Sunday, June 28, 2026
Home Blog Page 50

Kiss केल्याने मिळतात चक्क आरोग्यदायी फायदे, जाणून थक्क व्हाल!

0
Kiss केल्याने मिळतात चक्क आरोग्यदायी फायदे, जाणून थक्क व्हाल!


Health Benefits Of Kissing: वेलेंटाइन वीकमधील रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे आणि हग डे नंतर आता शुक्रवारी (13 फेब्रुवारी 2026 रोजी) किस डे आहे. वेलेंटाइन वीकमधील हग डे आणि किस डे हे फक्त प्रेमाचे दिवस म्हणून नाही तर या दिवसांचे काही आरोग्यदायी फायदेही आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे आवडत्या व्यक्तीला मिठी मारण्याचा आणि चुंबन घेण्याचा थेट संबंध तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याशी असतो. असे अनेक अभ्यासातून स्पष्ट करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊया हे फायदे काय आहेत?

Add Zee News as a Preferred Source

आवडत्या व्यक्तीला Kiss केल्याने मिळणारे मानसिक फायदे कोणते? 

1. शरीरात हॅपी हार्मोनचे प्रमाण वाढते: आवडत्या व्यक्तीचे चुंबन घेतल्यास मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन, डोपामाइन आणि सेरोटोनिन हे हार्मोन निर्माण होतात. जे मन प्रसन्न आणि आनंदी ठेवण्यास मदत करतात. 

2. ताण-तणाव कमी होतो: शरीरातील तणावाला कारणीभूत असणाऱ्या कोर्टिसोल या हार्मोनची पातळी कमी होण्यास होते. ज्यामुळे मानसिक थकवा कमी होऊन मनाला शांतता मिळते. 

3. सकारात्मक दृष्टिकोन वाढतो: सकाळी कामासाठी घरातून बाहेर निघताना तुमच्या जोडीदाराचे चुंबन घेतल्यास मन आनंदी होते. ज्यामुळे कामाच्या ठिकाणी ताण कमी जाणवतो, अधिक उत्साही आणि  सकारात्मक वाटते. 

 

आवडत्या व्यक्तीला kiss केल्यास शारीरिक आरोग्यास कोणते फायदे मिळतात? 

1. रक्तदाब नियंत्रणात राहतो: आवडत्या व्यक्तीचे चुंबन घेतल्यास हृदयाचे ठोके काही प्रमाणात वाढतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. तसेच डोकेदुखी किंवा मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास कमी होतो. 

2. रोगप्रतिकारशक्ती वाढते: जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे चुंबन घेता तेव्हा लाळेची देवाणघेवाण होते. शरीराला नव्या जंतूंची ओळख झाल्यामुळे त्यांच्याशी लढण्यासाठी शरीर अँटीबॉडीज निर्माण करते. जे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. 

3. कॅलरीज बर्न होतात, चेहऱ्याचा व्यायाम होतो:  चुंबनामुळे एका मिनिटात अंदाजे 2 ते 26 कॅलरीज बर्न होतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. तसेच चुंबन घेताना चेहऱ्याचे अनेक स्नायू सक्रिय होतात. एकप्रकारे चेहऱ्याचा व्यायम होतो. ज्यामुळे त्वचा घट्ट राहते आणि सुरकुत्याही कमी होतात. 

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

एन. रघुरामन यांचा कॉलम: ‘रॉ डेटा’च्या घुसळणीतून व्यवसायासाठी सुवर्णसंधी निर्माण कराव्या लागतील

0
एन. रघुरामन यांचा कॉलम:  ‘रॉ डेटा’च्या घुसळणीतून व्यवसायासाठी सुवर्णसंधी निर्माण कराव्या लागतील




मंगळवारी मी मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पवई शाखेत उभा होतो. ऑपरेशन्स मॅनेजरसमोरील रांगेत दुसऱ्या क्रमांकावर उभे असताना मला एक लॉजिस्टिक अपयश पाहायला मिळाले. माझ्या पुढे उभी असलेली व्यक्ती तीस मिनिटे वाट पाहून थकली होती. तो एका विचित्र अडचणीत होता. पाच दिवसांपूर्वी त्याने शाखेच्या ऑटोमेटेड मशीनमध्ये चेक जमा केला होता. पुरावा म्हणून त्याच्याकडे फोटोग्राफिक पावतीही होती. तरीही, बँक ते फिजिकल डॉक्युमेंट (कागदपत्र) शोधू शकत नव्हती. मशीनने ते गिळले की काय? कुणालाच माहीत नाही. माझा स्वतःचा संयमही सुटू लागला होता, तेवढ्यात शाखा व्यवस्थापकाने येऊन मला मदत केली. प्रशासकीय बेजबाबदारपणामध्ये अडकलेली ती अस्वस्थ व्यक्ती तिथेच राहिली आणि मी बाहेर आलो. माझे पुढचे ठिकाण एक प्रमुख रुग्णालय होते, जिथून मला पंधरा दिवसांपासून भरती असलेल्या एका नातेवाइकाला डिस्चार्ज द्यायचा होता. गर्दीच्या या ठिकाणी एका बेडसाठीही अनेकदा मोठी शिफारस लावावी लागते. येथेही मला एक धक्कादायक पॅटर्न दिसला. असा एकही रुग्ण नव्हता ज्याच्याकडे कागदपत्रे नव्हती. सर्वांच्या हातात एकाच रंगाचे फोल्डर्स होते, ज्यात हाताने लिहिलेल्या अपॉइंटमेंट्स आणि प्रिंट केलेले लॅब रिझल्ट्स भरले होते. कारण ‘प्रोव्हायडर्स’ अनेकदा डिजिटल फाइल्सचा मागोवा गमावतात, ज्यामुळे अनावश्यक वारंवार चाचण्या केल्या जातात. हे असेच आहे जणू काही ते त्या चाणाक्ष चिकुनगुनिया व्हायरसला शोधत आहेत, जो सुरुवातीच्या चाचणीत पकडला जात नाही. एआयच्या युगात जगूनही आपली आरोग्य सेवा व्यवस्था १९ व्या शतकातच अडकली आहे. हे एक विचित्र डिजिटल-अॅनालॉग हायब्रिड मॉडेल आहे, जिथे कॉरिडॉरमध्ये आजही फॅक्स मशीन चालतात आणि डॉक्टर व्हॉट्सॲपवर संवेदनशील वैद्यकीय डेटा शेअर करतात. रुग्णालयाच्या प्रत्येक मजल्यावर शेकडो संगणक आहेत. प्रत्येकात माहितीचा महासागर आहे. सर्वत्र डेटा आहे, तरीही डॉक्टर आणि रुग्ण कागदालाच चिकटून आहेत. मला खलाशांची एक जुनी ओळ आठवते- ‘Water, water everywhere, not any drop to drink’. या आधुनिक युगात आपणही रॉ डेटामध्ये बुडालो आहोत, परंतु वापरण्यायोग्य, व्यवस्थित माहितीसाठी तहानलेलेच आहोत. मुळात ही समस्या तंत्रज्ञानाची नसून संस्कृतीची हार आहे. व्यवस्थेचे हे अपंगत्व केवळ मुंबई किंवा भारतापुरते मर्यादित नाही, तर विकसित देशही याच्याशी झुंजत आहेत. सुरुवातीचा तांत्रिक अडथळा आहे, इंटरऑपरेबिलिटी. म्हणजेच वेगवेगळ्या सिस्टिम्सची एकमेकांशी संवाद साधण्याची क्षमता. यावर काही उपाय आहे का? नक्कीच आहे, जर खरोखरच उपाय शोधण्याची इच्छा असेल तर. मोठ्या डेटा सेटचा शोध घेऊन विश्लेषण करण्याच्या क्षमतेवर आधारित एआय जसे मुख्य प्रवाहात येत आहे, तसे आपण अश्मयुगासारख्या काळात अडकून राहू शकत नाही. डेटासाठी स्पष्ट आणि युनिव्हर्सल स्टँडर्ड‌्स (सार्वत्रिक मानके) तयार करणे आवश्यक आहे आणि हे केवळ बँक किंवा क्लिनिकमधील ग्राहक अनुभव सुधारण्यासाठीच नाही, तर संशोधन, नावीन्य आणि विविध उद्योगांमध्ये एआय च्या विस्तारासाठी मूलभूत अट आहे. केवळ खर्च कमी करण्यापलीकडे, हा वापरकर्त्यांची सुरक्षितता आणि राष्ट्रीय डेटा सार्वभौमत्वाचा मुद्दा आहे. आपल्यासारख्या मोठ्या देशात आरोग्य डेटा हा एक मौल्यवान सामग्री आहे, जी सांभाळावी लागेल आणि प्रभावीपणे वापरावी लागेल. सध्या, बहुतेक आरोग्य सेवा कर्मचारी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ठेवतात, परंतु त्याचा एक छोटासा भागच रुग्णाला दिला जातो. पंधरा दिवसांनंतर रुग्णालयातून जाणाऱ्या व्यक्तीकडे उपचारांचा पूर्ण इतिहास नसतो, तर फक्त ‘डिस्चार्ज समरी’ असते. परिणामी, नवीन रुग्णालय किंवा शहरात नवीन डॉक्टरला पुन्हा नवीन चाचण्या कराव्या लागतात. केवळ खर्चच नाही, तर त्या रुग्णाचे दुःखही समजून घ्या, ज्याला पुन्हा अंगावर सुया टोचून घ्याव्या लागतील. फंडा असा की – डेटा ही प्रत्येक आधुनिक व्यवसायाची ‘क्रीम’ आहे. तथापि, समाज म्हणून आपण ती क्रीम घुसळून लोणी आणि आरोग्यदायी, चविष्ट तूप बनवण्यात अपयशी ठरलो आहोत. जे ग्राहक आणि व्यवसाय दोघांसाठीही फायदेशीर आहे. पुढे जाण्यासाठी आपल्याला हे अंतर भरून काढावे लागेल.



Source link

पुरुषांमध्ये वयानुसार वंध्यत्व वाढते का? कोणत्या वयानंतर सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे?

0
पुरुषांमध्ये वयानुसार वंध्यत्व वाढते का? कोणत्या वयानंतर सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे?


वंध्यत्वाचा परिणाम पुरुषांवर महिलांइतकाच होतो, परंतु असे आढळून आले आहे की पुरुष स्वतः त्याशी झुंजत नाही तोपर्यंत ते याबद्दल विचार करत नाहीत. खरं तर, काही घटक पुरुष वंध्यत्वाच्या जलद वाढीस कारणीभूत आहेत, ज्यात मद्यपान, धूम्रपान, खराब मानसिक आरोग्य आणि कामाच्या ठिकाणी हानिकारक रसायनांचा संपर्क यांचा समावेश आहे. डॉ. (प्राध्यापक), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, शारदाकेअर-हेल्थसिटीचे वरिष्ठ सल्लागार यांच्या मते, असे मानले जाते की वयाचा पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होत नाही आणि पुरुष नंतरच्या आयुष्यात कोणत्याही जैविक समस्यांशिवाय वडील होऊ शकतात. परंतु आता वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून येत आहे की पुरुषांचे वाढणारे वय त्यांच्या प्रजनन क्षमतेवर, गर्भधारणेच्या प्रक्रियेवर आणि त्यांच्या मुलांच्या दीर्घकालीन आरोग्यावर देखील परिणाम करू शकते.

Add Zee News as a Preferred Source

पुरुषांच्या वंध्यत्वावर वयाचा परिणाम

३० किंवा ३५ वर्षांच्या वयानंतर महिलांची प्रजनन क्षमता कमी होते, कारण त्यांच्या शरीरात मर्यादित संख्येत अंडी असतात आणि या वयापर्यंत, त्यांची संख्या आधीच संपलेली असते. दुसरीकडे, पुरुष आयुष्यभर शुक्राणू तयार करत राहतात आणि शुक्राणूंची संख्या मर्यादित नसते. तथापि, याचा अर्थ असा नाही की ते नेहमीच प्रजननक्षम राहतील. कारण शुक्राणूंची निर्मिती होत राहील, परंतु वयानुसार त्यांची गुणवत्ता कमी होत जाईल. विशेषतः ४० वर्षांच्या वयानंतर, शुक्राणूंची संख्या, गतिशीलता आणि आकार हळूहळू कमकुवत होतो. यामुळे नैसर्गिक गर्भधारणा विलंबित होऊ शकते आणि गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो.

शुक्राणूंच्या डीएनएवर वयाचा परिणाम

पुरुषाचे वय वाढत असताना, केवळ त्याच्या शुक्राणूंची संख्या कमकुवत होत नाही तर त्याचा त्याच्या शुक्राणूंच्या डीएनएवरही परिणाम होतो. वृद्धत्वामुळे शुक्राणूंमध्ये डीएनए नुकसान आणि अनुवांशिक उत्परिवर्तन होण्याची शक्यता वाढते. हे वारंवार पेशी विभाजन, वाढलेले ऑक्सिडेटिव्ह ताण आणि शरीराची दुरुस्ती क्षमता कमी झाल्यामुळे होते. अशा शुक्राणूंमुळे गर्भाधान होण्याची शक्यता कमी होऊ शकते, गर्भाच्या विकासात अडथळा येऊ शकतो आणि गर्भपाताचा धोका वाढू शकतो, अगदी आयव्हीएफ सारख्या तंत्रांचा वापर करूनही.

मुलांवर परिणाम

बहुतेक लोक याचा विचार करत नसले तरी, संशोधनात असे आढळून आले आहे की जर एखाद्या पुरूषाने मोठ्या वयात वडील होण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या मुलांना अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. संशोधनात असे आढळून आले आहे की या स्थितीमुळे मुलांमध्ये ऑटिझम आणि स्किझोफ्रेनिया सारख्या न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डरचा धोका किंचित वाढू शकतो. याव्यतिरिक्त, काही जन्मजात आजार आणि बालपणातील कर्करोगाचा धोका वाढल्याचे पुरावे देखील आहेत, जरी अशा प्रकरणांची एकूण घटना कमी आहे. बहुतेक मुले पूर्णपणे निरोगी जन्माला येतात.

जीवनशैली आणि आरोग्य महत्त्वाची भूमिका बजावतात

वय हा एकमेव घटक नाही जो पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम करतो; त्यांचे आरोग्य आणि जीवनशैली देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जर एखाद्या पुरूषाला मधुमेह, हृदयरोग, हार्मोनल समस्या, लैंगिक आरोग्य समस्या किंवा लठ्ठपणा असेल तर ते त्याच्या शुक्राणूंची गुणवत्ता कमकुवत करू शकते.





Source link

डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेतल्या जाताय गर्भपाताच्या गोळ्या, महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

0
डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेतल्या जाताय गर्भपाताच्या गोळ्या, महिलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर


हल्ली अनेक महिलांना असे वाटू लागले आहे की नको असलेली गर्भधारणा थांबवण्यासाठी ओटीसी गोळ्या घेणे हा एक सोपा, सुरक्षित असा वैयक्तिक मार्ग आहे. ऑनलाइन सहज उपलब्धत, सोशल मीडियावरील अपुरी माहिती आणि सामाजाच्या भीतीमुळे अनेक महिला डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वमर्जीने औषधं घेतात. मात्र, हे भविष्यातील गर्भधारणेसाठी धोकादायक ठरू शकते.

Add Zee News as a Preferred Source

गर्भपाताच्या गोळ्या हे सर्दी- खोकल्याच्या औषधाप्रमाणे सामान्य नाहीत. त्या घेण्याआधी योग्य वैद्यकीय तपासणी, गर्भधारणेचा अचूक कालावधी आणि योग्य डोस घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय किंवा चुकीच्या पद्धतीने गोळ्या घेतल्यास या गोळ्या अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत. अनेक वेळा अपूर्ण गर्भपात होतो, म्हणजेच गर्भाचे काही अवशेष गर्भाशयातच राहतात. यामुळे तीव्र रक्तस्राव, वेदना आणि संसर्ग होऊ शकतो आणि वेळीच उपचार न केल्यास जीवघेण्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात.

अनेक महिला दीर्घकाळ होणारा रक्तस्राव आणि वेदना “सामान्य” समजून दुर्लक्ष करतात आणि डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात किंवा विलंबाने जातात. त्यामुळे अनेक रुग्ण गंभीर अ‍ॅनिमिया, संसर्ग किंवा अंतर्गत गुंतागुंतींसह रुग्णालयात दाखल होतात, जे योग्य वेळी उपचार घेऊन टाळता आले असते.

गर्भपाताच्या गोळ्यांचा शरीरावर होणारा परिणाम

अनेक महिला विचार न करता गर्भपाताच्या गोळ्या घेतात. डॉक्टरांच्या देखरेखीशिवाय या गोळ्यांचा वापर केल्यास हार्मोन संतुलन बिघडू शकते आणि त्यानंतर ३ ते ४ महिने मासिक पाळी अनियमित राहू शकते. गर्भपाताच्या गोळ्या नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्याव्यात. जास्त रक्तस्रावामुळे अशक्तपणा येऊ शकतो, थकवा, चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात आणि त्यासाठी तातडीने उपचारांची गरज भासू शकते.

गर्भाशयात गर्भाचे अवशेष राहिल्यामुळे होणारा संसर्ग पुढे गर्भाशय आणि आसपासच्या अवयवांपर्यंत पसरू शकतो. अशा परिस्थितीत शस्त्रक्रिया किंवा दीर्घकालीन उपचारांची गरज भासू शकते, ज्यामुळे महिलांवर शारीरिक आणि मानसिक ताण येतो. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय या संपूर्ण प्रक्रियेतून जाताना अनेक महिलांना ताण, अपराधीपणा आणि नैराश्याचा सामना करावा लागतो.

भविष्यातील गर्भधारणेवर होतो परिणाम

वारंवार किंवा चुकीच्या पद्धतीने केलेल्या गर्भपातामुळे गर्भाशयाच्या आतील आवरणाला इजा होऊ शकते. यामुळे वंध्यत्व, वारंवार गर्भपात होणे किंवा भविष्यातील गर्भधारणेत गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका वाढतो. संसर्गामुळे गर्भाशय किंवा फॅलोपियन ट्युबमध्ये जखमा निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे भविष्यातील गर्भधारणेत अडचणी येतात. काही महिलांमध्ये गर्भाशयाबाहेरील गर्भधारणेचा (एक्टॉपिक प्रेग्नन्सी) धोका वाढतो, जी अत्यंत गंभीर आणि आपत्कालीन वैद्यकीय स्थिती आहे.

डॉक्टरांच्या देखरेखीखाली केलेला सुरक्षित गर्भपात आरोग्यासाठी धोकादायक ठरत नाही. गर्भपात पूर्ण झाला आहे का आणि शरीर नीट सावरत आहे का हे तपासण्यासाठी डॉक्टरांकडे फॉलोअप करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉक्टरांचा सल्ला न घेता ओटीसी गोळ्यांचा वापर करून गर्भपात करणे सोयीचे वाटू शकते, पण ते  योग्य नाही. योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास महिलांचे आरोग्य सुरक्षित राहते आणि भविष्यातील प्रजनन आरोग्य सुरक्षित व निरोगी राखता येते.





Source link

अति तिथे माती म्हणत शंभूराज देसाईंचा दोन मंत्र्यांवर निशाणा; भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार?

0


सातारा : राज्यात अनेक जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकांसाठी युती असताना सातारा (Satara) जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्वबळावर निवडणुका लढवल्या. तर एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्रितपणे लढले होते. येथील निकालात कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. मात्र, निकालानंतर भाजपला दूर ठेवत शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर पाटणमधील विजयी सभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी सूचक वक्तव्य करत मंत्री जयकुमार गोरेंना टोला लगावला. तर, गणेश नाईक यांच्यावरही टीका केली.  

“निवडणुकीत पाटणमध्ये मोठे नेते आले, भाषणं झाली पण जिल्हा परिषदेचा निकाल बघा.एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना तर दुसरीकडे भाजप. मात्र, बेरीज काय झाली, अति तिथे माती होते. अति जाऊन कुठे केलं तर माणसं योग्य वेळेची योग्य संधीची वाट बघत असतात, असे शंभूराज देसाईंनी म्हटले. शंभूराज देसाईंनी नाव न घेता भाजपचे मंत्री जयकुमार गोरे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान, पालकमंत्रीऐवजी मालकमंत्री म्हणत गणेश नाईक यांनी शंभूराज देसाईंवर टीका केली होती.तर, साताऱ्यातील माणमध्ये जयकुमार गोरे यांचे बंधू आणि वहिनींचा पराभव झाला आहे. 

सातारा जिल्ह्यात भाजपला शह देण्यासाठी राष्ट्रवादी शिवसेना एकत्र ? 

सातारा जिल्हा परिषदच्या पंचवार्षिक निवडणुकीत कोणत्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेसाठी त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, स्वाभिमान शेतकरी संघटना आणि अपक्ष यांच्या भाजपविरोधी आघाडीने एकत्र ताकद दाखवत सत्ता स्थापनेच्या शर्यतीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता कोणाच्या हाती जाणार याबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. साताऱ्यात जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत राजकीय समीकरणे बदलताना  दिसत आहेत. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी युतीतील दोन्हीही पक्षांमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत. थेट सत्ता स्थापनेसाठी प्राथमिक चर्चा झाली असल्याचे देखील मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेचा खेळ आणखी रंगण्याची शक्यता वाढली आहे.

जिल्हा परिषदच्या निकालानुसार भाजप 27 जागेवर सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, बहुमतासाठीचा आवश्यक असलेला आकडा गाठण्यात भाजप अपयशी ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसला 20 जागा, शिवसेनेला 15, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 1, अपक्ष 1, राष्ट्रीय काँग्रेसला 1, अशाच जागा मिळाल्या आहेत एकूण 65 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 33 जागांची गरज असते यातील राष्ट्रवादी शिवसेना मिळून 35 चा आकडा होत आहे. त्यामुळे, सत्ता स्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात बैठक होत आहेत. त्यामुळे भाजपने हातची संधी घालवली असल्याची सातारा जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे.

भाजपला साताऱ्यात सत्तेपासून दूर ठेवण्याची कारणे

स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका लागतात मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडून युतीमधील तिन्ही पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र भाजपने स्वबळाचा नारा देऊन युतीच्या बैठकीस भाजपच्या मंत्र्यांनी जाणे टाळले. नगरपालिकेला भाजपला घवघवीत यश मिळाल्याने भाजपने जिल्हा परिषद, पंचायत समिती मध्ये सुद्धा स्वबळाचा नारा देऊन युतीतील प्रमुख दोन पक्षांना प्रतिस्पर्धी करत त्यांच्या विरोधात मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली. मंत्री शंभूराज देसाई यांच्या पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये मंत्री जयकुमार गोरे, मंत्री गणेश नाईक,मंत्री शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांसारख्या बड्या नेत्यांनी मंत्री शंभूराज देसाई यांना टार्गेट करून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केले होते. त्याचबरोबर दुसरीकडे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मंत्री मकरंद पाटील यांच्या वाई विधानसभा मतदारसंघात देखील मोठी मोर्चे बांधणी  करून त्यांना अडचणीत आणण्यात आले. मंत्री जयकुमार गोरे ठाणमांडून खंडाळा,वाई, महाबळेश्वर या ठिकाणी जाऊन भाजप पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला होता.. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्हीही नेते भाजपच्या नेत्यांवर नाराज असल्याने जिल्हा परिषद च्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येऊन भाजप विरोधी निवडणूक लढले आणि  मोठे यश या तिन्ही पक्षांना आल्याने जिल्हा परिषदेमध्ये हे तिन्ही पक्ष सत्ता स्थापन करून भाजपला विरोधी बाकावर बसू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.

सत्ता स्थापनेचे रणधुमाळी निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार की जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी निर्णय घेणार 

वरिष्ठ पातळीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षची चर्चा होऊन निर्णय होणार की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जसं स्थानिक नेत्यांना विचारून निवडणुकीमध्ये युतीमध्ये निवडणूक लढाईची केस व बळाव लढायची याचा निर्णय तसा स्थानिक नेत्यांनी घेतला त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सत्ता समीकरणात देखील स्थानिक नेत्यांना विचारून निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सातारा जिल्हा परिषदेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असून राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपला सत्ता स्थापनेपासून दूर ठेवू शकते असे राजकीय जाणकारांचे मत आहे. अध्यक्ष,उपाध्यक्ष पदासाठी कोणत्या पक्षाचा उमेदवार पुढे येणार कोण कोणाला पाठिंबा देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला आहे.

सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटामध्ये पक्षीय बलाबल :

जिल्हा परिषद 65 सदस्य सत्ता स्थापनेसाठी 33 संख्या आवश्यक

भाजप २७, राष्ट्रवादी २0, शिवसेना १५, काँग्रेस १, स्वाभिमानी १, अपक्ष १

सातारा : ८ जागांमध्ये भाजप ५, राष्ट्रवादी २, स्वाभिमानी शेतकरी संघटना १

कराड दक्षिण व उत्तर : १२ जागांमध्ये भाजप ८, राष्ट्रवादी (अजित पवार गट) २, राष्ट्रीय काँग्रेस १, अपक्ष १

महाबळेश्वर : २ जागांमध्ये राष्ट्रवादी १, शिवसेना १

खंडाळा : ३ गटामध्ये राष्ट्रवादी २, भाजप १

कोरेगाव : ६ जागांमध्ये भाजप १, राष्ट्रवादी ३, शिवसेना २

पाटण : ७ जागांपैकी शिवसेना ६, भाजप १

फलटण : ८ जागांपैकी शिवसेना ५, भाजप २, राष्ट्रवादी १

माण : ५ जागांपैकी राष्ट्रवादी ३, भाजप २

खटाव : ७ जागांपैकी भाजप ४, राष्ट्रवादी ३

वाई : ४ जागांपैकी राष्ट्रवादी ३, भाजप १,

जावळी : ३ जागांपैकी भाजप २, शिवसेना १

हेही वाचा

राम सातपुतेंच्या हत्येचा कट, धैर्यशील मोहिते पाटलांचा जयकुमार गोरेंवर पलटवार; सांगितलं नेमकं काय घडलं



Source link

स्ट्रोकच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष

0
स्ट्रोकच्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करु नका दुर्लक्ष


जेव्हा मेंदूच्या एखाद्या भागाला होणारा रक्तपुरवठा अचानक थांबतो किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटते, तेव्हा स्ट्रोक येतो. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान आणि जीवनशैलीसंबंधी चुकीच्या सवयी ही त्यामागची सामान्य कारणं आहेत. स्ट्रोकची लक्षणे अचानक दिसून येतात.  त्यात शरीराच्या एका बाजूला अशक्तपणा, बोलताना अडखळणे, चेहऱ्याची एक बाजू लुळी पडणे, शारीरक संतुलन गमावणे, अंधुक दृष्टी किंवा तीव्र डोकेदुखी यांचा समावेश असू शकतो. अशी लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. स्ट्रोक ही एक वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे आणि त्वरित उपचारांमुळे पुर्ववत आयुष्य जगता येऊ शकते.

Add Zee News as a Preferred Source

स्ट्रोकसाठी धोक्याचे घटक

* रक्तदाबात वाढ : बऱ्याचदा थंड हवामानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, रक्तदाब वाढतो आणि स्ट्रोकची शक्यता वाढते.

* निर्जलीकरणामुळे , पाणी कमी प्यायल्याने रक्त घट्ट होते आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो.

* शारीरिक हालचालींचा अभाव : कमी हालचालींमुळे रक्ताभिसरण आणि हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि त्यामुळे स्ट्रोकची शक्यता असते.

* चरबीयुक्त आहार : तेलकट आणि गोड पदार्थांमुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि स्ट्रोक येऊ शकतो.

* हृदयाच्या समस्या : हृदयावर अतिरिक्त ताण येणे विशेषतः हृदयरुग्णांमध्ये ही समस्या आढळून येते ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.

* अति मद्यपान : अल्कोहोलमुळे हृदयाची लय आणि रक्तदाब बिघडतो आणि स्ट्रोक येऊ शकतो.

* धूम्रपानाची सवय : धूम्रपानामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि गुठळ्या होण्याचा व स्ट्रोकचा धोका वाढतो.

* वैद्यकीय उपचारांना विलंब : शारीरीक संतुलन गमावणे, बोलण्यात अडचण, चेहरा लुळा पडणे आणि हातामध्ये अशक्तपणा यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. स्ट्रोकला वेळीच उपचारांची आवश्यकता असते.

स्ट्रोकच्या वेळी प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो, कारण उपचारांना विलंब झाल्यास मेंदूला कायमचे नुकसान होऊ शकते किंवा मृत्यू देखील ओढावू शकतो. टिपीए इंजेक्शन आणि मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमीसारख्या उपचारांमुळे जगण्याची आणि रुग्ण बरा होण्याची शक्यता वाढते. सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि विलंब न करता रुग्णालयात उपचारांसाठी  धाव घेणे गरजेचे आहे. हे एकाद्याचा अमूल्य जीव आणि मेंदूचे कार्य वाचवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरते. वेळीच केलेली कृती आणि वेळेवर मिळणारी वैद्यकीय सेवा हे स्ट्रोकपासून बचावासाठी सर्वात प्रभावी मार्ग आहे.





Source link

तुमची घोरण्याची सवयच ठरतेय हृदय विकाराचे कारण, आत्ताच सावध व्हा!

0
तुमची घोरण्याची सवयच ठरतेय हृदय विकाराचे कारण, आत्ताच सावध व्हा!


Snoring can Lead To Heart Attack: अनेकांना रात्री झोपताना घोरण्याची सवय असते. या सवयीमुळे इतरांच्या झोपेत तर अडथळा येतोच, अनेकदा या घोरण्याकडे ‘हे साधारण आहे’ किंवा ‘वयानुसार असे होतच राहते’ असे म्हणून दुर्लक्ष केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या घोरण्याच्या समस्येचा थेट संबंध हृदयाच्या आरोग्याशी असू शकतो. संशोधनानुसार, जे लोक झोपेत मोठ्याने घोरतात; त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढतो. तुमच्या घोरण्याचा शारीरिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? यावर उपाय काय आहेत? जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

झोपेत घोरण्याची मुख्य कारणे कोणती? 

1. श्वसनसंस्थेच्या समस्या: सर्दी किंवा अॅलर्जीमुळे नाक चोंदलेले असेल तर, श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळे घोरण्याच्या समस्या उद्भवू शकते. तसेच घशात टॉन्सिल्स वाढल्यामुळे श्वसननलिकेचा मार्ग लहान झाल्यामुळे किंवा नाकाचे हाड वाकडे असल्यास एका नाकपुडीतून श्वास घेण्यास त्रास होतो. यामुळेही घोरण्याची समस्या होऊ शकते. 

2. वाढलेले वजन: ज्यांचे वजन अधिक असते, त्यांच्या मानेभोवती चरबीचे प्रमाण अधिक असते. या चरबीमुळे झोपताना श्वसननलिकेवर दबाव निर्माण होतो. ज्यामुळे श्वसनप्रक्रियेत अडथळा येतो. 

3. झोपण्याची चुकीची पद्धत: जेव्हा तुम्ही पाठीवर झोपता तेव्हा, गुरुत्वाकर्षणामुळे जीभ घशाच्या मागील बाजून झुकली जाते. यामुळे श्वास घेताना अडथळा निर्माण होऊन घोरण्यचा आवाज येतो. 

4. धूम्रपान किंवा थकवा: झोपण्यापूर्वी धूम्रपान केल्याने सिगारेटमुळे श्वसननलिकेला सूज आल्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच खूप जास्त थकवा असल्यास शरीर गाढ झोपेत असल्यामुळे स्नायू जास्त सैल पडतात आणि घोरण्याचा त्रास होतो. 

5. स्लीप अॅप्निया: ही झोपेची एक गंभीर वैद्यकीय समस्या आहे. या स्थितीत झोपेत काही सेकंदांसाठी श्वास पूर्णपणे थांबतो. या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

 

सततच्या घोरण्यामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्या जाणवतात? 

सतत घोरण्यामुळे रात्री झोपेत रक्तदाब वाढतो, जे हृदयासाठी घातक ठरते. तसेच जर तुम्ही दीर्घकाळापासून या समस्येला सामोरे जात असाल तर, हृदयाच्या स्नायूंवर ताण येऊन हृदयाचा आकार वाढू शकतो. घोरण्यामुळे हृदयाचे ठोके अनियमितही होऊ शकतात. याशिवाय इतरही धोके उद्भवतात जसे की, दिवसभर थकवा जाणवणे आणि सतत डुलकी येणे, एकाग्रतेची क्षमता कमी होणे आणि चिडचिड वाढणे, मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता. 

 

घोरणे कमी करण्यासाठी सोपे उपाय: 

पाठीवर झोपण्याऐवजी डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपण्याची सवय करा. निरोगी पचनसंस्था आणि हृदयाच्या आरोग्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे अधिक फायदेशीर ठरते. मानेभोवती अतिरिक्त चरबी असेल तर, वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करा. झोपताना डोक्याखाली उंच थोडी उंच उशी घ्या. तसेच महत्त्वाचे म्हणजे, स्लीप अॅप्निया सारख्या समस्येची लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांना संपर्क करा. 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

सातारा_राजकारण : राष्ट्रवादी–शिवसेना एकत्र येणार? भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती वेगात

0
सातारा_राजकारण : राष्ट्रवादी–शिवसेना एकत्र येणार? भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याची रणनीती वेगात

फलटण :-  सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राजकीय समीकरणांना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत भाजपला सत्तेबाहेर ठेवणार का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी बहुमताचा आकडा राष्ट्रवादी–शिवसेनेकडे झुकत असल्याने सत्तास्थापनेत नवे समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानसभेनंतर जिल्ह्यात बदललेले राजकीय चित्र

सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचे ४, राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि शिवसेनेचे २ आमदार निवडून आले होते. त्यानंतर सत्तास्थापनेदरम्यान भाजपने जिल्ह्याला दोन मंत्रिपदे देत साताऱ्याला विशेष महत्त्व दिले. त्यामुळे सातारा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.
मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील पक्षांमध्येच संघर्षाची स्थिती निर्माण झाली. नगरपालिका आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळावर लढत राष्ट्रवादी आणि शिवसेनेला थेट आव्हान दिले.

मंत्र्यांमधील संघर्षामुळे वाढली राजकीय दरी

ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या बालेकिल्ल्यात सक्रिय राजकारण करत त्यांना आव्हान दिले. तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली.
वाई नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवत मंत्री मकरंद पाटील यांना राजकीय शह दिला. त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही एकमेकांविरुद्ध आक्रमक भूमिका घेतल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले.

जिल्हा परिषदेत बहुमताचे गणित

जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप २७ जागांवर विजयी होत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र सत्तेसाठी स्पष्ट बहुमत आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने २० तर शिवसेनेने १५ जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास बहुमताचा आकडा सहज गाठता येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी–शिवसेना युतीची शक्यता बळावली आहे.

‘चहा पे चर्चा’ ठरली निर्णायक?

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी मंत्री शंभूराजे देसाई यांच्या निवासस्थानी झालेली बैठक चर्चेचा विषय ठरली आहे. या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर, मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील यांसारखे प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तासमीकरणांवर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, कोणत्याही परिस्थितीत भाजपला रोखणे हे प्रमुख उद्दिष्ट ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा फॉर्म्युला ठरविण्याच्या हालचाली करत आहेत.

भाजपसमोर मोठे आव्हान

भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी स्पष्ट बहुमत नसल्याने मित्रपक्षांची साथ आवश्यक आहे. मात्र सध्याच्या राजकीय हालचाली पाहता राष्ट्रवादी–शिवसेना आघाडीने पुढाकार घेतल्यास भाजपला सत्तेबाहेर बसावे लागू शकते.
साताऱ्यातील या नव्या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्यातील सत्तासमीकरणे पुन्हा एकदा बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. आता अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने लागतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दिल्ली दौऱ्यावर असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! एप्रिल महिन्यापर्यंत…

0
दिल्ली दौऱ्यावर असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय! एप्रिल महिन्यापर्यंत…



Sunetra Pawar Big Decision: सुनेत्रा पवार यांनी 30 जानेवारी रोजी अजित पवारांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी 11 दिवसांनी प्रत्यक्ष पदभार स्वीकारला आणि दिल्लीला भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी रवाना झाल्या.



Source link

सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा उदय : संघटन, संघर्ष आणि नव्या राजकारणाची नांदी

0
सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा उदय : संघटन, संघर्ष आणि नव्या राजकारणाची नांदी

फलटण :-  सातारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्हत्या, तर त्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरल्या. या निवडणुकांमधून प्रथमच वंचित बहुजन आघाडी ने इतक्या मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती नोंदवली आणि सातारा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर एक वेगळी, वैचारिक आणि चळवळीवर आधारित राजकीय शक्ती म्हणून स्वतःला सिद्ध केले.

या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी होते प्रकाश आंबेडकर यांचे नेतृत्व आणि सातारा जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांचे संघटनात्मक मार्गदर्शन. विशेष बाब म्हणजे, अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीत जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रामदास कांबळे यांनी जिल्हाभर संघटन उभे करत तब्बल २८ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले. सातारा जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात वंचित बहुजन आघाडीने केलेला हा सर्वात मोठा आणि धाडसी प्रयत्न ठरला.

या निवडणुकीकडे केवळ विजय-पराजयाच्या चष्म्यातून पाहणे ही मोठी चूक ठरेल. कारण मातब्बर, प्रस्थापित आणि आर्थिकदृष्ट्या बळकट विरोधक असलेल्या मतदारसंघात टिकून राहणे, प्रचार करणे आणि लोकांपर्यंत पोहोचणे हेच मोठे यश होते. फलटण, वाई, खंडाळा यांसारख्या तालुक्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी इतकी प्रभावी लढत दिली की भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसारख्या सत्ताधारी आणि मोठ्या पक्षांच्या उमेदवारांना अक्षरशः घाम फुटला.

अनेक ठिकाणी वंचितच्या उपस्थितीमुळे मोठ्या पक्षांना थेट जागा गमवाव्या लागल्या. हे वास्तव वंचित बहुजन आघाडी ही केवळ “पर्यायी” नव्हे, तर “निर्णायक” राजकीय शक्ती बनू लागल्याचे स्पष्ट संकेत देणारे आहे.

तुटपुंज्या यंत्रणा, मर्यादित आर्थिक साधने आणि कोणताही सत्तेचा आधार नसतानाही वंचितच्या उमेदवारांनी गावोगावी फिरून प्रचार केला. हा प्रचार केवळ मत मागणारा नव्हता, तर बाळासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाचा, सामाजिक न्यायाचा आणि बहुजन राजकारणाचा संदेश देणारा होता. लोकांशी थेट संवाद, प्रश्नांवर चर्चा आणि स्वाभिमानी राजकारणाचा आग्रह, यामुळेच वंचितची ओळख सातारा जिल्ह्यात वेगाने रुजत गेली.

आज सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी हे नाव केवळ निवडणूक लढवणारा पक्ष म्हणून नव्हे, तर चळवळीतून उभा राहिलेला एकमेव राजकीय पर्याय म्हणून घुमू लागले आहे. जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण, महिलावर्ग आणि सामाजिक कार्यकर्ते वंचितमध्ये सहभागी होण्यास उत्सुक झाले आहेत. ही उत्सुकता केवळ राजकीय संधीसाठी नसून, स्वाभिमान, प्रतिनिधित्व आणि सामाजिक परिवर्तनाच्या अपेक्षेतून निर्माण झालेली आहे.

या निवडणुकीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की सातारा जिल्ह्यातील राजकारण आता एकांगी राहणार नाही. वंचित बहुजन आघाडीने उभा केलेला हा पाया भविष्यात अधिक भक्कम होणार असून सातारा जिल्हा वंचितचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास जनमानसात तयार झाला आहे. येणाऱ्या काळात स्थानिक प्रश्न, सामाजिक अन्याय आणि बहुजनांचे प्रश्न अधिक तीव्रतेने मांडणारी राजकीय शक्ती म्हणून वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावेल, यात शंका नाही.

_ अक्षय साळवे सातारा