Friday, July 31, 2026
Home Blog Page 546

Indian Railways: अर्थसंकल्प सादर होताच रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ बाबत दिली मोठी अपडेट, वाचून तुम्हालाही होईल आनंद!

0
Indian Railways: अर्थसंकल्प सादर होताच रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ बाबत दिली मोठी अपडेट,  वाचून तुम्हालाही होईल आनंद!


अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये पुढील आर्थिक वर्षासाठी रेल्वेसाठी २.५२ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी वंदे भारत ट्रेनबाबत असे अपडेट दिले, ज्यामुळे लाखो प्रवाशांना आनंद होईल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी अर्थसंकल्पात २०० वंदे भारत गाड्या बनवण्याच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले आहे.



Source link

रेल्वे प्रवास होणार सोपा!100 अमृत भारत, 50 ​​नमो भारत आणि 200 वंदे भारत गाड्या बनवण्याची घोषणा!

0
रेल्वे प्रवास होणार सोपा!100 अमृत भारत, 50 ​​नमो भारत आणि 200 वंदे भारत गाड्या बनवण्याची घोषणा!


Railway Budget: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला. यात 12 लाखाहून कमी उत्पन्न असलेल्यांना करात सवलत देण्यासह विविध महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले. दरम्यान रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे बजेटसंदर्भात माहिती दिली. त्यांच्या या घोषणेनंतर देशवासियांचा रेल्वे प्रवास किती सोपा होणार आहे, याचा अंदाज येईल. काय म्हणाले रेल्वेमंत्री? यामुळे देशवासियांना कसा फायदा होणार? जाणून घेऊया. 

पुढील आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रेल्वेसाठी 17 हजार 500 सामान्य कोच, 200 वंदे भारत आणि 100 अमृत भारत गाड्यांच्या निर्मितीसारख्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली. 2025-26 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केल्यानंतर वैष्णव यांनी रेल भवन येथे पत्रकारांशी बोलताना रेल्वेसाठी वाटप केलेल्या प्रकल्पांची आणि आगामी खर्चाची माहिती दिली.

अर्थसंकल्पात 4.6 लाख कोटी रुपयांच्या नवीन प्रकल्पांचा समावेश  करण्यात आला आहे. जे चार ते पाच वर्षांत पूर्ण होतील. नवीन रेल्वे मार्ग टाकणे, विद्यमान रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, नवीन बांधकाम, स्थानकांचा पुनर्विकास आणि उड्डाणपूल आणि अंडरपास सारख्या कामांशी संबंधित हे प्रकल्प असतील अशी माहिती त्यांनी दिली. 

200 वंदे भारत ट्रेन बांधण्याची घोषणा

रेल्वे प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेता पुढील 2-3 वर्षांत 100 अमृत भारत, 50 ​​नमो भारत आणि 200 वंदे भारत गाड्या बांधल्या जाणार असल्याचे यावेळी रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. नवीन अमृत भारत गाड्यांमुळे इतर अनेक कमी अंतराच्या शहरांनाही जोडले जाणार असल्याचे ते म्हणाले. 

गाड्यांमध्ये जनरल कोचच्या कमतरतेबद्दल त्यांना यावेळी प्रश्न विचारण्यात आला. यावर वैष्णव म्हणाले की, येत्या काळात असे 17 हजार 500 कोच तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे.सामान्य कोचचे उत्पादन आधीच सुरू आहे आणि 31 मार्च अखेरपर्यंत असे 1 हजार 400 कोच तयार होतील. पुढील आर्थिक वर्षात 2 हजार सामान्य कोच बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. यासोबतच 1 हजार नव्या फ्लायओव्हरच्या बांधकामांना मंजूरी देण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  

रेल्वे वाहतुकीत मोठी कामगिरी

भारतीय रेल्वे 31 मार्च 2025 पर्यंत मालवाहतूक क्षमतेशी संबंधित एक महत्त्वाचा टप्पा गाठणार आहे. आम्ही 31 मार्चपर्यंत 1.6 अब्ज टन माल वाहून नेण्याचे लक्ष्य साध्य करू आणि भारतीय रेल्वे जगात मालवाहतुकीच्या बाबतीत चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल आणि भारतीय रेल्वे वाहतूक करण्याचे लक्ष्य साध्य करेल असे ते यावेळी म्हणाले. तसेच सरकार 2025 पर्यंत 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

यावेळी वैष्णव यांनी रेल्वेच्या सुरक्षेवर भाष्य केले. यासाठी केंद्र सरकारने 1.8 लाख कोटी रुपयांवरून 1.14 लाख कोटी रुपये इतकी तरतूद केली आहे. पुढील आर्थिक वर्षात हा आकडा 1.16 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवला जाईल, असे ते म्हणाले. जर सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत येणारी गुंतवणूकही यामध्ये जोडली तर एकूण बजेट 2.64 लाख कोटी रुपये होईल, असेही ते म्हणाले.





Source link

मी तुझ्या मुलाची आई होणार आहे..; मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचे बोलणं ऐकून पतीची सटकली, रागाच्या भरात केलं मोठं कांड

0
मी तुझ्या मुलाची आई होणार आहे..; मधुचंद्राच्या रात्रीच पत्नीचे बोलणं ऐकून पतीची सटकली, रागाच्या भरात केलं मोठं कांड


यूपीतील बदायूं मध्ये एका नवविवाहितेच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली असून फरार पाच जणांचा शोध सुरू केला आहे.  अटक केलेल्या पतीने पोलिसांना सांगितले की, लग्नापूर्वी त्याचे पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. लग्नाच्या रात्री ती म्हणाली की, ती त्याच्या मुलाची आई होणार आहे. लग्नाच्या पहिल्याच रात्री हे ऐकून त्याला धक्का बसला आणि त्याने कुटुंबासह त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला.



Source link

भारतातील या शहरात आहे ‘मृत्यूचं हॉटेल’, लोक फक्त मरायला येतात अन् एका दिवसासाठी देतात एवढं भाडे

0
भारतातील या शहरात आहे ‘मृत्यूचं हॉटेल’, लोक फक्त मरायला येतात अन् एका दिवसासाठी देतात एवढं भाडे


भारत हा पर्यटन स्थळांनी नटलेला देश असून इथे पर्यटकांसाठी राहण्यासाठी असंख्य हॉटेल्स आहेत. वेगळ्या वेगळ्या बजेटमध्ये सुंदर आणि आकर्षित अशी हॉटेल्स आहेत. पण आज आम्ही तुम्हाला अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल जाणून तुम्हाला धक्काच बसेल. भारतातील शहरात असं हॉटेल आहे, ज्याला मृत्यूचं हॉटेल म्हणतात. कुठे आहे हे हॉटेल आणि काय आहे यामागील इतिहास पाहूयात.

भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांना धार्मिक महत्त्व आहे. या ठिकाणी भाविकांची गर्दी दिसून येत आहे. धर्माशी संबंधित लोकांमध्ये या स्थानांना खूप महत्त्व आहे. वाराणसी हे त्यापैकीच एक. बनारसच्या काठी लोक मोक्षासाठी येतात. तुम्हाला इथे अशी अनेक स्मशानभूमी दिसतील जिथे आग कधीच थंड होत नाही. हिंदू धर्मानुसार, जो बनारसमध्ये मरतो तो थेट वैकुंठाला जातो.

अनेक लोक त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची शेवटची इच्छा म्हणून बनारसमध्ये अंत्यविधीची व्हावेत असं म्हणतात. बनारसच्या पवित्र भूमीवर शेवटचा श्वास घेऊन येथेच प्राण त्याग करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय आहे. हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच अनेकजण निघून जातात. अशा स्थितीत त्यांची अस्थिकलश गंगेत टाकली जाते. मात्र, आता बनारसमध्ये अशी अनेक हॉटेल्स उघडली गेली आहेत, जिथे लोक राहतात आणि मृत्यूची वाट पाहतात.

होय, हे अगदी खरे आहे. सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तीने लोकांना या मृत्यूच्या हॉटेल्सची झलक दाखवली. खूप आजारी असलेले लोक या हॉटेल्समध्ये येतात. त्यांच्याकडे आता फारसा वेळ नसल्याची जाणीव होते. अशा परिस्थितीत बनारसमध्ये अखेरचे श्वास मोजण्यासाठी ते या मृत्यूच्या हॉटेल्समध्ये मुक्काम करतात. ते इथेच खोल्या घेतात आणि तिथेच राहायला लागतात, जेणेकरून ते या ठिकाणी मरतात आणि थेट स्वर्गाच्या दारापर्यंत पोहोचू शकतात.

एका हॉटेलच्या मालकाशीही त्या व्यक्तीने चर्चा केली. बनारसमध्ये मृत्यूची वाट पाहण्यासाठी आजारी लोक त्यांच्या हॉटेलमध्ये खोल्या घेतात, असे त्यांनी सांगितलं. येथे येणारे बहुतांश लोक हे रुग्ण आहेत, ज्यांना डॉक्टरांनीही उत्तरे दिली आहेत. हे लोक दिवसाला फक्त वीस रुपयांत हॉटेलमध्ये राहू शकतात. अनेक लोक दोन महिने मरणाच्या प्रतीक्षेत येथे राहतात. गेल्या काही काळापासून परिसरातील या हॉटेल्समध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अशी अनोखी हॉटेल्स देखील अस्तित्वात आहेत हे जाणून लोकांना आश्चर्य वाटतं.

 





Source link

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळतं? रक्कम कुठे खर्च करता येते, जाणून घ्या योजनेबद्दल A to Z माहिती

0
Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड कोणाला मिळतं? रक्कम कुठे खर्च करता येते, जाणून घ्या योजनेबद्दल A to Z माहिती


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना किसान क्रेडिट कार्डवरील व्याज सवलत योजनेची मर्यादा तीन लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्याची घोषणा केली. एमएसएमईसाठी क्रेडिट अॅक्सेस सुधारण्यासाठी सरकार त्यांच्यासाठी क्रेडिट गॅरंटी कव्हर वाढवेल, असेही त्या म्हणाल्या.



Source link

VIDEO : सुधा मूर्तींच्या संस्कारांची सर्वत्र चर्चा! 1600 कोटीच्या मालकीणने जेव्हा जावेद अख्तर यांचा पाया पडते

0
VIDEO : सुधा मूर्तींच्या संस्कारांची सर्वत्र चर्चा! 1600 कोटीच्या मालकीणने जेव्हा जावेद अख्तर यांचा पाया पडते



सुधा मूर्ती या इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी अध्यक्षा त्यांचा प्रेरणादायी विचारांसाठी ओखळल्या जातात. जयपूर  लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सुधा मूर्ती यांच्या त्या कृत्यामुळे सोशल मीडियावर त्यांचे खूप कौतुक होतंय. 
 



Source link

Budget 2025 : अर्थसंकल्पात घोषणा केलेले ‘मिशन डाळ’ काय आहे? ६ वर्षात देश बनणार स्वंयपूर्ण!

0
Budget 2025 : अर्थसंकल्पात घोषणा केलेले ‘मिशन डाळ’ काय आहे? ६ वर्षात देश बनणार स्वंयपूर्ण!


गेल्या आर्थिक वर्षात आयात ८४ टक्क्यांनी वाढून ४.६५ दशलक्ष टन झाली आहे, जी गेल्या सहा वर्षांतील सर्वाधिक आहे. मूल्यानुसार देशाचा आयातीवरील खर्च ९३ टक्क्यांनी वाढून ३.७५ अब्ज डॉलरझाला आहे. भारत कॅनडा, ऑस्ट्रेलिया, म्यानमार, मोझांबिक, टांझानिया, सुदान आणि मलावी येथून मोठ्या प्रमाणात आयात करतो.



Source link

Budget 2025 Sports : अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी तिजोरी खुली, खेलो इंडियासाठी १००० कोटी रुपयांचा निधी

0
Budget 2025 Sports : अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी तिजोरी खुली, खेलो इंडियासाठी १००० कोटी रुपयांचा निधी


Budget 2025 Khelo India Sports : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी) देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील कर माफ करून मध्यमवर्गीयांना दिलासा दिला आहे. याशिवाय या अर्थसंकल्पातून क्रीडा जगतालाही मोठा फायदा मिळणार आहे.



Source link

सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट; PM मोदींची दोन वाक्यात बजेटवर प्रतिक्रिया

0
सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट; PM मोदींची दोन वाक्यात बजेटवर प्रतिक्रिया



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजेटवर प्रतिक्रिया दिली आहे. सरकारची तिजोरी नाही तर, सर्वसमान्यांचा खिसा भरणारे बजेट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 



Source link

12 लाखांपर्यंत सूट अन् Memes मधून सेलिब्रेशन… हे Budget स्पेशल Viral मिम्स पाहून खळखळून हसाल

0
12 लाखांपर्यंत सूट अन् Memes मधून सेलिब्रेशन… हे Budget स्पेशल Viral मिम्स पाहून खळखळून हसाल


Budget 2025 Viral Memes : मोदी सरकार (Modi 3.0) तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या असतानाच अखेर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (FM Nirmala Sitharaman) यांनी संसदेत देशाचा बहुप्रतिक्षित अर्थसंकल्प सादर केला. प्रचंड अपेक्षांच्या गर्दीतच अर्थमंत्र्यांनी हे मुद्दे सर्वांसमोर मांडले आणि यामध्ये समाजातील प्रत्येक वर्गाला अनुसून काही महत्त्वाच्या तरतुदींची घोषणा केली. 

संपूर्ण अर्थसंकल्पामध्ये सर्वात लक्षवेधी वळण ठरलं ते म्हणजे आयकर अर्थात इनकम टॅक्स (Income Tax) संदर्भातील घोषणा. मध्यमवर्गीय आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा देत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. जिथं त्यांनी 12 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नाला करमुक्त घोषित केलं. 

अर्थमंत्र्यांच्या या घोषणेनं अनेकांनाच मोठा दिलासा मिळाला. जाणकारांच्या मते केंद्राचा हा निर्णय म्हणजे कर प्रणालीमधील एक महत्त्वाचे बदल सूचित करत असून, सर्वसामान्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी घेतला गेला आहे. 

 

इथं अर्थमंत्र्यांनी या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केलेली असतानाच तिथं सोशल मीडियावर अनेक मुद्दे ट्रेंड होऊ लागले. निर्मला सीतारमण म्हणू नका, मोदी सरकार म्हणू नका किंवा मग आर्थिक फायदा म्हणू नका. नेटकऱ्यांची कल्पनाशक्ती चाळवली आणि एकाहून एक सरस असे मीम्स सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाले. कोणी चित्रपटांमधील दृश्यांचा आधार घेतला, तर कोणी फक्त प्रतिक्रिया आणि Reel मधील काही संदर्भ देत आनंद व्यक्त केला. 

काही युजर्सनं थेट मोगॅम्बोचाच फोटो पोस्ट करत, ‘मोगॅम्बो खुश हुआ’ असे संदर्भ असणारे मीम्स शेअर केले. तर, काहींनी ‘3 इडियट्स’मधील job interview चा सीन शेअर करत, ‘पगार किती घेणार…. 12 लाख’ असे खळहळून हसू आणणारे मीम शेअर केले. थोडक्यात अर्थमंत्र्यांचा हा निर्णय अनेकांच्याच हिताचा ठरलाय असंच प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. 





Source link