Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 77

महिला सक्षमीकरणाची आदर्श चेहरा : राजे गटाकडून सौ. वैशाली संदीप कांबळे यांना उमेदवारीची जोरदार मागणी

0
महिला सक्षमीकरणाची आदर्श चेहरा : राजे गटाकडून सौ. वैशाली संदीप कांबळे यांना उमेदवारीची जोरदार मागणी


फलटण प्रतिनिधी :- बरड जिल्हा परिषद गटातील निंबळक गावच्या सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरण चळवळीला नवे नेतृत्व मिळावे, या उद्देशाने राजे गटाकडून मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ. वैशाली संदीप कांबळे यांना उमेदवारी देण्याची जोरदार मागणी होत आहे. शिक्षण, समाजसेवा व महिला सबलीकरण या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य आज संपूर्ण परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सौ. वैशाली कांबळे या उच्चशिक्षित असून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व राज्यस्तरावर मिळाले आहेत. तसेच विविध सामाजिक संस्थांकडूनही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी त्यांना जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय ‘समाजरत्न पुरस्कार’ प्राप्त झाला आहे.
निंबळक, बरड जावली, आंदरुड, गुणवरे, नाईकबोंबवाडी, शेरे शिंदेवाडी, पिंप्रद, मठाचीवाडी, वाजेगाव, टाकळवाडा, राजाळे, साठे फाटा, मुंजवडी, कुरवली आदी गावांमध्ये त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व मानवी सेवेतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिला सक्षमीकरण व सबलीकरण ही काळाची गरज ओळखून गेल्या वीस वर्षांपासून राजे गटाच्या माध्यमातून पूर्व भागात अविरत कार्य सुरू आहे.
दर रविवारी निंबळक येथे महिलांसाठी विविध स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये आरी वर्क, नथ मेकिंग, इमिटेशन ज्वेलरी, मसाले बनवणे, रांगोळी मॅट, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, विविध खाद्यपदार्थ निर्मिती यांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबन मिळवले आहे.
सुशिक्षित बेरोजगार युवक व महिलांसाठी विविध महामंडळांच्या माध्यमातून कर्ज योजना, रोजगार संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत योजना, शिष्यवृत्ती योजना, संजय गांधी निराधार योजना, मेडिक्लेम व विमा योजना, घरकुल आवास योजना, इमारत बांधकाम कामगार योजना, पशुसंवर्धन विभागाच्या योजना आदींचा लाभ पात्र लाभार्थ्यांना विनामूल्य विना मोबदला मिळवून देण्यात आला आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक पुस्तके मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. घटस्फोटीत, विधवा व परितक्त्या महिलांसाठी मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळात गरजू नागरिकांना अन्नधान्य व औषध किट वाटप करण्यात आले. तसेच सांगली व कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य, कपडे व मदतीचा हात पुढे करण्यात आला.
अशा सर्वसमावेशक व लोकाभिमुख कार्यामुळे सौ. वैशाली कांबळे या बरड जिल्हा परिषद गटासाठी सक्षम, संवेदनशील व विकासाभिमुख नेतृत्व ठरतील, असा विश्वास व्यक्त होत असून राजे गटाकडून त्यांच्या उमेदवारीसाठी सर्व स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

25 लाखांपर्यंत…. घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मदत करणार मोदी सरकार; सलग 5 वर्ष मिळणार पैसे

0
25 लाखांपर्यंत…. घराचं स्वप्न साकार करण्यासाठी मदत करणार मोदी सरकार; सलग 5 वर्ष मिळणार पैसे



Government Scheme Home Loan: घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार तुम्हाला मोठी आर्थिक मदत करणार आहे. नेमकी ही मदत काय आणि त्यासाठी कोण पात्र आहे जाणून घ्या सविस्तर माहिती…



Source link

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाचन संस्कृतीस चालना – फलटणमध्ये पोलीस भरती पुस्तकांचा संच भेट

0
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वाचन संस्कृतीस चालना – फलटणमध्ये पोलीस भरती पुस्तकांचा संच भेट


फलटण प्रतिनिधी :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव अध्यक्षीय समिती 2025, फलटण यांच्या वतीने “क्रांतीची धगधगती मशाल” क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती 2025 च्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयास पोलीस भरतीसाठी उपयुक्त अशा पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून ज्ञानाचा प्रकाश समाजात पसरवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन करत, तरुण पिढीला स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळावी व वाचन संस्कृती बळकट व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
“ज्ञानाचा दीप पेटवून अंधार दूर करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन” करत उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक परिवर्तनासाठी शिक्षण हेच प्रभावी साधन आहे, हा संदेश यानिमित्ताने देण्यात आला.

टेंशनमध्ये हात-पाय का गार पडतात? डॉक्टरांनी सांगितली 5 कारणं

0
टेंशनमध्ये हात-पाय का गार पडतात? डॉक्टरांनी सांगितली 5 कारणं


ताणतणावात थंड हातपाय ही एक नैसर्गिक शारीरिक प्रक्रिया आहे, ज्याला वैद्यकीयदृष्ट्या लढा किंवा पळून जाण्याची प्रतिक्रिया म्हणून ओळखले जाते. हे सर्वांना सामान्य वाटत असले तरी, ते अनुभवणाऱ्या व्यक्तीसाठी आणि त्यांच्या मेंदूसाठी आव्हानात्मक किंवा धोकादायक देखील असू शकते. या प्रक्रियेदरम्यान, आपल्या शरीराच्या प्राधान्यक्रम बदलतात आणि अॅड्रेनालाईन आणि कोर्टिसोल सारखे ताण संप्रेरक रक्तवाहिन्या आकुंचन पावतात.

Add Zee News as a Preferred Source

या विषयाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, आम्ही एशियन हॉस्पिटलमधील असोसिएट डायरेक्टर आणि इंटरनल मेडिसिनचे प्रमुख डॉ. सुनील राणा यांच्याशी बोललो. त्यांनी स्पष्ट केले, “ताण आजच्या जीवनाचा एक सामान्य भाग बनला आहे. कामाचा दबाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा भविष्याबद्दलच्या चिंता यांचा केवळ मनावरच नाही तर शरीरावरही परिणाम होतो. तणावाच्या काळात अनेकांना अचानक थंड हातपाय येतात.” ही परिस्थिती भयावह असू शकते, परंतु डॉक्टर म्हणतात की त्यामागे वैज्ञानिक कारणे आहेत. चला या विषयावर थोडे अधिक तपशीलवार चर्चा करूया.

लढा
तणावाच्या वेळी, शरीर स्वतःला धोक्यात असल्याचे समजते आणि “लढा किंवा पळून जाण्याचा प्रतिसाद” सक्रिय होतो. डॉक्टर स्पष्ट करतात की “तणावाच्या वेळी, शरीर मेंदू आणि हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांना प्राधान्य देते, ज्यामुळे हातपायांमध्ये रक्त प्रवाह कमी होतो, ज्यामुळे त्यांना थंडी जाणवते.”

रक्तवाहिन्यांचे आकुंचन
तणावामुळे अ‍ॅड्रेनालाईन आणि कॉर्टिसोल सारखे ताण संप्रेरक बाहेर पडतात. हे संप्रेरक रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. डॉक्टरांच्या मते, “जेव्हा रक्तवाहिन्या आकुंचन पावतात तेव्हा हातपायांपर्यंत कमी गरम रक्त पोहोचते, ज्यामुळे थंडी जाणवणे स्वाभाविक होते.”

चिंता आणि घाबरण्याचे हल्ले
अति ताणामुळे चिंता किंवा घाबरण्याचे हल्ले होऊ शकतात. या काळात, श्वासोच्छवास जलद होतो आणि शरीरातील ऑक्सिजन संतुलन बिघडू शकते. डॉक्टरांच्या मते, “पॅनिक अटॅक दरम्यान, हात आणि पाय थंड होऊ शकतात, सुन्न होऊ शकतात किंवा थरथर कापू शकतात. ही मज्जासंस्थेची प्रतिक्रिया आहे.”

रक्तदाब आणि साखरेच्या पातळीत बदल
काही लोकांचा रक्तदाब अचानक कमी होऊ शकतो किंवा तणावाच्या वेळी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी असंतुलित होऊ शकते. डॉक्टर म्हणतात की “कमी रक्तदाब किंवा कमी साखरेसारख्या परिस्थितीत, हातपायांपर्यंत पुरेशी ऊर्जा पोहोचत नाही, ज्यामुळे हातपाय थंड होऊ शकतात.”

थायरॉईड किंवा मज्जासंस्थेच्या समस्या
जर हातपाय थंड नसतानाही वारंवार थंड राहिले तर ते अंतर्निहित समस्येचे लक्षण असू शकते. डॉक्टर म्हणतात की “ताणामुळे थायरॉईड किंवा मज्जासंस्थेच्या समस्यांमध्ये लक्षणे आणखी बिकट होऊ शकतात. अशा परिस्थितीत, मूल्यांकन आवश्यक आहे.”

डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा?
जर ताणतणावासोबत हातपाय जास्त थंड होणे, सुन्न होणे किंवा मुंग्या येणे, चक्कर येणे, चिंता किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि स्वतःकडे लक्ष द्या.

ताण कमी करण्याच्या टिप्स
डॉक्टरांच्या मते, दररोज खोल श्वास घेणे, योगासने आणि ध्यान करणे, पुरेशी झोप घेणे आणि कॅफिन टाळणे यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. ताणतणावाच्या काळात हातपाय थंड होणे सामान्य आहे, परंतु जर ते वारंवार येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. योग्य माहिती आणि वेळेवर वैद्यकीय सल्ल्याने ही समस्या नियंत्रित केली जाऊ शकते.





Source link

मराठी साहित्य संमेलनात गोंधळ; कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर हल्ल्याचा प्रयत्न

0


99th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan: साताऱ्यात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (99th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनानं आणि ध्वजवंदनानं शुक्रवारी 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बिगुल वाजलं. शुक्रवारी सायंकाळी शहरातून मोठ्या उत्साहात निघालेल्या ग्रंथदिंडीनं वाचन संस्कृतीच्या जागराला दिमाखदार सुरुवात झाली. पण, साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच या साहित्यिकांच्या मेळ्याला गालबोट लागलं आहे. मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर अज्ञातांनी काळा बुक्का टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठा गोंधळ झालाय. 

मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. साहित्य संमेलनाच्या स्थळीच हा हल्ल्याचा प्रयत्न झालाय. काही जणांनी काळा बुक्का टाकत मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. तसेच, अनेकांनी हल्लेखोरांच्या हातात कोयता असल्याचंही सांगितलं आहे. दरम्यान, अद्याप हल्लेखोरांबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. 

काळे कपडे घालते म्हणून लेखकाची अडवणूक 

साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी साताऱ्याला आलेल्या एका युवकानं काळे कपडे घातले, म्हणून त्याला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला जाऊ दिलं नाही. केवळ काळे कपडे घातले म्हणून युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त विजेता लेखक प्रदीप कोकरे यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आत जाऊ दिलं नाही.

आणखी वाचा



Source link

तारा भवाळकरांनी मुख्यमंत्र्यांसमोरच मंचावर नाशिकच्या तपोवनाचा मुद्दा काढला, म्हणाल्या, वृक्षतोड

0


Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला मोठ्या प्रमाणावर वेग आला असून, साधू-महंतांच्या निवासासाठी तपोवन (Tapovan) परिसरातील 1150 एकरांवर साधूग्राम (Sadhugram) उभारण्याची योजना आहे. या कामासाठी 1800 झाडांची तोड (Nashik Tree Cutting) प्रस्तावित असल्याने स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि अनेक सेलिब्रिटींच्या तीव्र नाराजीचा उद्रेक झाला आहे. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर (Tara Bhawalkar) यांनी साहित्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोरच तपोवन वृक्षतोडीवर भाष्य केले आहे. 

Tara Bhawalkar on Nashik Tree Cutting: तपोवनावरील कुऱ्हाड थांबवा : तारा भवाळकर 

तारा भवाळकर म्हणाल्या की, तपोवनावर कुऱ्हाड पडत आहे, असे अक्षरशः वातावरण निर्माण होत आहे. तिथे चळवळ सुरु आहे. प्रचंड विरोध होत आहे. सामान्य नागरिकांपासून अभिजनांपर्यंत सगळे विरोध करत आहेत. कारण प्रकृती टिकली तर आपण प्रकृतीचा भाग असलेले माणसं टिकणार आहोत. प्रकृतीमध्ये जी पंचतत्वे  मानतो, ही झाडांच्या पानांच्या पृथ्वी, आग, पाणी, वायू, आकाश ही सगळी झाड, पानं, मातीच्या आश्रयाने जगतात आणि म्हणून आपण जगतो. कारण आपण प्रकृतीचा एक अंश असतो. आपल्याला स्वार्थ म्हणून देखील जगायचं असलं तरी वनांचे जतन हे केले पाहिजे नाहीतर आपल्या पुढच्या पिढ्यांचे प्राण टिकणे अवघड होईल, असे त्यांनी म्हटले. 

Tara Bhawalkar : कोवळ्या मनावर अन्य भाषांचे ओझे लादणे अयोग्य : तारा भवाळकर

दरम्यान, प्राथमिक  स्तरावर शिकणाऱ्या मुलांच्या कोवळ्या मनावर अन्य भाषांचे ओझे लादणे अयोग्य आहे. मुलांच्या नैसर्गिक विकासासाठी त्यांना मातृभाषेतूनच शिक्षण मिळणे गरजेचे असून, मराठी व्यतिरिक्त अन्य भाषांची सक्ती त्यांच्यावर करू नका, असा सल्ला देखील डॉ. तारा भवाळकर यांनी दिला. डॉ. भवाळकर यांनी मराठी भाषेच्या जागतिक विस्तारावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, मराठी भाषा आज देश, धर्म आणि जातीच्या सीमा ओलांडून सातासमुद्रापार पोहोचली आहे. मराठी माणूस जिथे गेला, तिथे त्याने आपली संस्कृती आणि भाषा रुजविली आहे, याची दखल घेणे आवश्यक आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळाला हे उत्तमच झाले, पण आता मराठी साहित्य आणि भाषेच्या निर्मितीसाठी आपण काही ठोस पायाभूत काम करणार आहोत का? असा सवाल त्यांनी केला. अध्यक्षीय कारकीर्दीबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, समूहाच्या भावनांना व्यासपीठ मिळवून देणे, हेच माझे कार्य राहिले आणि त्यामुळेच माझे विचार सर्वसामान्यांना आपले वाटले, असे त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Ajit Pawar & Ravindra Chavan: अजित पवारSSS… तुम्ही नरेंद्र मोदी अन् फडणवीसांच्या पक्षावर आरोप करताय हे लक्षात ठेवा, रवींद्र चव्हाणांनी दादांना खडसावलं

आणखी वाचा



Source link

‘यळकोट- यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात पार पडला खंडोबा–म्हाळसा विवाह सोहळा; लाखो भाविकांची उपस्थिती

0



Satara news : ‘यळकोट- यळकोट जय मल्हार’च्या जयघोषात पार पडला खंडोबा–म्हाळसा विवाह सोहळा; लाखो भाविकांची उपस्थिती



Source link

काळे कपडे घातल्यानं पोलिसांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या लेखकाला अडवलं, काय घडलं?

0


99th All India Marathi Literary Conference: साताऱ्यात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची (99th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan) दिमाखात सुरुवात झाली. माजी संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाच्या उद्घाटनानं आणि ध्वजवंदनानं शुक्रवारी 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा बिगुल वाजलं. सायंकाळी शहरातून मोठ्या उत्साहात निघालेल्या ग्रंथदिंडीनं वाचन संस्कृतीच्या जागराला दिमाखदार सुरुवात झाली. पण, अशातच साहित्य संमेलनात घडलेल्या एका प्रकारानं मोठी खळबळ माजली आहे. साहित्य संमेलनाला उपस्थित राहण्यासाठी साताऱ्याला आलेल्या एका युवकानं काळे कपडे घातले म्हणून त्याला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला जाऊ दिलं नाही. केवळ काळे कपडे घातले म्हणून युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त विजेता लेखक प्रदीप कोकरे यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी आत जाऊ दिलं नाही.

फेसबुक पोस्टमध्ये लेखक प्रदीप कोकरे यांनी काळे कपडे घातले असल्यामुळे साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम स्थळी पोलिसांनी जाऊ दिलं नाही, असं सांगितलं आहे. तसेच, अडवणूक झाल्याबद्दल विचारणा केल्यानंतर वरिष्ठांचा आदेश आहे आणि कार्यक्रमात उभं राहून कुणी निषेध नोंदवू नये म्हणून काळे कपडे घालणाऱ्यांना आत सोडू नये असं पोलिसांनी सांगितल्याचंही लेखक प्रदीप कोकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले लेखक प्रदीप कोकरे?

नमस्कार,
मी साहित्य संमेलनासाठी सातारा येथे आलोय. आज उदघाटन समारंभ आहे. त्यासाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. मी काळया रंगाचे कपडे घातले म्हणून पोलिसांनी मला मुख्य प्रवेशद्वाराजवळ अडवलं. वरिष्ठांचा आदेश आहे आणि कार्यक्रमात उभं राहून कुणी निषेध नोंदवू नये म्हणून आज काळे कपडे घालणाऱ्यांना आत सोडू नये असं पोलिसांचं म्हणणं पडलं. 
मग मी माझ्या स्वभावाप्रमाणे पोलिसांची,मुख्यमंत्र्यांची आणि आयोजकांची तिथे अक्कल काढली. काळे कपडे घालणाऱ्यांची किंवा काळ्या रंगाची इतकी भीती वाटते तर आयोजकांनी पत्रिका करताना ठळक अक्षरात तसं नोंदवून आपला बिनडोकपणा दाखवून द्यायला काहीच हरकत नव्हती. बरीच बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांकडे काहीही उत्तर नव्हतं. 
तर पोलिसांना आणि असा आदेश काढणाऱ्या थोर लोकांना न जुमानता मी संमेलनात काळ्या रंगासहित पुस्तक प्रदर्शनात असणार आहे. ज्यांना ज्यांना गेटवर अडवलं त्यांनाही मी आत घेऊन आलोय. 
मुख्यमंत्र्यांना निषेधाची इतकी भीती वाटत असेल तर त्यांनी गपचूप घरी बसावं. 
प्लिज निषेध वगैरे नोंदवू नका. यांची तेवढी कुवत नाही.

आणखी वाचा



Source link

भारतात सर्वाधिक कंडोम विक्री कुठे होते? महाराष्ट्र, युपी, बिहार, दाक्षिणात्य राज्य नाही तर ‘हे’ राज्य आघाडीवर

0
भारतात सर्वाधिक कंडोम विक्री कुठे होते? महाराष्ट्र, युपी, बिहार, दाक्षिणात्य राज्य नाही तर ‘हे’ राज्य आघाडीवर


Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते ‘झी 24 तास’मध्ये ‘डेप्युटी न्यूज एडिटर’ म्हणून कार्यरत आहेत.

…Read More





Source link

फलटणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष; समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

0
फलटणचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष; समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गौरव

फलटण प्रतिनिधी :- सातारा येथे आज जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात फलटण शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण नगरपालिकेतील सर्व विजयी नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमास सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याशिवाय भाजपा सातारा जिल्ह्याचे पदाधिकारी, विविध लोकप्रतिनिधी तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला मिळालेले यश हे जनतेच्या विश्वासाचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फलटण शहरासह सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव काम करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. विकासकामे प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या सत्कार समारंभामुळे सातारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात संघटन मजबूत करून विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.