Monday, August 3, 2026
Home Blog Page 578

पतीच्या छातीवर बसून दाबला गळा, नंतर सेक्स पॉवर गोळ्या घेतल्या अन्…; पत्नीचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले

0
पतीच्या छातीवर बसून दाबला गळा, नंतर सेक्स पॉवर गोळ्या घेतल्या अन्…; पत्नीचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले


कानपूरच्या आबिद अली हत्याकांडमध्ये आणखी एक खुलासा झाला आहे. आबिदची पत्नी शबानाने आपल्या 20 वर्षं लहान प्रियकर रेहानसाठी पतीच्या छातीवर बसून त्याचा गळा दाबला. यावेळी रेहान आणि त्याचा मित्र विकास यांनी आबिदचे हात-पाय पकडून ठेवले होते. मृत्यू ओव्हरडोसमुळे झाल्याचं दाखवण्यासाठी शबानाने पतीच्या खिशात शक्तिवर्धक कॅप्सूल ठेवल्या होत्या. पण शवविच्छेदन अहवालात त्यांची पोलखोल झाली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. 

गेल्या गुरुवारी कानपूर पोलिसांनी बिठूरमधील रहिवासी आबिद अलीच्या हत्याप्रकरणी त्याची पत्नी शबाना, तिचा प्रियकर रेहान यांना अटक केली होती. यानंत त्यांनी हत्येत सहभागी तिसरा आरोपी विकासलाही आज बेड्या ठोकल्या. विकास हा रेहानचा मित्र आहे. पैशांच्या हव्यासापोटी त्याने रेहान आणि शबाना यांना मदत केली होती.

काय आहे नेमकं प्रकरण?

19 जानेवारीला पोलिसांनी बिठूर येथे राहणाऱ्या आबिद अलीचा मृतदेह त्याच्या घऱात सापडला होता. त्यावेळी शबाना रडत होती आणि शक्तीवर्धक गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाल्याचा दावा करत होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा आबिदच्या खिशात शक्तीवर्धक कॅप्सूलची 8 पाकिटं सापडली. 

पोलिसांनाही सुरुवातीला गोळ्यांचा ओव्हरडोस झाल्याने मृत्यू झाला असावा असं वाटलं. पण दोन दिवसांनी जेव्हा शवविच्छेदन अहवाल आला तेव्हा मात्र पोलिसांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण आबिदची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी जेव्हा याप्रकरणी तपास सुरु केला तेव्हा शबानाने मोबाईलवरुन रात्री अनेकदा उन्नावच्या बांगरमऊ येथे राहणाऱ्या रेहानशी संवाद साधल्याचं उघड झालं. यानंतर पोलिसांनी रेहानला ताब्यात घेतलं. नंतर शबाना आणि रेहान यांची कसून चौकशी करण्यात आली असता त्यांनी हत्येची कबुली दिली. 

चौकशीत समोर आलं की, शबानाने सोशल मीडियावर आपला तरुणपणातील फोटो लावला आहे. यामुळेच रेहानने शबानाशी बोलणं सुरु केलं होतं. यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. एक दिवस रेहान शबानाला भेटण्यासाठी तिच्या घरी पोहोचला होता. त्यावेळी आबिद घरी नव्हता. यानंतर दोघे सतत एकमेकांना भेटू लागले आणि त्यांच्यात संबंध निर्माण झाले. 

यादरम्यान शबानाने आता आपल्याला रेहानसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पतीने विरोध केला असता त्याला रस्त्यातून हटवण्याचं तिने ठरवलं. यासाठी तिने रेहानला 20 हजार रुपये दिले. रेहानने हत्येत मदत मिळावी यासाठी दिल्लीत राहणारा आपला मित्र विकासलाही बोलावलं. 

पतीकडूनच मागवले शक्तीवर्धक गोळ्या

शबानाचा पती कधीकधी शक्ती वाढवणाऱ्या कॅप्सूल घेत असे. अशा परिस्थितीत, शबानाने या कॅप्सूलद्वारे मृत्यू दाखवण्याची योजना आखली. 19 जानेवारी रोजी तिने पतीकडून आठ शक्ती वाढवणाऱ्या कॅप्सूल मागवल्या. मग रात्री तिने तिच्या प्रियकराला आणि त्याच्या मित्राला बोलावून पतीची हत्या केली. हत्येनंतर त्याच्या खिशात कॅप्सूलचे पॅकेट ठेवण्यात आले होते. सकाळी उठल्यावर तिने गोंधळ घातला की तिच्या पतीने खूप जास्त शक्ती वाढवणाऱ्या कॅप्सूल घेतल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

20 जानेवारी रोजी पोलिसांनी आबिदच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला होता. दोन दिवसांनी, बुधवारी संध्याकाळी, जेव्हा आबिदचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पोलिस ठाण्यात पोहोचला तेव्हा पोलिसांना धक्काच बसला. यानंतर, जेव्हा पोलिसांनी शबानाचा भाऊ सलीमची चौकशी केली तेव्हा त्याने बहिणीनेच हत्या केल्याचं सांगितलं.

यानंतर पोलिसांनी तपास करून शबानाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स काढले आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी गुरुवारी शबाना आणि तिचा प्रियकर रेहानला अटक केली. आज, शुक्रवारी, तिसरा आरोपी विकास यालाही अटक करण्यात आली. विकासने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, रेहानने त्याला हत्येत मदत करण्यासाठी 10 हजार रुपये दिले होते.





Source link

Report: 2030 पर्यंत 9 कोटींहून अधिक लोकं होणार बेरोजगार? ‘या’ 13 क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी जरा संभाळून!

0
Report: 2030 पर्यंत 9 कोटींहून अधिक लोकं होणार बेरोजगार? ‘या’ 13 क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी जरा संभाळून!


The Future Of Jobs Report 2025: भारतात बहुतांशजण नोकरी करतात. जगभरात आर्टिफिशिल इंटेलिजन्सने शिरकाव केलाय. त्यामुळे अनेक गोष्टी जशा सोप्या झाल्यायत त्याप्रमाणे अनेकांच्या नोकरीवर गदा देखील आली आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ‘फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ मध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.

2030 पर्यंत जगात 170 दशलक्ष नवीन नोकऱ्या निर्माण होतील. असे असताना त्यासोबतच सुमारे 92 दशलक्ष नोकऱ्याही जातील, असे ‘फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्ट 2025’ मध्ये म्हटले आहे. जगभरात वेगाने होणारी तांत्रिक प्रगती, डिजिटल परिवर्तन आणि हरित अर्थव्यवस्थेकडे जगाची वाटचाल यामुळे हे बदल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. जुन्या कौशल्यांची मागणी हळूहळू कमी होईल आणि तांत्रिक कौशल्ये शिकणे अनिवार्य होईल, असे या रिपोर्टमधून स्पष्ट होतंय. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आणि स्वतःला सतत अपडेट ठेवणे हाच भविष्यात नोकरीच्या संधी सुरक्षित करण्याचा एकमेव मार्ग आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अहवालानुसार, डिजिटल प्रवेशाचा विस्तार हा सर्वात परिवर्तनकारी ट्रेंड असेल. यामुळे 2030 पर्यंत आमच्या व्यवसायात मोठे बदल घडतील असे जवळपास नोकऱ्या देणाऱ्या 60 टक्के जणांना वाटते. तांत्रिक प्रगतीचा रोजगार बाजारपेठेवर खोलवर परिणाम होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि बिग डेटा (86%), रोबोटिक्स आणि ऑटोमेशन (58%) आणि ऊर्जा निर्मिती, साठवणूक आणि वितरण (41%) यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडून येईल, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. एकीकडे या क्षेत्रांमध्ये नवीन नोकऱ्या निर्माण होतील तर दुसरीकडे अनेक पारंपारिक नोकऱ्या नष्ट होतील, असे सूचक विधानही यातून करण्यात आले आहे. 

भारतावर काय परिणाम?

भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत हा बदल आणखी स्पष्टपणे दिसून येईल. डिजिटल इंडिया आणि हरित ऊर्जा प्रकल्पांमुळे आयटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन नोकऱ्यांचा विस्तार होईल, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. हे होत असताना डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि प्रिंटिंग उद्योगातील कामगारांसारख्या पारंपारिक नोकऱ्या गमावल्या जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. येत्या दशकात पुढील क्षेत्रांमध्ये वेगाने नोकऱ्या कमी होण्याची शक्यता आहे.

पोस्टल सर्व्हिस लिपिक
बँक टेलर आणि संबंधित क्लर्क
डेटा एन्ट्री ऑपरेटर
कॅशियर आणि तिकीट क्लार्क
प्रशासकीय सहाय्यक आणि कार्यकारी सचिव
छपाई आणि संबंधित व्यापार कामगार
अकाउंटिंग, बुककीपिंग आणि पेरोल क्लर्क
स्टॉक-कीपिंग आणि मटेरियल रेकॉर्डिंग लिपिक
ट्रान्सपोर्टेशन अटेंडंट आणि वाहक
डोअर टू डोअर सेल्स वर्कर आणि न्यूज वेंडर
ग्राफिक डिझायनर्स
क्लेम अॅडजेस्टर आणि इन्व्हेस्टिगेटर्स
लीगल ऑफिसर्स
टेलिमार्केटर्स

नोकऱ्यांच्या मार्केटमध्ये बदल आणि कौशल्यांची गरज

2025 ते 2030 दरम्यान नोकऱ्यांच्या मार्केटमध्ये एकूण नोकऱ्यांपैकी 22% बदल दिसून येईल. यामुळे 14% नवीन नोकऱ्या निर्माण होतील तर 8% नोकऱ्या जातील. एकूणच या बदलामुळे 7% सकारात्मक वाढ होईल. ज्यामुळे 78 दशलक्ष नोकऱ्या निर्माण होतील, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. 2030 पर्यंत जॉब मार्केटमध्ये 39% प्रमुख कौशल्ये बदलतील. म्हणूनच नोकरी देणारे आता सतत नवीन कौशल्ये शिकणे आणि जुनी कौशल्ये अपडेट करणे यावर भर देत असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.





Source link

Train Chai Video: रेल्वेतून प्रवास करताना चहा पिताय? मग आजपासूनच थांबवा, संतापजनक व्हिडिओ व्हायरल!

0
Train Chai Video: रेल्वेतून प्रवास करताना चहा पिताय? मग आजपासूनच थांबवा, संतापजनक व्हिडिओ व्हायरल!


Viral News: लांबच्या रेल्वे प्रवासादरम्यान खाणे- पिणे सामान्य आहे. काही प्रवासी घरूनच सर्व व्यवस्था करतात, तर काही रेल्वेत फिरणाऱ्या विक्रेत्यांवर अवलंबून असतात. मात्र, काही विक्रेते अशा प्रवाशांच्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. सध्या सोशल मीडियावर रेल्वेत चहा विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चहाविक्रेता चक्क शौचालयात चहाचा डबा धुताना दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.



Source link

महाराष्ट्राच्या आणखी एका शेजारील राज्यात दारुबंदी, पहिल्याच टप्प्यात 17 शहरांमध्ये अंमलबजावणी

0
महाराष्ट्राच्या आणखी एका शेजारील राज्यात दारुबंदी, पहिल्याच टप्प्यात 17 शहरांमध्ये अंमलबजावणी


Liquor Ban News: गुजरातसह महाराष्ट्राचा आणखी एक शेजारील राज्य आता दारुमुक्त होणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यात दारुबंदीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

मध्य प्रदेशची दारुबंदी विविध टप्प्यांमध्ये लागू केली जाणार आहे. यातील पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात प्रामुख्याने धार्मिक महत्व असलेल्या शहरात दारुबंदी लागू केली जाणार आहे. यानंतर बाकीच्या शहरांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल.

कोणत्या ठिकाणी होणार दारुबंदी? 

मध्य प्रदेश सरकारने 17 धार्मिक ठिकाणी दारुबंदीचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये एक महापालिका, सहा नगरपालिका, सहा नगर परिषद आणि चार ग्रामपंचायत क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने उज्जैन महानगरपालिकांचा समावेश आहे. ज्यामध्ये दतिया, पन्ना, मंडला, मंदसौर, मैहर, नगर परिषद क्षेत्र ओंकारेश्वर, महेश्वर ओरछा, चित्रकूट, अमरकंटक या ठिकाणी दारुबंदी करण्यात आली आहे. असे देखील म्हटले जात आहे की, ज्या ठिकाणी दारुबंदी करण्यात आली आहे, त्या ठिकाणचे दारुचे दुकान इतर कोणत्याही ठिकाणी स्थलांतरित केले जाणार नाही. 

मंत्र्यांना दिला ‘हा’ अधिकार 

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी सांगितले की, विशेष परिस्थितीत मंत्र्यांना त्यांच्या विभागातील बदल्या करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. याबाबतचे औपचारिक धोरण येत्या काळात आणले जाणार आहे. शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीपूर्वी मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी नर्मदा नदीच्या काठी बसून एक विशेष पूजा आणि आरती देखील केली. त्यानंतर सर्व मंत्र्यांनी महेश्वर येथील राणी अहिल्याबाई यांच्या गडाला भेट दिली. मोहन यादव यांच्या मंत्रिमंडळाची पहिली डेस्टिनेशन बैठक महेश्वर या ठिकाणी पार पडली. राणी अहिल्याबाई यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त ही सभा अयोजित करण्यात आली होती. 

मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, वारसा सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने राणी अहिल्याबाई यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.





Source link

कर्मचाऱ्यांना 90 तास काम करा म्हणणाऱ्या कंपनीला 700000000000 रुपयांचा फटका

0
कर्मचाऱ्यांना 90 तास काम करा म्हणणाऱ्या कंपनीला 700000000000 रुपयांचा फटका


Defence Ministry rejects L and T Submarine Deal: केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने इंजिनिअरिंग क्षेत्रातील प्रमुख कंपनी लार्सन अँड टुब्रोला (L&T) मोठा झटका दिला आहे. भारतीय नौदलाला सहा स्टेल्थ पाणबुड्या पुरवण्याच्या पाच अब्ज युरोच्या करारासाठी लार्सन अँड टुब्रो लिमिटेड आणि स्पॅनिश संरक्षण क्षेत्रातील प्रमुख नॅव्हेंटिया यांची बोली अखेर रद्द करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयाला त्यांनी निश्चित केलेल्या आवश्यकता पूर्ण केल्या जात नसल्याचं लक्षात आल्यानंतर हा करार संपुष्टात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, पाणबुडीच्या फील्ड चाचण्यांनंतर एल अँड टी-नवांटिया जोडी शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर, जर्मन संरक्षण क्षेत्रातील प्रमुख थायसेनक्रुप मरीन सिस्टम्स (टीकेएमएस) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांच्या संयुक्त उपक्रमाने हा करार केला जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. तथापि, मूल्यांकन चाचण्यांच्या निकालांवर कोणतीही अधिकृत टिप्पणी किंवा तपशील प्राप्त झालेला नाही. संरक्षण मंत्रालय पुढील काही महिन्यांत ‘प्रोजेक्ट 75 इंडिया’ (P75-I) च्या विजेत्याची घोषणा करण्याच्या प्रक्रियेत आहे. या प्रकल्पांतर्गत सहा पाणबुड्या बांधल्या जाणार आहेत.

सहा पाणबुड्या खरेदी करण्यासाठी 70 हजार कोटींची निविदा

सरकारने सहा पाणबुड्या खरेदी करण्यासाठी 70 हजार कोटींची निविदा काढली होती, ज्यामध्ये एल अँड टीनेही बोली लावली होती. तथापि, संरक्षण मंत्रालयाने त्यांनी अटींचं पालन केलं नसल्याचं म्हटलं आहे. भारतीय नौदलाला प्रोजेक्ट 75 इंडिया अंतर्गत अशा सहा पाणबुड्या खरेदी करायच्या आहेत ज्या तीन आठवडे पाण्याखाली राहू शकतात. एएनआय वृत्तसंस्थेनुसार, संरक्षण सूत्रांनी सांगितले की एल अँड टीने स्पॅनिश कंपनी नवांटियासोबत एक प्रस्ताव सादर केला होता परंतु तो नौदलाच्या आवश्यकता पूर्ण करत नव्हता. या कारणास्तव ते नाकारण्यात आले आहे. ही कंपनी नौदलाच्या धोरणात्मक पाणबुडी प्रकल्पांमध्ये सहभागी आहे. 

पहिली पाणबुडी 2032 पर्यंत मिळण्याची अपेक्षा 

जर करारावर स्वाक्षरी झाली तर पहिली पाणबुडी 2032 पर्यंत डिलिव्हर केली जाण्याची अपेक्षा आहे, म्हणजेच स्वाक्षरीच्या तारखेपासून सात वर्षं पूर्ण होतील, असं सूत्रांची माहिती आहे. हा करार संरक्षण मंत्रालयाच्या अधिग्रहण प्रकल्प प्रकल्प 75 (भारत) अंतर्गत केला जात आहे. 

90 तास काम करण्याच्या विधानामुळे वाद

एल अँड डी अलीकडेच त्यांचे अध्यक्ष आणि एमडी एस एन सुब्रह्मण्यम यांच्या एका विधानामुळे चर्चेत आली होती. रेडिटवर त्यांचा एक व्हिडिओ आला ज्यामध्ये ते कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला देत होते. माझ्या नियंत्रणात असतं तर रविवारीही कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांना कामावर लावलं असतं, असे ते म्हणाले. होते व्हिडिओमध्ये तो कर्मचाऱ्यांना सांगत आहे की, ‘घरी बसून तुम्ही काय करता?’ तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ पाहू शकता? चल, ऑफिसला जा आणि कामाला लागा.” यामुळे त्याला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले.

 





Source link

Amul Milk Price: बजेटआधीच ‘अमूल’कडून सर्वसामान्यांना गुड न्यूज; ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं दूध!

0
Amul Milk Price: बजेटआधीच ‘अमूल’कडून सर्वसामान्यांना गुड न्यूज; ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं दूध!



Amul Milk Price: अमूल डेअरीने दुधाच्या दरात कपातीची घोषणा केली आहे.



Source link

‘माझ्यावर असंच प्रेम करत राहा,’ महाकुंभमधून घरी परतली व्हायरल गर्ल मोनालिसा, म्हणाली ‘पुढचं स्नान असेल तेव्हा…’

0
‘माझ्यावर असंच प्रेम करत राहा,’ महाकुंभमधून घरी परतली व्हायरल गर्ल मोनालिसा, म्हणाली ‘पुढचं स्नान असेल तेव्हा…’


Viral girl Monalisa: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभमेळ्यात लाखो भाविकांनी आतापर्यंत पवित्र स्नान केलं आहे. महाकुंभमेळ्याला हजेरी लावणारे अनेकजण सोशल मीडियावर व्हायरल झाले असून यामध्ये निळ्या रंगाची मोनालिसाही आहे. पण हे व्हायरल होणं मोनालिसाला त्रासदायक ठरलं आहे. हे इतकं त्रासदायक झालं की तिने महाकुंभमेळावा सोडला आहे. लवकरच ती मध्य प्रदेशच्या महेश्वर येथील आपल्या घरी पोहोचेल. मोनालिसान सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत व्हायरल गर्लने हा दावा केला आहे. 

मोनालिसाने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत लिहिलं आहे की, “कुटुंब आणि माझ्या सुरक्षेसाठी मला पुन्हा इंदोरला जावं लागत आहे. शक्य झाल्यास पुढील शाही स्नानाला आपली भेट होईल. तुमच्या पाठिंबा आणि प्रेमासाठी आभार”.

यासह ती व्हिडीओत सांगत आहे की, “हॅलो गाईज, मी आता थोड्या वेळात महेश्वरला पोहोचणार आहे. जर मदत मिळाली तर पुढील स्नानाला लवकर जाईल. तुम्ही काळजी घ्या. मला असंच प्रेम देत राहा आणि व्हिडीओ शेअर करत राहा”.

आपल्या निळ्या डोळ्यांमुळे आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलेली मोनालिसा मध्य प्रदेशच्या खरगोना जिल्ह्यातील महेश्वरची राहणारी आहे. मोनालिसाचे पूर्वज राजस्थानच्या चित्तोडगड मधून 150 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशात आले होते. घुमन्तु  कुटुंबातील मोनालिसाचे पूर्वज जवळपास 30 वर्षापूर्वी महेश्वर येथे येऊन स्थायिक झाले. व्हायरल गर्लचं कुटुंब रुद्राक्ष, रुद्राक्षाच्या माळा, शिवलिंग असं साहित्य मेळाव्यांमध्ये विकून आपलं पोट भरतं. 

मोनालिसाच्या कुटुंबात आई-वडिलांस तिची छोटी बहीण आणि दोन भाऊ आहेत. मोनालिसाचं मोजकं शिक्षण झालं आहे. देशभरातील मेळाव्यांमध्ये हे बहिण भाऊ, आई-वडील माळा, रुद्राक्ष विकतात. सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोनालिसासह तिचं कुटुंब माळा विकताना अडचणींचा सामना करत होतं. लोक माळा खरेदी करण्यापेक्षा मोनालिसासह फोटो काढण्याची गर्दी करत होते. यामुळे मोनालिसाला घरी पाठवण्यात आलं. 





Source link

Indian in USA: रिटर्न तिकिट नसल्याच्या कारणावरून भारतीयांना अमेरिकेत प्रवेश नाकारला; ट्रम्पच्या घोषणेमुळे फटका

0
Indian in USA: रिटर्न तिकिट नसल्याच्या कारणावरून भारतीयांना अमेरिकेत प्रवेश नाकारला; ट्रम्पच्या घोषणेमुळे फटका


डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून इमिग्रेशन नियमांमध्ये मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर अमेरिकेतील इमिग्रेशन अधिकारी अलर्ट मोडवर गेले असून याचा पहिला फटका अमेरिकास्थित स्थलांतरित भारतीय समुदायाला बसला आहे. अमेरिकेत एच 1-बी सारख्या तात्पुरत्या व्हिसावर काम करत असलेले अनेक भारतीय राहत आहेत. नव्या इमिग्रेशन नियमांमधील यात संभाव्य बदल कोणते होणार याबाबत येथे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ट्रम्प यांनी सध्या नुसती घोषणा केली आहे. परंतु नेमके बदल काय केले जाणार याविषयी अनिश्चितता आहे. ट्रम्प हे इमिग्रेशन धोरणे कठोरपणे राबविण्याबाबत ओळखले जातात. त्यामुळे या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.



Source link

अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी Halwa Ceremony का साजरी केली जाते? त्यामागचा उद्देश काय?

0
अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी Halwa Ceremony का साजरी केली जाते? त्यामागचा उद्देश काय?


Union Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज 24 जानेवारी रोजी दरवर्षी होणारी हलवा सेरेमनी पार पडणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या उपस्थितीत संध्याकाळी 5 च्या सुमारास नॉर्थ ब्लॉकमध्ये आयोजित केला जाणार आहे. बजेटची तयारीत व्यस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून लॉक-इन प्रक्रिया सुरू होण्याआधीच पारंपारिक हलवा सोहळ्याचे आयोजन केले जाते. कोरोना काळात म्हणजेच 2021मध्ये हलवा सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं नव्हतं. 

अर्थ मंत्रालयाकडून कित्येक वर्ष हा रिवाज पाळला जात आहे. एका मोठ्या कढाईत हा हलवा तयार केला जातो.  त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री, अर्थराज्यमंत्री, अर्थ सचिव यांच्या उपस्थितीत सर्वांना गोड म्हणून हलवा दिला जातो. सर्वांचे तोंड गोड करुन अर्थसंकल्पाच्या छपाईला सुरुवात केली जाते. 

हलवा का केला जातो?

कोणत्याही कामाची सुरुवात करताना गोडधोड करुन करावी, अशी आपल्या भारतीय संस्कृतीत प्रथा आहे. त्यानुसार अर्थ मंत्रालयाकडून हा रिवाज पाळला जात आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये अर्थसंकल्पाची छपाई केली जाते. ज्यावेळेस अर्थसंकल्पाची छपाई सुरू असते तेव्हा अर्थमंत्रालयात अधिकाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जात नाही. बजेट संसदेत सादर होईपर्यंत कोणालाही मंत्रालयात प्रवेश दिला जात नाही किंवा कर्मचाऱ्यांना बाहेर जाता येत नाही. ही संपूर्ण प्रक्रिया गोपनीय असते. इतकंच काय तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसोबतही संपर्क साधता येत नाही. 

1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाही अर्थसंकल्पातून सामान्यवर्गाला अनेक अपेक्षा आहेत. बजेटमधून यंदा कॉमन मॅनला दिलासा मिळू शकतो. ज्यांची वर्षभराची कमाई 10 ते 15 लाख रुपयांदरम्यान आहे त्यांना दिलासा मिळू शकतो. तसंच, या बजेटमधून इंफ्रास्ट्रक्चर सेक्टरला बूस्ट मिळू शकतो. सरकार हॉटेल, मॅन्युफॅक्चरिंग आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांना प्रोत्साहन आणि टॅक्समध्ये दिलासा देऊ शकते. रेल्वे, रस्ते बांधकाम, शहरी विकास आणि पॉवर सेक्टरमध्ये अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. सरकार आर्टिफिशिअल इंटेलिजेंसवरही अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. 

हलवा समारंभ ही जुनी परंपरा आहे. पण ही परंपरा कधी सुरू झाली याबद्दल अचूक माहिती उपलब्ध नाही. पण १९५० मध्ये, अर्थसंकल्पातील काही तपशील आधीच लीक झाले होते. यानंतर या सोहळ्याचे महत्त्व वाढले. अर्थसंकल्प छपाईचे ठिकाण देखील बदलण्यात आले, प्रथम राष्ट्रपती भवनापासून मिंटो रोडपर्यंत आणि नंतर १९८० पासून ते अर्थ मंत्रालयाच्या तळघरात छापले जाऊ लागले.





Source link

Binge Watch : अडीच तासांचा भन्नाट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, शेवट पाहून होईल डोक्याचा भुगा! तुम्ही पाहिलाय का?

0
Binge Watch : अडीच तासांचा भन्नाट सस्पेन्स थ्रिलर चित्रपट, शेवट पाहून होईल डोक्याचा भुगा! तुम्ही पाहिलाय का?


Suspense Thriller Movie Binge Watch : गेल्या वर्षी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर ‘महाराजा’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. विजय सेतुपती यांच्या या चित्रपटाला खूप प्रेम मिळाले. हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुफान गाजला होता. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक ब्लॉकबस्टर ॲक्शन-थ्रिलर चित्रपट घेऊन आलो आहोत. अडीच तासांचा हा चित्रपट पाहताना तुम्हीही तुमच्या जागेवरून उठणे देखील विसराल. हा चित्रपट ‘महाराजा’लाही टक्कर देणारा आहे. इतकंच नाही तर, या चित्रपटाचा क्लायमॅक्स तुमच्या डोक्याचा नक्कीच भुगा करेल.



Source link