्तेत राहिले. फलटणमध्ये खूप दहशत आहे, हे शिवसेनेत चालत नाही असं कोणीतरी म्हणाले. आमच्या नादी लागले ते पहिले कोरेगाव नंतर उत्तर कराड आणि फलटणचे.. आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही.. पण आमच्या नादी लागला तर आम्ही सोडत नाही..यांची सुरुवात नगरसेवक पदापासून झाली आणि याचा अस्त नगरपालिका निवडणूकीतुन झाला. यांना राजे म्हणणे हे चुकीच आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या आडून राजकारण केले असंही जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे.
पुढे गोरे म्हणाले की, यांच्या अवस्था अभिनेता असरानी सारखी झाली आहे…अधे इधर अधे उधर…जो शब्द तुम्ही दिला तो पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो. फलटणच्या विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही पुढे गेलो म्हणून ही निवडणूक जिंकली. सर्वांना वाटते मी खूनशी आहे पण मी स्पष्ट वक्ता आहे.या जयकुमार गोरेला कोणी आमदार केला तो या पंचायत समितीने केला. या ठिकाणी 16 ग्रामपंचायतीला कार्यालय नव्हती तर रामराजे(महाराज) काय करत होते. आपण तीस वर्ष काय केले. जयकुमार गोरेचा शब्द आहे. 200 कोटी रुपयाचे रस्ते देतो. ज्या ज्या शिक्षकांनी बुथवर उभे राहून राजकारण केले. अशा शिक्षकांची तक्रार द्या. ज्या शिक्षकांनी घर गड्याचं काम केलं, त्यांनी नोकरी सोडायची आणि त्या ठिकाणी पाणी भरायचं काम करायचं, यापुढे पुन्हा माफी नाही, असंही गोरेंनी म्हटलं आहे.
तर आता यापुढे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या कामाला लागा. पुढील आठ ते दहा दिवसात जिल्हा परिषद लागेल. युद्ध हे शेवटचा शत्रू संपेपर्यंत जिंकता येत नाही. शत्रूंची धाकधूक सुरू आहे. ती संपवायचे आहे, असंही जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
‘त्या’ चहाला ‘चहा’ म्हणायचं नाही; सरकारचे आदेश! ‘चहा’ची व्याख्याच सांगितली

FSSAI Rules On Labeling Tea: भारतात सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या अन्न सुरक्षा नियामकाने (FSSAI) चहासंदर्भात एक नवा आदेश जारी केला आहे. कंपन्यांना कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून बनवलेल्या नसलेल्या पेयांसाठी ‘चहा’ हा शब्द वापरणे थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे सध्या झपाट्याने वाढत असलेल्या हर्बल वेलनेस क्षेत्राच्या ब्रँडिंगला धोका निर्माण करणारे आहे. कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून प्राप्त झालेल्या पेयांनाच ‘चहा’ म्हणून लेबल केले जाऊ शकते, जसे की ब्लॅक टी, ग्रीन टी, कांग्रा टी किंवा इन्स्टंट टी! हर्बल इन्फ्यूजन, फ्लॉवर-आधारित किंवा इतर वनस्पती-आधारित पेये जसे की कॅमोमाइल, पेपरमिंट किंवा आले यांना ‘चहा’ म्हणून ब्रँड करणे बंद करावे लागेल. असं करणं मिसब्रँडिंग मानले जाईल. हल्ली सरसकट सगळ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या ‘चहा’ ऐवजी अशा गोष्टींसाठी ‘हर्बल इन्फ्यूजन’ किंवा तत्सम नावाने वर्गीकृत करावे असे आदेश देण्यात आलेत.
…तोपर्यंत त्याला चहा म्हणता येणार नाही
24 डिसेंबर रोजीच्या सूचनेत, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) इशारा दिला आहे की हर्बल किंवा फुलांवर आधारित इन्फ्युजनला ‘चहा’ म्हणून लेबल करणे चुकीचे ब्रँडिंग आहे. या आदेशात ‘रुइबोस टी’, ‘हर्बल टी’,आणि ‘फ्लॉवर टी’ सारख्या सामान्य बाजारपेठेत लोकप्रीय झालेल्या शब्दांवर बंदी घालण्यात आली आहे. जोपर्यंत उत्पादनात जागतिक मानकांनुसार परिभाषित केलेल्या विशिष्ट सदाहरित कॅमेलिया सायनेन्सिस झुडपांची पाने नसतील तोपर्यंत त्याला चहा म्हणता येणार नाही.
‘टी’ हा शब्द वापरणे थांबवावे
कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून बनवलेल्या पेयांसाठी चहा हा प्रत्यय वापरला जाईल. कॅमोमाइल, हिबिस्कस आणि पेपरमिंट इन्फ्युजनमध्ये चहा हा प्रत्यय वापरता येणार नाही. याचा अर्थ असा की कंपन्यांनी हर्बल इन्फ्यूजन, वनस्पती-आधारित मिश्रणे किंवा इतर चहाशी संबंधित नसलेली उत्पादने जसे की कॅमोमाइल, पेपरमिंट किंवा आले मिश्रीत घटक असतील तर त्यासाठी ‘टी’ हा शब्द वापरणे थांबवावे लागेल. या पदार्थांना प्रोप्रायटरी फूड्स किंवा हर्बल बेव्हरेजेस म्हणून वर्गीकृत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याचा काय परिणाम होणार?
जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठा चहा उत्पादक असलेल्या भारतात हे पाऊल मिसब्रँडिंग रोखण्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. या निर्णामुळे पारंपरिक चहा उत्पादनांना फायदा होणार आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने व्यवसायांना लेबल अपडेट करण्यासाठी वेळ दिला आहे. या नव्या नियमामुळे यामुळे रीब्रँडिंग प्रयत्न होऊ शकतात आणि त्याचा विक्रीवर परिणाम होऊ शकतो. अब्जावधी मूल्याच्या आणि हेल्थ ट्रेंडमुळे विस्तारित होत असलेल्या क्षेत्राला नव्या नियमामुळे थोडाफार धक्का बसेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उदाहरण सांगयचं झालं त, ‘हर्बल टी’ ला ‘हर्बल इन्फ्यूजन’ असं म्हणावं लागेल. हे नवे नियम भारतातील चहा उद्योगाला मजबूत करण्यासाठी आणि जागतिक मानकांशी जुळवून घेण्यासाठी आहेत.
मद्यपानासंदर्भात हादरवून टाकणारा खुलासा! रोज एक पेग घेणाऱ्यांनाही…

Alcohol Consumption Mouth Cancer Risk: थोडी प्यायल्याने काही होत नाही रे, असं म्हणणाऱ्या तळीरामांना धक्का देणारं संशोधन समोर आलं आहे. रोज फक्त एक पेग मद्य प्यायलं तरी कॅन्सरचा धोका 50 टक्क्यांनी वाढतो असं एका संशोधनामधून समोर आलं आहे. मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीने केलेल्या अभ्यासामध्ये ही माहिती समोर आली आहे. दारुचे कमी प्रमाणात नियमित सेवन केले तरी तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असा निष्कर्ष मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीने (अॅक्ट्रेक) एका अभ्यासातून काढला आहे. ओपन अॅक्सेस जर्नल बीएमजे ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, थोड्या प्रमाणात रोज मद्यपान केलं तरी तोंडाच्या, विशेषतः बक्कल म्यूकोसा (गालांच्या आतल्या भागातील) कर्करोगाचा धोका सुमारे 50 टक्क्यांनी वाढतो. यामध्ये महुआ, ताडी, देशी दारू या मद्यांचा धोका सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले.
तंबाखू सेवन, मद्यपानामुळे कर्करोगाचा धोका चार पट वाढतो
तंबाखू सेवन आणि मद्यपानची सवय एकत्र असतील तर कर्करोगाचा धोका अधिक वाढतो असंही अभ्यासात म्हटलं आहे. 2010 ते 2021 या कालावधीत बक्कल म्युकोसा कर्करोग निदान झालेल्या 1803 रुग्णांची तुलना 1903 निरोगी व्यक्तींशी करण्यात आली. अभ्यासात 11 आंतरराष्ट्रीय व 30 स्थानिक मद्यप्रकारांचा समावेश होता. अभ्यासातून असेही स्पष्ट झाले की, तंबाखू सेवन आणि मद्यपान या दोन्ही सवयी एकत्र असतील, तर तोंडाच्या कर्करोगाचा धोका चार पटीने वाढतो.
अभ्यासातून काय अधोरेखित झाले?
मद्यपेयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘गट-1 कर्करोगकारक’ म्हणून वर्गीकृत केले आहे, असं टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले. अॅक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी देशी मद्याच्या बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याकडे लक्ष वेधले. सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांच्या मते, भारतातील बक्कल म्युकोसा कर्करोगाच्या सुमारे 11.5 टक्के प्रकरणे थेट मद्यपानाशी संबंधित आहेत.
बक्कल म्युकोसाचे प्रमाण लक्षणीय
भारतामध्ये तोंडाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. संशोधकांच्या मते दरवर्षी अंदाजे 1 लाख 43 हजार 759 नवीन रुग्ण आढळतात व 79,979 मृत्यू या आजारामुळे होतात. भारतीय पुरुषांमध्ये दर एक लाखांमागे सुमारे १५ इतका त्याचा प्रसार आहे. भारतात तोंडाच्या कर्करोगाचा प्रमुख प्रकार हा गालांच्या व ओठांच्या आतल्या मऊ गुलाबी आवरणाचा (बक्कल म्युकोसा) कर्करोग आहे.
Gas Geyser Safety : बाथरुममध्ये लावलेला गिझर बनू शकतो ‘सायलेंट किलर’, 5 महत्त्वाच्या गोष्टी समजून घ्या

तापमान कमी होत असताना, घरांमध्ये गॅस गिझरचा वापर वाढला आहे. तथापि, अलिकडच्या काळात गॅस गिझरशी संबंधित अपघातांच्या बातम्यांमुळे चिंता निर्माण झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की गॅस गिझर स्वतः धोकादायक नसतात, उलट, अयोग्यरित्या बसवणे आणि वापरल्याने धोका निर्माण होतो. तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही काही सुरक्षितता उपाय येथे दिले आहेत:
वेंटिलेशन सर्वात महत्वाचे
गॅस गिझर एलपीजी जाळून पाणी गरम करतात, ज्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते. ज्वलन दरम्यान, ते कार्बन मोनोऑक्साइड (CO) सोडते, जो एक अत्यंत विषारी वायू आहे. हा वायू बाथरूममध्ये सोडला तर तो घातक ठरू शकतो. बाथरूममध्ये हवेशीर नसल्यास गॅस गिझर बसवू नये याची काळजी घ्या. बाथरूममध्ये फक्त खिडकी असणे पुरेसे नाही; एक्झॉस्ट फॅन बसवणे देखील महत्त्वाचे आहे.
गिझरची उंची आणि फिटिंग
गीझर नेहमी डोळ्याच्या पातळीपेक्षा थोडा वर बसवावा जेणेकरून तुम्हाला त्याची ज्वाला दिसेल. तो कधीही इलेक्ट्रिकल स्विच किंवा प्लगच्या वर थेट बसवू नका.
बाथरूमच्या बाहेर गीझर बसवा
शक्य असल्यास, बाथरूमच्या बाहेर गीझर युनिट बसवा आणि फक्त गरम पाण्याचा पाईप आत आणा. यामुळे गॅस गळती किंवा ऑक्सिजनची कमतरता झाल्यास जीवघेण्या परिस्थिती टाळता येईल.
आंघोळीपूर्वी पाणी गरम करा
गॅस गीझर वापरण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे बादलीत पाण्याने भरणे आणि आंघोळीपूर्वी ते बंद करणे. गीझर चालू असताना लहान बाथरूममध्ये जास्त वेळ राहणे धोकादायक ठरू शकते.
या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
बाथरूममध्ये गीझर वापरताना तुम्हाला खालील लक्षणे आढळल्यास, ताबडतोब निघून जा:
अचानक चक्कर येणे किंवा हलके डोके येणे.
मळमळ किंवा उलट्या होणे.
श्वास घेण्यास त्रास होणे किंवा जास्त झोप येणे.
डोळे खाजणे.

